शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

'प्रायव्हेट जेटने उद्धव ठाकरे सहकुटुंब काल दुपारीच रवाना; आदित्य बेपत्ता होणार नाहीत अशी आशा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 13:02 IST

आदित्य ठाकरे अडचणीत? सुशांत सिंह रजपूत आत्महत्येची सुनावणी लवकरच सुरु होतेय - नितेश राणे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या नोकर, कुक यांना घेऊन काल दुपारीच डेहराडून गेल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. जरांगे पाटलांचे उपोषण सुटेस्तोवर थांबला का नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. सोबतच आदित्य ठाकरे बेपत्ता होऊ शकत नाहीत असेही राणे यांनी म्हटले आहे. 

ठाकरे कुटुंबीय काल दुपारी दोन वाजता एका खासगी विमानाने गेट नंबर ८ वरून डेहराडूनला निघून गेल्याचे मला कोणीतरी सांगितले. त्यांच्यासोबत त्यांचा कूक आणि स्टाफही आहे. हीच त्यांची मराठा आरक्षणाची काळजी आहे का? जरांगे पाटलांचे उपोषण सुटेपर्यंत का थांबला नाहीत, मग जे पक्षाचे काम करणाऱ्या, तुमच्यासारख्या पिकनिकवर न जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना दोष का द्यायचा, असा सवाल नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केला आहे. 

मला आशा आहे की आदित्य ठाकरे अटक टाळण्यासाठी कुठे बेपत्ता होणार नाहीत. सुशांत रजपूत प्रकरणाची कोर्टात लवकरच सुनावणी सुरु होईल, असेही राणे म्हणाले. इथे त्यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता बेबी पेंग्विन असे म्हटले आहे. यामुळे आदित्य ठाकरेंना अटक होणार का? ते देश सोडून जाणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Aditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे