शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी’, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 16:48 IST

Uddhav Thackeray Criticize Shinde Government: शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मराठवाड्यातील हिंगोली येथे जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मराठवाड्यातील हिंगोली येथे जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली. तसेच सरकारकडून सध्या सुरू असलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाचीही खिल्ली उडवली. सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

हिंगोली येथील जाहीर सभेमध्ये शिंदे सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज शेतकरी हवालदील आहे आणि सरकार फिरतंय. इथे सभा सुरू असताना शेजारी एक कार्यक्रम होता. सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी. हे थापा मारणारं सरकार आहे. थापाच थापा, असा टोला त्यांनी लगावला. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, इथल्या शेतकऱ्याला अतिवृष्टी झाली त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. तुमच्या आसपास कुणी असतील तर त्यांना विचारा अतिवृष्टी झाली होती, त्याचे पैसे मिळाले होते का. आता दुष्काळ आहे. किती पेरण्या केल्या आहेत तुम्ही. मला कळतच नाही आहे की, या शेतकऱ्याचा गुन्हा काय आहे. सरकार बदलल्यानंतर एक अस्मानी संकट समजू शकतो. पण या गद्दारांची जी सुलतानी आली आहे, या सुलतानीचं संकट हे त्याही पेक्षा मोठं आहे.

एका बाजूला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आला आहे. जे जे शेतकऱ्यांच्या हिताचं असेल ते चिरडून टाकायचं, हे इथे बसलेले आणि दिल्लीत बसलेले यांचे मायबाप करत आले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी इथे नसला तरी सांगतो. सरकारने या विषयात मध्यस्थी केली पाहिजे. निर्यात शुल्क वाढवलं. शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळत असतील तर ते मिळवून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. तसेच जो ग्राहक आहे त्याला परवडणाऱ्या दरात तो देण्याचं कामही सरकारनं केलं पाहिजे. पण सरकार काही बघायला तयार नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेHingoliहिंगोली