शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी’, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 16:48 IST

Uddhav Thackeray Criticize Shinde Government: शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मराठवाड्यातील हिंगोली येथे जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मराठवाड्यातील हिंगोली येथे जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली. तसेच सरकारकडून सध्या सुरू असलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाचीही खिल्ली उडवली. सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

हिंगोली येथील जाहीर सभेमध्ये शिंदे सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज शेतकरी हवालदील आहे आणि सरकार फिरतंय. इथे सभा सुरू असताना शेजारी एक कार्यक्रम होता. सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी. हे थापा मारणारं सरकार आहे. थापाच थापा, असा टोला त्यांनी लगावला. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, इथल्या शेतकऱ्याला अतिवृष्टी झाली त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. तुमच्या आसपास कुणी असतील तर त्यांना विचारा अतिवृष्टी झाली होती, त्याचे पैसे मिळाले होते का. आता दुष्काळ आहे. किती पेरण्या केल्या आहेत तुम्ही. मला कळतच नाही आहे की, या शेतकऱ्याचा गुन्हा काय आहे. सरकार बदलल्यानंतर एक अस्मानी संकट समजू शकतो. पण या गद्दारांची जी सुलतानी आली आहे, या सुलतानीचं संकट हे त्याही पेक्षा मोठं आहे.

एका बाजूला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आला आहे. जे जे शेतकऱ्यांच्या हिताचं असेल ते चिरडून टाकायचं, हे इथे बसलेले आणि दिल्लीत बसलेले यांचे मायबाप करत आले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी इथे नसला तरी सांगतो. सरकारने या विषयात मध्यस्थी केली पाहिजे. निर्यात शुल्क वाढवलं. शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळत असतील तर ते मिळवून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. तसेच जो ग्राहक आहे त्याला परवडणाऱ्या दरात तो देण्याचं कामही सरकारनं केलं पाहिजे. पण सरकार काही बघायला तयार नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेHingoliहिंगोली