शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी’, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 16:48 IST

Uddhav Thackeray Criticize Shinde Government: शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मराठवाड्यातील हिंगोली येथे जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मराठवाड्यातील हिंगोली येथे जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली. तसेच सरकारकडून सध्या सुरू असलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाचीही खिल्ली उडवली. सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

हिंगोली येथील जाहीर सभेमध्ये शिंदे सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज शेतकरी हवालदील आहे आणि सरकार फिरतंय. इथे सभा सुरू असताना शेजारी एक कार्यक्रम होता. सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी. हे थापा मारणारं सरकार आहे. थापाच थापा, असा टोला त्यांनी लगावला. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, इथल्या शेतकऱ्याला अतिवृष्टी झाली त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. तुमच्या आसपास कुणी असतील तर त्यांना विचारा अतिवृष्टी झाली होती, त्याचे पैसे मिळाले होते का. आता दुष्काळ आहे. किती पेरण्या केल्या आहेत तुम्ही. मला कळतच नाही आहे की, या शेतकऱ्याचा गुन्हा काय आहे. सरकार बदलल्यानंतर एक अस्मानी संकट समजू शकतो. पण या गद्दारांची जी सुलतानी आली आहे, या सुलतानीचं संकट हे त्याही पेक्षा मोठं आहे.

एका बाजूला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आला आहे. जे जे शेतकऱ्यांच्या हिताचं असेल ते चिरडून टाकायचं, हे इथे बसलेले आणि दिल्लीत बसलेले यांचे मायबाप करत आले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी इथे नसला तरी सांगतो. सरकारने या विषयात मध्यस्थी केली पाहिजे. निर्यात शुल्क वाढवलं. शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळत असतील तर ते मिळवून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. तसेच जो ग्राहक आहे त्याला परवडणाऱ्या दरात तो देण्याचं कामही सरकारनं केलं पाहिजे. पण सरकार काही बघायला तयार नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेHingoliहिंगोली