शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेच महत्त्वाची घोषणा करतील -विनायक राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 14:46 IST

नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हे केंद्र सरकारचे पाप आहे. या पापात दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. केवळ भारतीय कंपन्यांचाच हा प्रकल्प असेल, १०० टक्के सहभाग केंद्र सरकारचा असेल असे सांगितले होते.

रत्नागिरी  - नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हे केंद्र सरकारचे पाप आहे. या पापात दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. केवळ भारतीय कंपन्यांचाच हा प्रकल्प असेल, १०० टक्के सहभाग केंद्र सरकारचा असेल असे सांगितले होते. पण हा प्रकल्प भारतीय कंपनीचा नसून सौदी अरेबियातील कंपनीच्या हितासाठी हा प्रकल्प कोकणात आणला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज (रविवारी) रत्नागिरीतील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. रिफायनरीबाबत उद्या होणाऱ्या  उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते महत्वाची घोषणा करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होणाऱ्या  रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी आपण प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी सागवे - कात्रादेवी येथे सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी विनायक राऊत यांनी सांगितले की, कोकणात यापूर्वीही प्रदूषणकारी प्रकल्प आले आहेत. एन्रॉन, अणुऊर्जा या प्रकल्पांपेक्षाही रिफायनरी हा सर्वात मोठा प्रदूषणकारी प्रकल्प आहे. या प्रकल्पाची राज्यालाच काय पण देशालाही गरज नाही. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. शिवसेनेनेही सुरूवातीपासून या प्रकल्पाला विरोध केला आहे. शिवसेना ग्रामस्थांसमवेतच असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सभेची सर्वांनाच उत्सुकता आहे. हा प्रकल्प शिवसेनाच रद्द करू शकतात हा विश्वास जनतेला आहे. त्यांच्या आगमनामुळे येथील ग्रामस्थांची असणारी एकीची वज्रमूठ फोडायची, ग्रामस्थांमध्ये दुही माजवायची, आंदोलनात फाटाफूट करायची यासाठी प्रकल्पाचे समर्थक कामाला लागले आहेत, असा आरोपही खासदार राऊत यांनी यावेळी केला. प्रकल्प समर्थकांच्या माध्यमातून सभेवर बहिष्कार टाकण्याची अफवा पसरविण्याचे काम केले जात आहे. मात्र, या सभेला येथील ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, या सभेला प्रत्येक घरातील व्यक्ती उपस्थित राहणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे वृत्त खोटे असल्याचेही त्यांनी सांगितले.

राधाकृष्ण विखे पाटील स्वार्थी

काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील हे एक नंबरचे लबाड आणि स्वार्थी आहेत. रिफायनरी प्रकल्प म्हणजे सेना-भाजप यांची मॅच फिक्सिंग असल्याचा जावई शोध त्यांनी लावला आहे. त्यांची राजकीय कारर्किदच फिक्सिंगमध्येच गेली आहे. काँग्रेसच्या काळात झालेले गैरव्यवहार दाबण्यासाठीच त्यांची भाजपशी झालेली फिक्सिंग सर्वांना माहित आहे. त्यांनी आपले काळे मांजर आडवे आणू नये, असा उपरोधिक टोला विनायक राऊत यांनी हाणला.

मुख्यमंत्री दिल्लीचे लाचार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दिल्लीकर्त्यांचे लाचार झाले आहेत. दिल्लीतील नेत्यांचे ते लाचार झाल्याने जनतेला दिलेल्या वचनांचा त्यांना विसर पडला आहे. शिवसेना सत्तेत राहूनही सरकारव अंकुश ठेवू शकते हे दाखवून देण्यासाठीच शिवसेना अजून सत्तेत असल्याचे विनायक राऊत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVinayak Rautविनायक राऊत Uddhav Thackerayउद्धव ठाकरे