शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेच महत्त्वाची घोषणा करतील -विनायक राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 14:46 IST

नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हे केंद्र सरकारचे पाप आहे. या पापात दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. केवळ भारतीय कंपन्यांचाच हा प्रकल्प असेल, १०० टक्के सहभाग केंद्र सरकारचा असेल असे सांगितले होते.

रत्नागिरी  - नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हे केंद्र सरकारचे पाप आहे. या पापात दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. केवळ भारतीय कंपन्यांचाच हा प्रकल्प असेल, १०० टक्के सहभाग केंद्र सरकारचा असेल असे सांगितले होते. पण हा प्रकल्प भारतीय कंपनीचा नसून सौदी अरेबियातील कंपनीच्या हितासाठी हा प्रकल्प कोकणात आणला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज (रविवारी) रत्नागिरीतील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. रिफायनरीबाबत उद्या होणाऱ्या  उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते महत्वाची घोषणा करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होणाऱ्या  रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी आपण प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी सागवे - कात्रादेवी येथे सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी विनायक राऊत यांनी सांगितले की, कोकणात यापूर्वीही प्रदूषणकारी प्रकल्प आले आहेत. एन्रॉन, अणुऊर्जा या प्रकल्पांपेक्षाही रिफायनरी हा सर्वात मोठा प्रदूषणकारी प्रकल्प आहे. या प्रकल्पाची राज्यालाच काय पण देशालाही गरज नाही. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. शिवसेनेनेही सुरूवातीपासून या प्रकल्पाला विरोध केला आहे. शिवसेना ग्रामस्थांसमवेतच असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सभेची सर्वांनाच उत्सुकता आहे. हा प्रकल्प शिवसेनाच रद्द करू शकतात हा विश्वास जनतेला आहे. त्यांच्या आगमनामुळे येथील ग्रामस्थांची असणारी एकीची वज्रमूठ फोडायची, ग्रामस्थांमध्ये दुही माजवायची, आंदोलनात फाटाफूट करायची यासाठी प्रकल्पाचे समर्थक कामाला लागले आहेत, असा आरोपही खासदार राऊत यांनी यावेळी केला. प्रकल्प समर्थकांच्या माध्यमातून सभेवर बहिष्कार टाकण्याची अफवा पसरविण्याचे काम केले जात आहे. मात्र, या सभेला येथील ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, या सभेला प्रत्येक घरातील व्यक्ती उपस्थित राहणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे वृत्त खोटे असल्याचेही त्यांनी सांगितले.

राधाकृष्ण विखे पाटील स्वार्थी

काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील हे एक नंबरचे लबाड आणि स्वार्थी आहेत. रिफायनरी प्रकल्प म्हणजे सेना-भाजप यांची मॅच फिक्सिंग असल्याचा जावई शोध त्यांनी लावला आहे. त्यांची राजकीय कारर्किदच फिक्सिंगमध्येच गेली आहे. काँग्रेसच्या काळात झालेले गैरव्यवहार दाबण्यासाठीच त्यांची भाजपशी झालेली फिक्सिंग सर्वांना माहित आहे. त्यांनी आपले काळे मांजर आडवे आणू नये, असा उपरोधिक टोला विनायक राऊत यांनी हाणला.

मुख्यमंत्री दिल्लीचे लाचार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दिल्लीकर्त्यांचे लाचार झाले आहेत. दिल्लीतील नेत्यांचे ते लाचार झाल्याने जनतेला दिलेल्या वचनांचा त्यांना विसर पडला आहे. शिवसेना सत्तेत राहूनही सरकारव अंकुश ठेवू शकते हे दाखवून देण्यासाठीच शिवसेना अजून सत्तेत असल्याचे विनायक राऊत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVinayak Rautविनायक राऊत Uddhav Thackerayउद्धव ठाकरे