शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Uddhav Thackeray: "१२ कोटी लसीचे डोस एकरकमी चेकने खरेदी करू, पण केंद्रानं लक्ष घालून लस पुरवठा करावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 21:54 IST

CM Uddhav Thackeray on Corona Vaccination: लसीचा साठा येईल तसं लसीकरण होईल. अँपवर नोंदणी करून जिथे केंद्र असतील तिथे लस दिली जाईल

ठळक मुद्देआज राज्यात मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्या आहेत. कुठेही गोंधळ करू नका. १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ६ कोटी नागरिकांसाठी १२ कोटी लसींच्या डोसची गरज आहे केंद्राने यामध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त लसीचा पुरवठा करून दिला तर लसीकरणाच्या माध्यमातून कोविडला मात केल्याशिवाय राहणार नाही

मुंबई – ज्या ज्या कंपन्यांना लस वितरणाची परवानगी मिळेल त्यांच्याशी राज्य सरकार संवाद साधत आहे. सध्या २ कंपन्यांच उत्पादनाची परवानगी आहे. ४५ वयोगटावरील लसीकरणासाठी डोसचा साठा नियमित पणाने केंद्राने कराव्या. राज्याची तयारी १२ कोटी डोस देण्याची आहे. १८ लाख या महिन्यात डोस मिळतील सांगितलं आहे. ३ लाख पोहचले आहे. पण थांबता येणार नाही. लसीकरणाचा पहिला डोस देऊन नागरिकांना सुरक्षित करायला लागेल. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उद्यापासून जसे डोस येतील तसे देण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.(CM Uddhav Thackery on Corona Vaccine)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, लसीचा साठा येईल तसं लसीकरण होईल. अँपवर नोंदणी करून जिथे केंद्र असतील तिथे लस दिली जाईल. लस उत्पादन मर्यादित स्वरुपात आहे. जून-जुर्लैपर्यंत लसीचा साठा वाढेल. पण तोपर्यंत लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. केंद्राबाहेर झालेली झुंबड पाहून मन सुन्न होतं. लसीकरणाचा साठा जसा येईल तसा दिला जाईल. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची जबाबदारी केंद्राने राज्यावर दिली आहे. ती पेलण्यासाठी राज्य सरकार समर्थ आहे. सर्व वयोगटातील नागरिकांना लस देण्याची तयारी आहे. सुरुवातीला गोंधळ उडतोय. ही लसीकरण केंद्र कोविड प्रसारक मंडळ होतंय का याची भीती वाटते. हात जोडून नम्र विनंती आहे. तुर्त ३ लाख लसी आल्या आहेत. त्याचे वितरण रुग्णसंख्या आणि लोकसंख्येच्या प्रमाणात केले आहे. गुरुवारी एका दिवसात ५ लाख डोस दिले आहेत असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत कुठेही गोंधळ करू नका. १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ६ कोटी नागरिकांसाठी १२ कोटी लसींच्या डोसची गरज आहे. ते एकरकमी चेकने खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. केंद्राने यामध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त लसीचा पुरवठा करून दिला तर लसीकरणाच्या माध्यमातून कोविडला मात केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

राज्यातील ऑक्सिजनची स्थिती

आज राज्यात मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्या आहेत. तसेच इतर छोटे उत्पादक मिळून राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १२७० टन इतकी आहे  जेएसडब्ल्यू स्टील यांनी अतिरिक्त ८० मे. टन उत्पादन वाढवले आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेला कोटा १७८४ टन इतका आहे.त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश आहे. राज्यात सध्या १६५० मेट्रीक टन ऑक्सिजन आवश्यकता आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यासाठी १८१४ मे.टन ऑक्सिजनचा कोटा निश्चित केलेला असला तरी प्रत्यक्षात कसा बसा १६५० मे.टन पर्यंत ऑक्सिजन राज्यास उपलब्ध होत आहे. विशाखापट्टणम येथून ७ टँकर घेऊन निघालेल्या विशेष रेल्वे व्दारा १०० टन ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाला.

"मी कुठेही कधीही राजकारण आणणार नाही, पण..."; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस