शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: १६ आमदार अपात्र झाले तर उरलेल्या २४ जणांचे काय? उल्हास बापटांनी 'कायद्याचे राजकारण' सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 13:42 IST

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: 16 आमदारांना अपात्र केले तर आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे, असा दावा शिंदे गट, भाजपा करत आहे. हे १६ आमदार अपात्र झाले तर उरलेले ४० पैकी आमदार आहेत त्यांचे काय?

२७ जूनला सर्वोच्च न्यायालयाच्या व्हेकेशन बेंचने राज्यपालांच्या बहुमत चाचणीला स्थगिती दिली नव्हती. २५ जूनला एका निर्णयाला स्थगिती दिली, २७ जूनला स्थगिती दिली, आता सर्वोच्च न्यायालय आपल्याच पीठाने हा निकाल दिला होता मग ते सांभाळून घेतली का, असा सवाल विचारला असता बापट यांनी नाही असे सांगितले. १४१ कलमाखाली ते जे निर्णय देतात ते खालच्या कोर्टावर बंधनकारक असतो, तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाना बंधनकारक नसतो. अनेक खटल्यांत सर्वोच्च न्यायालयाने आपले निर्णय बदललेले आहेत, असे म्हटले.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ...तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील; उल्हास बापटांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी महत्वाचे विधानलोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी लोकमत डॉट कॉमवर ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांची मुलाखत घेतली. यावेळी बापट यांनी काही शक्यता वर्तविल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या दोन-तीन दिवसांत येण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तविली आहे. 

राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश देऊन काही घटनात्मक गैरवापर केला असेल, ही बाब लक्षात आली तर कोर्ट सध्याचे सरकार बरखास्त करू शकते का? यावर सरकार बरखास्त करण्याचे अधिकार राज्यातील आणीबाणी ३५६ कलमानुसार आणि ३५५ कलमानुसार केंद्र सरकार राज्यातील सरकार योग्य काम करतेय का हे पाहू शकत. न्यायालय बरखास्त करू शकत नाही, असे बापट म्हणाले. सर्वोच्च न्यायालय पूर्वीची स्थिती आणण्याचा निर्णय देणेच योग्य ठरेल, राज्यपालांना १५६, १५५ कलमांनुसार पंतप्रधान नेमतात, ते काढून पण टाकू शकतात. यामुळे राज्यपाल पंतप्रधानांचे पाय धरून असतात. राज्यपाल ९० टक्के निर्णय हे राजकीयच घेतात. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख म्हणून नाही तर बायस वागतात, हे माझे मत आहे, असे बापट म्हणाले. 

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: १६ आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत नाही; बापटांनी सांगितला 'त्यांच्या' मनातला निकाल

आम्ही काही फुटलेले नाहीय, शिवसेनेत दोन गट पडलेले आहेत, यामुळे पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही असा युक्तीवाद शिंदेंच्या वकिलांनी केला होता. ते सर्वोच्च न्यायालय मान्य करेल का? यावर बापटांनी हा युक्तीवाद हास्यास्पद होता असे म्हटले आहे. साळवेंनी केलेला युक्तीवाद घटनेमध्ये दोन व्याख्या आहेत. त्यानुसार मुख्य पक्ष आणि विधिमंडळ पक्ष असे दोन गोष्टी असतात. वकील आहेत ते ज्यांच्याकडून पैसे घेतात त्यांच्या बाजुनेच बोलतात, देशाच्या भल्यासाठी घेत नाहीत. पालखीवाला यांनी इंदिरा गांधींची केस नाकारलेली. अशा प्रकारचे वकील आज नाहीत. एखादा आमदार, खासदार पक्षाच्या प्रतिमेवर निवडून येतो. त्याने बाहेर पडायचे असेल तर राजीनामा द्यावा, निवडणूक आयोगाने देखील माझ्यामते चुकीचा निकाल दिला आहे. घातक प्रथा सुरु झाली आहे. निवृत्त झाल्यावर अधिकाऱ्याला जी सरकारी नोकरी मिळते त्यावर बंदी घातली गेली पाहिजे. ते केले नाही तर ही प्रथा घातकी ठरेल असेही बापट म्हणाले. 

16 आमदारांना अपात्र केले तर आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे, असा दावा शिंदे गट, भाजपा करत आहे. हे १६ आमदार अपात्र झाले तर उरलेले ४० पैकी आमदार आहेत त्यांचे काय? या सवालावर बापट यांनी १६ अपात्र झाले तर उरलेले सगळे अपात्र ठरणार हे उघड आहे. १६ मध्ये डॉ. एकनाथ शिंदे आहेत. २००३ मध्ये जी ९१ वी घटनादुरुस्ती झाली तर या कायद्यानुसार अपात्र झालेला मंत्री पदावर राहू शकत नाही. शिंदेंना देखील राजीनामा द्यावा लागेल. मग हे जे उरलेले आहेत ते त्याच गटात राहतील असे नाही, असे बापट म्हणाले. तसेच राजकारणावर मी भाष्य करत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना