शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
2
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
3
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
4
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
5
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
7
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
8
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
9
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
10
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
11
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
12
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
13
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
14
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
15
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
16
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
17
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
18
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
19
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
20
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 09:35 IST

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Face to Face: उद्धव ठाकरे आल्यानंतर सर्वच नेत्यांनी आसनांवरून उठून सन्मान केला. यावेळी एकनाथ शिंदेही आसनावरून उठल्याचे दिसले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना बुधवारी निरोप देण्यात आला. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर फोटोसेशन ठेवले होते. यादरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा प्रकर्षाने पाहायला मिळाले.

 निरोप समारंभ  फोटोसेशनसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे असे सगळे खुर्च्यांवर बसले होते. 

पलीकडच्या खुर्चीवरउद्धव ठाकरे आल्यानंतर सर्वच नेत्यांनी आसनांवरून उठून सन्मान केला. यावेळी एकनाथ शिंदेही आसनावरून उठल्याचे दिसले. मात्र, समोरासमोर येऊनही ठाकरे-शिंदे यांनी एकमेकांकडे बघणे टाळले. नीलम गोऱ्हे या शिंदे यांच्या शेजारच्या खुर्चीवर होत्या. प्रोटोकॉलनुसार बसण्याची व्यवस्था होती. तरीही ठाकरे आल्यानंतर गोऱ्हे यांनी उठून शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीवर बसण्याची विनंती त्यांना केली. मात्र, गोऱ्हे यांची ही विनंती नाकारत ठाकरे पलीकडच्या खुर्चीवर जाऊन बसले.  

फडणवीसांशी संवादउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. पण, एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे तसेच त्यांच्या शेजारीही बसणे टाळले.

आजही मित्रपक्ष पण.. दानवे मूळचे भाजपातले आहेत. काही कारणांमुळे पक्षाने त्यांना सोडले. त्यामुळे ते त्यावेळचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेत गेले. खरे तर शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष आहे. मात्र, आता त्यात थोडे बदल झाले आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय अध्यक्षच घेतीलविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आल्याने अनिल परब पुढील तयारी करा. विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभेत अध्यक्ष आणि विधान परिषदेत सभापती निर्णय घेतात. विरोधी पक्ष ठरवेल ते आम्हाला मान्य असणार आहे. पण, सभापती आणि अध्यक्षांना मान्य असेल तरच त्याचा अंतिम निर्णय होईल. ते सर्वोच्च स्थानी आहेत. मुख्यमंत्री कितीही मोठा असला तरी अध्यक्ष व सभापती यांनी सांगितले तरी त्यांनाही ऐकावेच लागते, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निरोपाच्या भाषणात स्पष्ट केले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेvidhan sabhaविधानसभाVidhan Parishadविधान परिषद