शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वाढला"; प्रकाश आंबेडकरांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 12:36 IST

खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

Prakash Ambedkar on Shiv Sena : शिवसेना पक्ष कुणाचा या वादावरुन गेल्या अडीच वर्षापासून राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये दावे प्रतिदावे केला जात आहे. दोन्ही पक्षाचे प्रमुख आणि नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे विधान केले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना मिळालेल्या यशावरुन प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं.

खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तर उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा मुस्लिम समाजामुळे वाढल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते. मात्र आता प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर ठाकरे गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील स्ट्राईक बघितला तर शिंदेचा स्ट्राईक रेट डबल आहे. शिवसेनेची मते ही एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना शिवसैनिक खरी शिवसेना मानत आहे. उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा आरक्षण आणि मुस्लिम समाजामुळे वाढला आहे," असं  प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

"प्रकाश आंबेडकर हे विद्वान आहेत. पण त्यांची प्रज्ञा नेहमी नेहमी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या हरवलेली असते. ती अशीच हरवते म्हणून प्रकाश आंबेडकर कायमचे राजकारणात वंचित राहिले आहेत.  दुसऱ्याच्या पायात खोडा घालणं एवढंच त्यांचे काम आहे. स्वतः एकही जागा जिंकू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे याबाबत आश्चर्य आहे. कदाचित त्यांचे डोळे उघडले तर महाराष्ट्राच्या विकासासाठी हातात हात देऊन पुढे जाणे, क्षणभर थोडं मागे राहणे आणि अट्टाहास न करणे, त्याग करणे ही मूलभूत तत्वे त्यांनी स्विकारली तर खूप काही घडू शकतं," असे अरविंद सावंत यांनी म्हटलं.

राज ठाकरेंवर टाडा लावला पाहिजे - प्रकाश आंबेडकर

"महाराष्ट्रातील माणूस हा देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो. मध्यप्रदेश गुजरात मध्येही राहतो. त्यांचं काय करायचं? त्यामुळे राज ठाकरे यांचे वक्तव्य समाज दुभंगण्याचे वक्तव्य आहे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यांना युएपीए आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा ताबडतोब लागला पाहिजे. अशा व्यक्तींना सरळसरळ टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न बघता अशांना आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. त्यामुळे ही हिम्मत सरकारने दाखवावी," असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना