शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

"उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वाढला"; प्रकाश आंबेडकरांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 12:36 IST

खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

Prakash Ambedkar on Shiv Sena : शिवसेना पक्ष कुणाचा या वादावरुन गेल्या अडीच वर्षापासून राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये दावे प्रतिदावे केला जात आहे. दोन्ही पक्षाचे प्रमुख आणि नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे विधान केले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना मिळालेल्या यशावरुन प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं.

खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तर उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा मुस्लिम समाजामुळे वाढल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते. मात्र आता प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर ठाकरे गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील स्ट्राईक बघितला तर शिंदेचा स्ट्राईक रेट डबल आहे. शिवसेनेची मते ही एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना शिवसैनिक खरी शिवसेना मानत आहे. उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा आरक्षण आणि मुस्लिम समाजामुळे वाढला आहे," असं  प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

"प्रकाश आंबेडकर हे विद्वान आहेत. पण त्यांची प्रज्ञा नेहमी नेहमी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या हरवलेली असते. ती अशीच हरवते म्हणून प्रकाश आंबेडकर कायमचे राजकारणात वंचित राहिले आहेत.  दुसऱ्याच्या पायात खोडा घालणं एवढंच त्यांचे काम आहे. स्वतः एकही जागा जिंकू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे याबाबत आश्चर्य आहे. कदाचित त्यांचे डोळे उघडले तर महाराष्ट्राच्या विकासासाठी हातात हात देऊन पुढे जाणे, क्षणभर थोडं मागे राहणे आणि अट्टाहास न करणे, त्याग करणे ही मूलभूत तत्वे त्यांनी स्विकारली तर खूप काही घडू शकतं," असे अरविंद सावंत यांनी म्हटलं.

राज ठाकरेंवर टाडा लावला पाहिजे - प्रकाश आंबेडकर

"महाराष्ट्रातील माणूस हा देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो. मध्यप्रदेश गुजरात मध्येही राहतो. त्यांचं काय करायचं? त्यामुळे राज ठाकरे यांचे वक्तव्य समाज दुभंगण्याचे वक्तव्य आहे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यांना युएपीए आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा ताबडतोब लागला पाहिजे. अशा व्यक्तींना सरळसरळ टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न बघता अशांना आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. त्यामुळे ही हिम्मत सरकारने दाखवावी," असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना