शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

"RSSचे भैय्याजी जोशी 'चिल्लर' आहेत असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं"; उद्धव ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:07 IST

Uddhav Thackeray vs RSS Bhaiyyaji Joshi, Marathi in Mumbai: मुंबईत मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही, असे विधान भैय्याजी जोशींनी घाटकोपरमध्ये काल केले.

Uddhav Thackeray vs RSS Bhaiyyaji Joshi, Marathi in Mumbai: घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे असं नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवकर संघाचे भैय्याजी जोशी यांनी नुकतेच केले. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही आव्हान दिले.

भैय्याजी जोशींना 'चॅलेंज'

"ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला असा समज असणारे काही लोक सध्या वावरत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठी भाषा बोलता येणं गरजेचं नाही असं विधान केलं. हा संघाचा आणि भाजपाचा छुपा अजेंडा आहे. हे लोक आता मराठी - अमराठी, मराठा - मराठेतर असे विभाजन करून वाद निर्माण करू पाहत आहेत," असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. भैय्याजी जोशी यांचा उल्लेख अनाजी पंत असा करत ठाकरे म्हणाले, "मी आव्हान देतो की, अशी भाषा त्यांनी अहमदाबाद, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, बंगाल या ठिकाणी करून दाखवावी आणि तिथून सुखरूप परत येऊन दाखवावं. मराठी माणूस दयाशील आणि सहृदय आहे. मराठी लोक आम्हाला मतंच देणारच आहेत, असा विचार संघ-भाजपावले करतात आणि त्यामुळे ते मराठी माणसाला खिजगणतीत धरत नाहीत."

"राज्यांची जशी भाषावार प्रांतरचना केली गेली, तशी मुंबईची भाषावर गल्लीरचना करण्याचा घाट घातला जातोय. तोडा, फोडा आणि राज्य करा ही विकृत मानसिकता यानिमित्ताने सर्वांसमोर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सभागृहात म्हणाले की कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, तसंच मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की भैय्याजी जोशी हा चिल्लर माणूस आहे," असे आव्हान ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले. "मविआचे सरकार असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची करण्यात आली होती. त्यामुळे या भैय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा. एकावर कायद्याचा बडगा उगारला की यापुढे इतर कोणाचीही बोलण्याची हिंमत होणार नाही," असेही ठाकरे म्हणाले.

मुंबई ही महानगरी आहे. ती जिंकायची असेल तर चांगली कामं करून जिंका. वाद आणि वाट लावून पळून जावू नका. पण मराठीवर कुणीही आघात करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही कायम त्यांच्याविरोधात लढा देऊ.

भैय्याजी जोशी काय म्हणाले?

"मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. " असं वक्तव्य जोशी यांनी केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmarathiमराठी