शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

"RSSचे भैय्याजी जोशी 'चिल्लर' आहेत असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं"; उद्धव ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:07 IST

Uddhav Thackeray vs RSS Bhaiyyaji Joshi, Marathi in Mumbai: मुंबईत मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही, असे विधान भैय्याजी जोशींनी घाटकोपरमध्ये काल केले.

Uddhav Thackeray vs RSS Bhaiyyaji Joshi, Marathi in Mumbai: घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे असं नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवकर संघाचे भैय्याजी जोशी यांनी नुकतेच केले. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही आव्हान दिले.

भैय्याजी जोशींना 'चॅलेंज'

"ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला असा समज असणारे काही लोक सध्या वावरत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठी भाषा बोलता येणं गरजेचं नाही असं विधान केलं. हा संघाचा आणि भाजपाचा छुपा अजेंडा आहे. हे लोक आता मराठी - अमराठी, मराठा - मराठेतर असे विभाजन करून वाद निर्माण करू पाहत आहेत," असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. भैय्याजी जोशी यांचा उल्लेख अनाजी पंत असा करत ठाकरे म्हणाले, "मी आव्हान देतो की, अशी भाषा त्यांनी अहमदाबाद, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, बंगाल या ठिकाणी करून दाखवावी आणि तिथून सुखरूप परत येऊन दाखवावं. मराठी माणूस दयाशील आणि सहृदय आहे. मराठी लोक आम्हाला मतंच देणारच आहेत, असा विचार संघ-भाजपावले करतात आणि त्यामुळे ते मराठी माणसाला खिजगणतीत धरत नाहीत."

"राज्यांची जशी भाषावार प्रांतरचना केली गेली, तशी मुंबईची भाषावर गल्लीरचना करण्याचा घाट घातला जातोय. तोडा, फोडा आणि राज्य करा ही विकृत मानसिकता यानिमित्ताने सर्वांसमोर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सभागृहात म्हणाले की कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, तसंच मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की भैय्याजी जोशी हा चिल्लर माणूस आहे," असे आव्हान ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले. "मविआचे सरकार असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची करण्यात आली होती. त्यामुळे या भैय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा. एकावर कायद्याचा बडगा उगारला की यापुढे इतर कोणाचीही बोलण्याची हिंमत होणार नाही," असेही ठाकरे म्हणाले.

मुंबई ही महानगरी आहे. ती जिंकायची असेल तर चांगली कामं करून जिंका. वाद आणि वाट लावून पळून जावू नका. पण मराठीवर कुणीही आघात करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही कायम त्यांच्याविरोधात लढा देऊ.

भैय्याजी जोशी काय म्हणाले?

"मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. " असं वक्तव्य जोशी यांनी केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmarathiमराठी