शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

'नरेंद्र मोदी बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात येऊन पोळी भाजून गेले, हेच मी केलं असतं तर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 18:36 IST

'गळ्यात पट्टा घालून गुलामगिरी करणे आम्हाला जमत नाही. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला ते शिकवलं नाही.'

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत उत्तर भारतीयांसोबत बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी उत्तर भारतीयांच्या पाठिंब्यासाठी आवाहन केले. यावेळी त्यांनी उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या नात्यांवरही भाष्य केले. तसेच, त्यांनी भाजपवर हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुनही जोरदार प्रहार केला. 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक करण्यासाठी उत्तर भारतातून गागा भट्ट आले होते. आज आम्ही उत्तर भारतीयांमध्ये आलो आहोत अन् तिकडे छत्रपतींचा अपमान करणारा राज्याबाहेर जातोय. माझ्या मनात जो हेतू आहे, तो मोकळेपणाने म्हणतोय. तुमची साथ मागायला आलोय. आम्हाला युती तोडायला मजबूर केले. गळ्यात पट्टा घालून गुलामगिरी करणे आम्हाला जमत नाही. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला ते शिकवलं नाही. मी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलो म्हणजे हिंदूत्व सोडले नाही.'

ते पुढे म्हणतात, 'आज मी तुमच्यासोबत बोलतोय तर काहीजण म्हणतील हा उत्तर भारतीयांच्या मागे लागलाय. काल-परवा नरेंद्र मोदी आले आणि बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात आपली पोळी भाजून गेले. हेच मी केले असते तर हिंदूत्व सोडले, असे म्हटले असते. त्यांचे मन मोठे आणि माझे काय...पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. त्यांनी केलं तर माफ आणि मी केलं तर गुन्हा. आम्ही काय करायचं, ते तुम्ही सांगणारे कोण? 92-93 मध्ये आणि कोरोना काळात आमच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन मदत केली. त्यांनी कधीच हिंदू-मुस्लिम किंवा मराठी-अमराठी केलं नाही.' 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMuslimमुस्लीमShiv Senaशिवसेना