शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'नरेंद्र मोदी बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात येऊन पोळी भाजून गेले, हेच मी केलं असतं तर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 18:36 IST

'गळ्यात पट्टा घालून गुलामगिरी करणे आम्हाला जमत नाही. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला ते शिकवलं नाही.'

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत उत्तर भारतीयांसोबत बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी उत्तर भारतीयांच्या पाठिंब्यासाठी आवाहन केले. यावेळी त्यांनी उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या नात्यांवरही भाष्य केले. तसेच, त्यांनी भाजपवर हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुनही जोरदार प्रहार केला. 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक करण्यासाठी उत्तर भारतातून गागा भट्ट आले होते. आज आम्ही उत्तर भारतीयांमध्ये आलो आहोत अन् तिकडे छत्रपतींचा अपमान करणारा राज्याबाहेर जातोय. माझ्या मनात जो हेतू आहे, तो मोकळेपणाने म्हणतोय. तुमची साथ मागायला आलोय. आम्हाला युती तोडायला मजबूर केले. गळ्यात पट्टा घालून गुलामगिरी करणे आम्हाला जमत नाही. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला ते शिकवलं नाही. मी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलो म्हणजे हिंदूत्व सोडले नाही.'

ते पुढे म्हणतात, 'आज मी तुमच्यासोबत बोलतोय तर काहीजण म्हणतील हा उत्तर भारतीयांच्या मागे लागलाय. काल-परवा नरेंद्र मोदी आले आणि बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात आपली पोळी भाजून गेले. हेच मी केले असते तर हिंदूत्व सोडले, असे म्हटले असते. त्यांचे मन मोठे आणि माझे काय...पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. त्यांनी केलं तर माफ आणि मी केलं तर गुन्हा. आम्ही काय करायचं, ते तुम्ही सांगणारे कोण? 92-93 मध्ये आणि कोरोना काळात आमच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन मदत केली. त्यांनी कधीच हिंदू-मुस्लिम किंवा मराठी-अमराठी केलं नाही.' 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMuslimमुस्लीमShiv Senaशिवसेना