शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

Uddhav Thackeray Resigns: काय भाषण... केवढा संयम... काय जिगर...; उद्धव ठाकरेंनी जाता जाता मनं जिंकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 09:25 IST

Uddhav Thackeray Resigns: राज्यात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर काल रात्री अखेर पडदा पडला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

Uddhav Thackeray Resigns: राज्यात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर काल रात्री अखेर पडदा पडला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेंसारख्या प्रबळ नेत्यानं बंडाचं निशाण फडकावल्यामुळे शिवसेनेनं इतिहासातील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाचा सामना केला. संयमी नेतृत्व म्हणून गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं गेलं. काल उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला आणि राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. आपल्याच पक्षातील निष्ठावंत नेत्यांनी साथ सोडल्यामुळे राजीनामा देण्याची वेळ आलेली असतानाही अजिबात चीडचीड न करता अत्यंत संयमी असं उद्धव ठाकरे यांचं कालचं भाषण होतं, अशा प्रतक्रिया सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत. 

राज्यातील राजकीय घडामोडींचे LIVE UPDATES येथे क्लिक करा

उद्धव ठाकरेंनी भाषणात दाखवलेल्या संयमी आणि शांतपणाचं सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसंच आपल्या पक्षप्रमुखावर नामुष्की ओढावल्यामुळे आक्रमक शिवसैनिकांची समजूत काढणं आणि रस्त्यावर न उतरण्याचं आवाहन करणं याबद्दलही उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचं सोशल मीडियात स्वागत केलं जात आहे. काहींनी तर आपल्या विरोधात परिस्थिती असल्यामुळे राजीनामा देण्याची वेळ आल्यावर देखील निरोपाचं भाषण कसं असावं याचं उद्धव ठाकरेंच कालचं संबोधन उत्तम उदाहरण असल्याचंही म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे नेहमी आमच्या मनात राहतील. महाराष्ट्रानं गेल्या अडीच वर्षात आजवरचा सर्वात संयमी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री पाहिला, असंही काही नेटिझन्सनं म्हटलं आहे. तर काहींनी आपल्या मनाविरुद्ध साऱ्या गोष्टी घडत असतानाही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंनी लढा दिला. त्यामुळे लढवय्या नेतृत्त्व कसं असावं हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं असल्याचंही म्हटलं जात आहे. 

सत्ता संपली, संघर्ष सुरू! मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय त्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल

मुख्यमंत्रीपद जात असल्याची कल्पना आलेली असली तरी पक्षाची उद्दीष्ट आणि आश्वासनं पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केलेली धडपड याचंही नेटिझन्सना अप्रूप वाटत आहे. यात अखेरच्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करुन हिंदुत्व सिद्ध करुन दाखवलं आहे, असंही नेटिझन्स म्हणत आहेत. कॅबिनेट बैठकीत सर्वांचं आभार प्रदर्शन करत अडीच वर्षात काही चूक झाली असेल तर त्याबद्दल माफी देखील उद्धव ठाकरेंनी मागितली. 

दगा झाला...सरकार कोसळलं तरी बंडखोरांना आवाहनआपल्याच माणसांनी बंडखोरी केली आणि त्याचं रुपांतर सरकार कोसळण्यात झालं. एका क्षणात सरकार गेलं. पक्षातील नेते बंडखोरांचा कडक शब्दांत निषेध व्यक्त करू लागले. इतकं सगळं झालेलं असतानाही उद्धव ठाकरेंनी कालच्या फेसबुक लाइव्हमध्येही बंडखोरांना पुन्हा एकदा समोर येऊन चर्चा करण्याबाबत विनंतीपूर्वक आवाहन केलं. याबाबतही नेटिझन्समध्ये उद्धव ठाकरेंबाबत कमालीची सहानुभूती व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ