शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray PC: मला का मुख्यमंत्री बनायला लावलं?; उद्धव ठाकरेंचा भाजपाला उद्विग्न सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 14:53 IST

ठरवलेले घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. पाठीत वार करून शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला हा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण केला जातोय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

मुंबई - राज्याच्या राजकारणात झालेल्या सत्तानाट्यात गुरुवारी शिंदे गट आणि भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाराजीनाट्यात नवा ट्विस्ट निर्माण झाला. अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिल्याने सर्वांनाच धक्का बसला. या सर्व घडामोडीत उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केले. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याप्रकारे हे सरकार स्थापन झाले, ज्याने सरकार स्थापन केले त्याच्या मते तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. पण मी हेच अडीच वर्षापूर्वी सांगितले होते. माझं आणि अमित शाहांचे ठरले होते. शिवसेना-भाजपाने अडीच अडीच वर्षाचा काळ वाटून घ्यावा. पहिल्या अडीच वर्षात दोघांपैकी एकाचा मुख्यमंत्री झाला असता. मग त्यावेळेला नकार देऊन आता हे का केले हे माझ्यासह राज्यातील जनतेला प्रश्न पडला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. लोकसभा-विधानसभा आपण एकत्र लढवली. लोकसभेपूर्वी जे काही ठरले होते तेच झाले असते. आताची जोडगोळीने अडीच वर्ष पूर्ण केले असते. जे काही आज घडले ते सन्मानाने झाले असते. मग मला मध्ये मुख्यमंत्री कशाला बनायला लावलं? ठरवलेले घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. पाठीत वार करून शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला हा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण केला जातोय. पण हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले

शिवसेना-शिंदे गटात संघर्ष शिवसेनेच्या तब्बल ३९ आमदारांनासोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपाने राज्यात सत्तास्थापन केली. शिंदे गटातील १६ आमदारांविरोधात निलंबनाची नोटीस पाठवली. मात्र शिंदे गटाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत उपाध्यक्षांवरच अविश्वास ठराव असल्याने ते नोटीस पाठवू शकत नाहीत अशी बाजू मांडली. या प्रकरणावर ११ जुलैला सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे