शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

फकीर झोळी लटकवून निघून जाईल, जनतेच्या हाती कटोरा देईल; उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 22:57 IST

Uddhav Thackeray Speech: एकनाथ खडसेंनी २०१४ मध्ये सांगितले होते, शिवसेनेशी आता युती होऊ शकत नाही. संपलेय सगळे. एकनाथ खडसे तेव्हा भाजपात होते, तेव्हा त्यांच्या गळ्यात हे टांगले गेले, ठाकरेंनी सांगितला तेव्हाचा प्रसंग.

जळगावच्या पाचोऱ्यामध्ये आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराणेशाहीविरोधातील भूमिकेवर ठाकरेंनी टीका केली. याचबरोबर पंतप्रधानांचा जवळचा मित्र जगातील दोन नंबरचा श्रीमंत कसा झाला, असा सवालही केला. 

मिंधे गटाच्या नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढणार आहे का? उद्धव ठाकरेंचे पाचोऱ्यातून आव्हान

आमचे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. मी घरी बसून सरकार चालविले, मी घरी बसून जे करू शकलो ते तुम्ही वणवण करून करू शकणार नाही. मी घरी बसून केले म्हणून ही माणसे आज आलीत. घराणेशाहीवर तुम्ही बोलताय ना, मी फकीर आहे, असे सांगत आहेत. तुमच्या मागे पुढे कोणी नाही. अरे कधीतरी झोळी लटकवून निघून जाल, माझ्या जनतेच्या हाती कटोरा देऊन. म्हणून घराणे चांगले लागते, असा टोला ठाकरे यांनी मोदींना लगावला. 

लवकरच निवडणुका लागतील. या गद्दाराला गाडायचे आहे. मी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तर म्हणे हिंदुत्व सोडले. मविआला तीन वर्षे झाली. कधी हिंदुत्व सोडले हे दाखवून द्या, मी आता हे व्यासपीठ सोडून जाईन. मुख्यमंत्री म्हणून मला शपथ घ्यावी लागली. आमदारांनाही घ्यावी लागते. हे लोक कोरोनात मंदिरे उघडा म्हणून थाळ्या आपटत बसले होते. मी हिंदुत्व सोडणार नाही, माझे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही. भाजपाने त्यांचे हिंदुत्व कोणते ते सांगावे. त्याना आगापिछा काहीच नाही, अशी टीका ठाकरेंनी केली. 

Uddhav Thackeray : मी हिंदुत्व कधी सोडले हे दाखवून द्या, आता हे व्यासपीठ सोडून जाईन; उद्धव ठाकरेंच ओपन चॅलेंज

एकनाथ खडसेंनी २०१४ मध्ये सांगितले होते, शिवसेनेशी आता युती होऊ शकत नाही. संपलेय सगळे. एकनाथ खडसे तेव्हा भाजपात होते, तेव्हा त्यांच्या गळ्यात हे टांगले गेले. भाजपाला तेव्हा शिवसेना नको होती. शिवसेना संपवायची होती. माझ्याकडे हा जो समोर दिसतोय हा पक्ष आहे. भारतात भाजपाशिवाय दुसरा पक्ष ठेवायचा नाही. सगळेच काही गुलाबोसारखे घाबरणारे नसतात, काही संजय राऊतांसारखे असतात. अनिल देशमुखांचेही तेच. यांच्याकडे जे भ्रष्टाचाऱाच्या आरोपात तिकडे गेले, गोमुत्राने अंघोळ केली आणि धुतले गेले, असा आरोप ठाकरे यांनी केला. 

महिलेची तक्रार घेतली जात नाही, उलट तिच्यावर गुन्हे दाखल केले जातायत. ठाण्यातील आमची बहीण तिला मारहाण करण्यात आली. ती मुलाबाळासाठी उपचार घेत होती. तिने व्हिडिओ काढून माफीही मागितली, तरी तिच्या पोटात लाथा मारण्यात आल्या. या रोशनी शिंदेला उपचार घेत असताना पोलीस बाहेर वाटच पाहत उभे होते, ती कधी बाहेर येते आणि तिला कधी तुरुंगात टाकतो. तिच्या मारहाणीवर आजवर गुन्हा दाखल झालेला नाहीय. उलट तिच्यावरच गुन्हा दाखल झालेत, असा आरोप ठाकरे यांनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा