शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ नंतर उलटं चक्र सुरू होईल तेव्हा...; संजय राऊतांचा शिंदे आणि भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:12 IST

राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला असं विधान राऊतांनी केले.

मुंबई - जामीन मिळू नये म्हणून पोलिसांवर दबाव, या ना त्या मार्गानं न्यायालयांवर दबाव असं करून कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवायचं. २०२४ नंतर उलटं चक्र सुरू होईल तेव्हा तुम्ही प्रश्न विचारू नका. तुम्ही जो मार्ग स्वीकारताय त्या मार्गानं आम्हालाही जाता येते असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षाला दिला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, सुरुवात तुम्ही केली आहे. अंत आम्ही करू.५ राज्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझारोम पण ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल त्यावर चर्चा करण्यापेक्षा ३ डिसेंबरला निकाल लागतील त्यावर बोलू.पण या ५ राज्यातील परिवर्तनाची दिशा २०२४ ला दिल्लीतील सत्ता परिवर्तनाकडे जाणार आहे. ज्यारितीने राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसनं वादळ निर्माण केले आहे ही २०२४ च्या परिवर्तनाची झलक आहे. काटे की टक्कर होतेय हीच मोठी गोष्ट आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा त्यांनी केली होती. परंतु राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला. पंतप्रधानांना ८-८ दिवस एका राज्यात राहावे लागतंय. देश वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारात फिरावं लागतंय. २०२४ ला काँग्रेसमुक्त नसून तुमच्यापासून भारताला मुक्ती मिळणार आहे त्याची हवा आहे. राजस्थानासह ४ राज्यात काँग्रेस पक्षाचे, इंडिया आघाडीचं सरकार बनेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

प्रफुल पटेलांच्या गौप्यस्फोटावर निशाणा

२००४ मध्ये शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी युती होणार होती. परंतु महाजन-ठाकरेंमुळे ही युती झाली नाही असं प्रफुल पटेल यांनी दावा केला होता.त्यावर संजय राऊतांनी सांगितले की, २००४ च्या घडामोडी, पडद्यामागे काय घडले, २००९, २०१४ आणि २०१९ ला काय झाले हे सोडून द्या. आज काय आहे त्यावर बोला. शरद पवार हे इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. ते भाजपासोबत जातील असं मला वाटत नाही.आता फुटून गेलेले लोक असतात काहीही आरोप करतात. ज्या गोष्टी अस्तित्वात नाही, कधी घडल्या नाहीत त्यावर हवेत गोळीबार करत राहतात. धुराची वलय सोडत बसा असा निशाणा राऊतांनी पटेलांवर साधला आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे