शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

...तर नामर्दांच्या अवलादींना आम्ही ठेचून काढू, उद्धव ठाकरेंचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 13:03 IST

गुन्हेगारांना पाठीमागे घातले जात असेल तर शिवसेनेला कायदा हातात घ्यायचा विचार करावा लागेल. गुन्हेगारांवर कारवाई झाली नाही तर अशा नामर्दाच्या अवलादींना शिवसेना आपल्या पद्धतीने ठेचून काढेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

अहमदनगर - शिवसैनिकांवर पाठीमागून हल्ले करणारे हे नामर्दाची अवलाद आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमने सामने येऊन वार करावा. जर अशा गुन्हेगारांना पाठीमागे घातले जात असेल तर शिवसेनेला कायदा हातात घ्यायचा विचार करावा लागेल. गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही तर अशा नामर्दाच्या अवलादींना शिवसेना आपल्या पद्धतीने ठेचून काढेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केडगाव दुहेरी हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांवर पाठीमागून हल्ले करणारे हे नामर्दाची अवलाद आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमने सामने येऊन वार करावा. जर अशा गुन्हेगारांना पाठीमागे घातले जात असेल तर शिवसेनेला कायदा हातात घ्यायचा विचार करावा लागेल. शिवसैनिकांचा हात अजून उठलेला नाही, जर तो उठला तर नामर्दांच्या अवलादीला ठेचून काढू."केडगाव दुहेरी हत्याकांडाचे बळी ठरलेल्या शिवसैनिकांच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. ''या हत्याकांडातील आरोपींना कोणतीही दयामाया दाखवण्यात येऊ नये. त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अधिकार वापरावा आणि आरोपींना फासावर चढवावे. आरोपी कोणत्याही पक्षाचे असला तरी त्यांना शासन झालेच पाहिजे,  छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून तुम्ही राज्यकारभार चालवणार असाल तर गुन्हेगारांना शिक्षा करा, अन्यथा महाराजांचे नाव घेऊ नका,'' असे उद्धव ठाकरे म्हणाले.   शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांबाबत मुख्यमंत्र्यांकडून स्वीकारण्यात आलेल्या पावित्र्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला, "राज्यात मुख्यमंत्रीच सहकारी मंत्र्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील तर हे सरकार निकम्मे आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट आहे. त्यामुळे राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असला पाहिजे, अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे." ''या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी कृष्णप्रकाश यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना इथे आणले पाहिजे. तसेच या प्रकरणी सरकारची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांना मी स्वत: फोन करणार आहे, त्यांच्याकडे ही केस सोपवली गेली पाहिजे.'' अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. लोकांवर दबाव टाकला जात आहे, असंच जर होत असेल तर आम्हाला इथे येऊन ठाण मांडावे लागेल आणि ही गुंडागर्दी मोडून काढावी लागेल.  शिवसेनेला कायदा हातात घेऊन प्रतिकार करण्याची वेळ आली तर तो करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडAhmednagarअहमदनगर