शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: सावरकरांचा अपमान, मालेगावमध्ये उद्धव ठाकरे कडाडले, राहुल गांधींना सुनावले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 21:08 IST

Uddhav Thackeray: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी आज मालेगावमध्ये झालेल्या सभेतून घणाघाती टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार आणि मोदी शाहांविरोधात कमालीचे आक्रमक झालेले आहेत. यादरम्यान, राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनाही लक्ष्य करून त्यांच्याबाबत वादग्रस्त विधानं करत आहेत. मात्र राहुल गांधींच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी आज मालेगावमध्ये झालेल्या सभेतून घणाघाती टीका केली आहे. राहुल गांधींना मी जाहीरपणे सांगतो की, सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान आम्हाला अजिबात पटणार नाही. आपण जरुर एकत्र आलोय ते या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी. त्याच्यामध्ये आता कुठे फाटे फुटू देऊ नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

सावरकरांच्या अपमाना्च्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की, राहुल गांधींना आम्हाला एक सांगायचं आहे. तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत गेलात. आम्ही तुमच्यासोबत होतो. संजय राऊत भारत जोडो यात्रेमध्ये तुमच्यासोबत सहभागी झाले होते. ही लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई आहे.  कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणे सांगतो की, सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही. अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे बजावले.

ते पुढे म्हणाले की, सावरकर काय होते हे केवळ आपण वाचू शकतो. पण सावरकरांनी काय केलं होतं. तेव्हाचा तो सगळा काळ जर डोळ्यांसमोर आणला, तर दिसेल की, चाफेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर १५ वर्षांचा मुलगा घरातल्या अष्टभूजा देवीसमोर शपथ घेतो, की देशासाठी देशाच्या शत्रूला चाफेकर बंधूंसारखा मारत मारत मरेन किंवा शिवछत्रपतींसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन.

सावरकरांचे वडील हे टिळक भक्त. सावरकरांनी जे काही केलं आहे ते येऱ्यागबाळ्याचे काम नाही.१४ वर्षे रोज मरण यातना भोगल्या. छळ सोसला. हे सुद्धा एकप्रकारे बलिदानच आहे. जसे क्रांतिकारक फाशी गेले. गोळ्या खावून बलिदान दिलं. तसंच १४ वर्षे मरणयातना सोसणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. म्हणून राहुल गांधींना सांगतो की, आपण जरुर एकत्र आलोय ते या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी. या देशाचं संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. त्याच्यामध्ये आता कुठे फाटे फुटू देऊ नका. तु्म्हाला डिवचलं जातंय. मात्र आता जर का वेळ चुकली तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, अशी चिंताही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर