शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

Uddhav Thackeray: सावरकरांचा अपमान, मालेगावमध्ये उद्धव ठाकरे कडाडले, राहुल गांधींना सुनावले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 21:08 IST

Uddhav Thackeray: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी आज मालेगावमध्ये झालेल्या सभेतून घणाघाती टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार आणि मोदी शाहांविरोधात कमालीचे आक्रमक झालेले आहेत. यादरम्यान, राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनाही लक्ष्य करून त्यांच्याबाबत वादग्रस्त विधानं करत आहेत. मात्र राहुल गांधींच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी आज मालेगावमध्ये झालेल्या सभेतून घणाघाती टीका केली आहे. राहुल गांधींना मी जाहीरपणे सांगतो की, सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान आम्हाला अजिबात पटणार नाही. आपण जरुर एकत्र आलोय ते या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी. त्याच्यामध्ये आता कुठे फाटे फुटू देऊ नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

सावरकरांच्या अपमाना्च्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की, राहुल गांधींना आम्हाला एक सांगायचं आहे. तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत गेलात. आम्ही तुमच्यासोबत होतो. संजय राऊत भारत जोडो यात्रेमध्ये तुमच्यासोबत सहभागी झाले होते. ही लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई आहे.  कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणे सांगतो की, सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही. अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे बजावले.

ते पुढे म्हणाले की, सावरकर काय होते हे केवळ आपण वाचू शकतो. पण सावरकरांनी काय केलं होतं. तेव्हाचा तो सगळा काळ जर डोळ्यांसमोर आणला, तर दिसेल की, चाफेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर १५ वर्षांचा मुलगा घरातल्या अष्टभूजा देवीसमोर शपथ घेतो, की देशासाठी देशाच्या शत्रूला चाफेकर बंधूंसारखा मारत मारत मरेन किंवा शिवछत्रपतींसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन.

सावरकरांचे वडील हे टिळक भक्त. सावरकरांनी जे काही केलं आहे ते येऱ्यागबाळ्याचे काम नाही.१४ वर्षे रोज मरण यातना भोगल्या. छळ सोसला. हे सुद्धा एकप्रकारे बलिदानच आहे. जसे क्रांतिकारक फाशी गेले. गोळ्या खावून बलिदान दिलं. तसंच १४ वर्षे मरणयातना सोसणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. म्हणून राहुल गांधींना सांगतो की, आपण जरुर एकत्र आलोय ते या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी. या देशाचं संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. त्याच्यामध्ये आता कुठे फाटे फुटू देऊ नका. तु्म्हाला डिवचलं जातंय. मात्र आता जर का वेळ चुकली तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, अशी चिंताही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर