शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:27 IST

Shiv Sena Uddhav Thackeray Group: पडत्या काळात ज्या नेत्याने उद्धवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले, त्यांना न विचारताच कार्यकारिणी घोषित केल्याने शिवसैनिक बुचकळ्यात पडले.

Shiv Sena Uddhav Thackeray Group: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूनक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत आल्याने देशाच्या राजधानीत आणि महाराष्ट्रात चर्चांना उधाण आले होते. दोन्ही नेते दिल्लीत तीन दिवस तळ ठोकून बसणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला उपस्थिती लावली. परंतु, यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना शेवटच्या रांगेत बसवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असताना इथे महाराष्ट्रात ठाकरे गटात आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

एकीकडे उद्धव ठाकरे गटाला राज्यभरातून खिंडार पडत असल्याचे दिसत आहे. पक्षाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटात नवचैतन्य आल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी ठाकरे गटाला लागलेली गळती आणि पक्षांतर्गत वाढत चाललेली नाराजी कमी होताना दिसत नाही. एकामागून एक पदाधिकारी, नेते, माजी नगरसेवक, कार्यकर्ते महायुतीत सामील होत आहेत. यातच उद्धवसेनेत बाहेरच्यांची लुडबुड होत असल्याचा दावा पक्षातीलच काही जण करत असल्याचे म्हटले जात आहे.

... म्हणे, उद्धवसेनेत बाहेरच्यांची लुडबुड

उद्धवसेनेने पक्षाची नवी मुंबई कार्यकारिणी घोषित केल्यानंतर पक्षाचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसैनिक बुचकळ्यात पडले. पडत्या काळात ज्या नेत्याने नवी मुंबईत उद्धवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले, त्याला न विचारताच राजन विचारे यांच्या सांगण्यावरून पक्षश्रेष्ठींनी नवी मुंबई कार्यकारिणी घोषित केल्याने राजीनामा देत असल्याचे नाराज मोरेंनी म्हटले आहे. या घडामोडीत उद्धवसेनेचे नेते सुभाष देसाई, रवींद्र मिर्लेकर यांनाही नवे पदाधिकारी नेमताना अंधारात ठेवल्याचे कारण मोरेंच्या राजीनाम्यात दडल्याचे सांगण्यात येते. पण, वास्तव अद्याप गुलदस्त्यातच आहे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे. 

दरम्यान, इंडिया आघाडी विखुरलेली दिसत आहे. आप बाहेर पडली आहे. ममता बॅनर्जींची वेगळी भूमिका आहे. महाराष्ट्रातील राजकारण बदल आहे. दोन बंधू एकत्र येत असताना शिवसेना (यूबीटी) इंडिया आघाडीत राहणार का?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. ते म्हणाले, "अशा काही अटी-शर्ती नाहीयेत. मी म्हटलं आहे की आम्हा दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघंही खंबीर आहोत." 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण