शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'मी अयोध्येला शिवनेरीची माती घेऊन गेलो अणि त्यानंतर मुख्यमंत्रीही झालो'- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 18:44 IST

'आपण सगळे एकच आहोत. आम्ही राम-राम म्हणतो अन् तुम्ही श्रीराम म्हणता.'

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत उत्तर भारतीयांसोबत बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी उत्तर भारतीयांच्या पाठिंब्यासाठी आवाहन केले.  'मी आज तुमची साथ मागायला आलो आहे. तुम्ही अनेक पिढ्यांपासून इथे राहता. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. मी आपलं नातं मजबूत करण्यासाठी आलो आहे. आपण एकमेकांना हिंदू मानत असू, तर उत्तर भारतीय आणि मराठी वेगळे व्हायला नको,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

ते पुढे म्हणतात, 'हे कोणतं हिंदूत्व आहे...काय आहे आपलं स्वप्न...मी तुम्हाला भडवण्यासाठी आलो नाही. मी तुमचे डोळे उघडण्यासाठी आलो आहे. हेच आपले हिंदूत्व आहे का..?ज्या मार्गाने हे आपल्याला घेऊन जात आहेत, त्या मार्गाने देशाची बदनामी होईल. पूर्वी हिंदू आहे बोलायला भीती वाटायची, भविष्यात लाज वाटेल. राम मंदिराचे प्रकरण शांत झाले होते, आम्हीच ही मागणी लावून धरली. मी अयोध्येला गेले होतो, तिथे जाण्यापूर्वी शिवनेरीची माती घेऊन गेले होतो. त्यानंतर राम मंदिराचा निर्णय झाला आणि मीही मुख्यमंत्री झालो. आपण एकच आहोत, आम्ही राम-राम म्हणतो अन् तुम्ही श्रीराम म्हणता.' 

'यांचे हिंदूत्व झोपले होते, तेव्हा माझ्या वडिलांनी यांना उठवलं आणि आता गरज सरल्यावर आम्हाला सोडून दिलं. माझे वडील म्हणायचे, राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदूत्व आहे. मनात राम आणि हाताला काम पाहिजे. कुणावर अन्याय करू नका आणि अन्याय सहन करू नका, असे आमचे हिंदूत्व आहे. आज अनेक उत्तर भारतीय एकत्र येत आहेत. आता मुस्लिमही आमच्यासोबत येत आहेत. आपल्याला आपल्या स्वप्नातला देश उभा करायचा आहे. आपला भारत स्वातंत्र आहे, पण हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. भाजपकडे हिम्मत नाही आणि स्वतःला हिंदूंचा नेता म्हणतात. मी आजही त्यांना आव्हान देतो, निवडणुका घ्या, आम्ही तयार आहोत,' असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिरBJPभाजपाShiv Senaशिवसेना