शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: 'मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाहीये; माझा जीव तुमच्यासाठी तळमळतोय'- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 20:47 IST

'सत्ता गेल्याचे दुःख नाही; गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही.'

मालेगाव-  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकच्या मालेगावमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'आज आपलं नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलं, माझ्या हातात काहीही नाही, तरीदेखील एवढी गर्दी आली आहे. ही सगळी पूर्वजांची पुण्याई आणि आई जगदंबेचा आशिर्वाद,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'तुम्ही जे प्रेम मला देत आहात, ते गद्दारांच्या नशिबी नाही. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाहीये, मी तुमच्या प्रश्नासाठी लढतोय. आता जिंकेपर्यंत लढायचं आहे. मी इथे आल्यानंतर शेतकऱ्यांना भेटलो, काय परिस्थिती आलीये शेतकऱ्यांवर. ज्यावेळेस आमचे सरकार होते, तेव्हा शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळायच्या. मी मुख्यमंत्री झालो आणि शेतकऱ्यांसाठी पहिला निर्णय घेतला. त्यानंतर अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले, पण नंतर सत्तांतर झाले. आता शेतकऱ्यांच्या हाती काही येत नाही.' 

संबंधित बातमी- तुम्ही कपाळावर गद्दार म्हणून शिक्का मारुन घेतला; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

'आजचे मुख्यमंत्री स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणतात. ते हेलिकॉप्टरने शेतात जातात. मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमतात, पण त्यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही. कृषीमंत्री तर कधी दिसत नाहीत. शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, किती फटका बसला, हे काळोखात जाऊन बघतात. हे कृषीमंत्री महिलांना शिव्या देतात. सुप्रिया सुळेंना शिवी दिली आणि हे अजूनही पदावर बसले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात ज्या तत्परतेने शेतकऱ्यांना मदत मिळायची, तेवढी आता मिळत नाही. माझा जीव तुमच्यासाठी तळमळतोय. सत्ता गेल्याचे दुःख नाही, पण चांगले काम करणारे सरकार तुम्ही पाडले. खंडोजी खोपडेची औलाद, गद्दाराच्या हातात भगवा शोभत नाही,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

राहुल गांधींना सल्लायावेळी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी यांनाही सावरकरांच्या मुद्द्यावरुन सल्ला दिला. 'वीर सावरकर आमचे दैवत आहेत, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. भाजपविरोधात सोबत लढायचे असेल तर दैवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. चाफेकर बंधुंना फाशी दिल्यानंतर अवघ्या 15 वर्षांच्या सावरकरणांनी इंग्रजांना मारण्याची शपध घेतली होती. सावरकरांनी 14 वर्षे काय मरण यातना सहन केल्या, त्याचा विचारही करता येणार नाही. राहुल गांधी आपण एकत्र आलो आहोत, ते या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी. फाटे फुटू देऊ नका, तुम्हाला डिवचलं जातंय, आता वेळ चुकली तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही,' असंही ते यावेली म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस