शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

हा त्यांचा बालिशपणा; उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सणसणीत पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 06:50 IST

संसदीय आयुधांच्या माध्यमातून चर्चा करण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या हातात आता काहीही राहिले नाही, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विस्तव टाकण्याचा बालिशपणा ते करत आहेत. फडणवीस आणि शिंदे यांची दोस्ती पक्की आहे. ज्यांनी अधिवेशनात कामकाजात सहभाग घेतला नाही, चर्चा केली नाही त्यांनी फडणवीस, शिंदे यांना सभागृहाच्या कामकाजाची आठवण करून देण्याची गरज नाही, असा पलटवार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी ठाकरे यांच्यावर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौगात ए मोदी या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. राष्ट्रभक्त मुस्लिमांचे समर्थन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करत होते. तेच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. परंतु, निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह तयार करून मिळविलेली मुस्लिमांची मते हातातून जातील की काय याची भीती वाटत असल्यामुळेच ते  भाजप आणि शिंदेसेनेवर टीका करत आहेत. महायुतीच्या वचनानाम्यातील आश्वासने ५ वर्षांत पूर्ण केली जातील, असे सामंत म्हणाले. 

संसदीय आयुधांच्या माध्यमातून चर्चा करा

काहीजण विधानभवनात येऊन पत्रकार परिषद घेतात, पण त्यांनी आधी कामकाज समजून घेणे गरजेचे आहे. सभागृहात तासन्तास बसले पाहिजे. विधिमंडळाच्या लाल, हिरव्या पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे. संसदीय आयुधांच्या माध्यमातून जनतेसाठी चर्चा केली पाहिजे. विधिमंडळात येऊन पत्रकार परिषदेत चर्चा केली म्हणजे विधिमंडळात चर्चा केली हे जनता ग्राह्य मानत  नाही हे काहींनी समजून घेतले पाहिजे, अशी टीकाही सामंत यांनी केली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे