शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आठवले, कवाडे, गवई हे बाबासाहेबांच्या विचारांचे खरे शिलेदार; राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर टीका

By आशीष गावंडे | Updated: August 14, 2024 17:26 IST

प्रकाश आंबेडकर यांनी घुमजाव करत स्वबळाचा नारा दिला. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना छेद देऊन ज्या पक्षांना पडद्याआडून मदत केली, ते बाबासाहेबांना कदापी आवडले नसते

अकाेला -  निष्ठावान शिवसैनिकांसाठी मातेसमान असलेल्या शिवसेना पक्षाला फाेडून गद्दारांची सेना स्थापन करणाऱ्या शिंदे यांच्या सेनेला प्रकाश आंबेडकर खरी शिवसेना मानत असतील तर मागील अनेक वर्षांपासून या राज्यात व देशात बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम रामदास आठवले, प्रा.जाेगेंद्र कवाडे व राजेंद्र गवई करीत आहेत असं म्हटल्यास वावगे ठरु नये. प्रकाश आंबेडकरांची सतत बदलणारी भूमिका पाहता रामदास आठवले, प्रा.कवाडे, गवई हेच बाबासाहेबांच्या विचारधारेचे खरे शिलेदार असल्याचा टाेला शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उध्दवसेनेच्या वतीने शिव सर्वेक्षण अभियान राबविल्या जात आहे. यापृष्ठभूमिवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत अकोला शहरात दाखल झाले असता, त्यांनी बुधवारी आयाेजित पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासह महायुती सरकावर टिकेची ताेफ डागली. आम्ही डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला व विचारांना मानताे. लाेकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आमचे घटक होणार हाेते. त्यांना अकाेला लाेकसभा मतदार संघासह एकूण सात जागा दिल्या जाणार हाेत्या. परंतु आंबेडकर यांनी  घुमजाव करत स्वबळाचा नारा दिला. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना छेद देऊन ज्या पक्षांना पडद्याआडून मदत केली, ते बाबासाहेबांना कदापी आवडले नसते. माणसाला ज्ञान असेल तर त्याचा मान राखून बाेललं गेले पाहिजे अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाचा समाचार घेतला.

दाेन नेत्यांनी भाजपला पाठबळ दिलेलाेकसभेची निवडणूक ही संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांच्या विराेधात हाेती. पंतप्रधान माेदी,गृहमंत्री अमित शाह व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक जिंकण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला. एकीकडे महाराष्ट्र हिताच्या गप्पा करायच्या अन् दुसरीकडे धर्मांध,जातीपातीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना मदत करायची. लाेकसभा निवडणुकीत भाजपला राज्यातील दाेन नेत्यांचे पाठबळ लाभले. ही बाब जनतेच्या लक्षात आली असल्याचे खा.राऊत यांनी सांगितले. 

नितीन विकला गेला नाही,याची सल!शिवसेनेच्या आमदारांना ५० खाेक्यांची लाच देऊन काही गद्दार गुवाहाटीला पळून गेले हाेते. जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख हे पक्षासाेबत एकनिष्ठ राहिले. नितीन विकल्या गेला नाही,याची सल भाजप व गद्दार सेनेच्या मनात असल्यामुळेच आ.देशमुख यांना ‘एसीबी’च्या माध्यमातून अडचणीत आणन्याचे प्रयत्न केले जात असल्याचे खा.राऊत यांनी स्पष्ट केले. 

केंद्रात कुबड्यांचे सरकारमहाराष्ट्राच्या राजकारणात जातीपातीचे विष पेरणाऱ्या भाजपला केंद्रात सर्वसामान्य जनतेने लायकी दाखवली. स्पष्ट बहुमत नसलेल्या भाजपला इतर दाेन पक्षांची मदत घ्यावी लागली. हे कुबड्यांचे सरकार कधीही काेसळू शकते,असे खा.राऊत म्हणाले.राज्यात महाविकास आघाडीची सत्तातपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीची माेट बांधण्यात आली आहे. नाेव्हेंबर महिन्यात राज्यात उध्दवसेना,काॅंग्रेस व शरद पवार यांचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडीचीच सत्ता येइल,यात तीळमात्र शंका नसावी,असे खा.राऊत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४