शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

Uddhav Thackeray, Shiv Sena: "ज्यादिवशी आम्ही पक्षाशी विद्रोह करू, बेईमानी करू तेव्हा गृहीत धरा की दोष..."; उद्धव ठाकरेंना सुनावणाऱ्या खासदाराचं आणखी एक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 8:37 PM

'ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर आदित्यना मंत्री का केलं', असा सवाल या खासदाराने दोन दिवसांपूर्वीच विचारला होता.

Uddhav Thackeray Maharashtra Politics: महाराष्ट्रात गेल्या वर्षी जून महिन्यात मोठी बंडखोरी झाली. शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन आधी गुजरात आणि मग गुवाहाटी गाठलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंशी संपर्क होत नसल्याची खंत बहुतांश आमदारांनी मांडली. काही दिवसांच्या अयशस्वी चर्चेनंतर, एकनाथ शिंदे गटाने भाजपासोबत सत्तास्थापना केली. काही दिवसांपूर्वी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णयही निवडणूक आयोगाने दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंपुढे नवा पक्ष उभारणे आणि नव्याने कार्यकर्ते तयार करण्याचे मोठे आव्हान आहे. असे असताना, दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे परभणीचे खासदार बंडू जाधवांनी ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आता त्यांनीच आणखी एक मोठं विधान केलं आहे.

“एका सामान्य परिवारातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मी मुलगा आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे आमदार, मार्केट कमिटी, खासदार या सर्व पदांवर काम करण्याचं भाग्य मिळालं. हा जन्म काय, सात जन्म पक्षाचे उपकार फेडू शकणार नाही, एवढं दिलं आहे. त्यामुळे पन्नास खोके काय, शंभर खोके आले तरी माझ्या उंचीसमोर खूप ठेंगणं वाटतात. त्यामुळे ज्या दिवशी आम्ही पक्षाशी विद्रोह करू, बेईमानी करू तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की आमच्या रक्तात दोष आहे. कारण, ज्या पक्षाने आपल्याला वाढवलं, त्याच्याशी पाईक राहणं आमचं कर्तव्य आहे,” असं मोठं विधान त्यांनी केलं.

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना दिला होता घरचा आहेर!

"जून महिन्यात राजकीय नाट्य घडलं. एकनाथ शिंदेंनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. त्यांना बहुमताच्या जोरावर ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्याआधीचा अडीच वर्षाचा काळ असाच गेला. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर पोराला मंत्री करायला पाहिजे नव्हतं. पोराला मंत्री व्हायचं होतं, तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होतं. तुम्ही खुर्ची अडवल्याने यांना वाटलं उद्या बाप गेल्यावर पोरगं माझ्या बोकांडी बसेल. त्याच्यापेक्षा वेगळी चूल मांडली, तर काय बिघडलं? आणि याच भूमिकेतून ही गद्दारी झाली. उद्धव ठाकरे यांनी मधल्या काळात पक्षसंघटनेकडे लक्ष द्यायला हवं होतं. अथवा कोणाला तरी अधिकार द्यायला हवे होते. त्यामुळेच ह्या चोराला संधी मिळाली," असे रोखठोक मत बंडू जाधवांनी मांडले होते.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रparbhani-acपरभणीShiv Senaशिवसेना