शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

शिंदेसेनेत जाण्याची चाहुल लागताच माजी आमदाराची उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:51 IST

जर त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला तर उद्धवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यापासून सुरुवात करुन पक्षबांधणी करावी लागेल

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेसेनेने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. या ऑपरेशन टायगरला सर्वात मोठं यश रत्नागिरी जिल्ह्यात येत असून याठिकाणी उद्धवसेनेची घरघर थांबायची चिन्हे नाहीत. याठिकाणचे माजी आमदार संजय कदम हे शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत याची चाहुल लागताच उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्या सहीचं पत्र उद्धवसेनेकडून जारी करण्यात आलं आहे. या पत्रात म्हटलंय की, रत्नागिरी(खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) याठिकाणचे जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव  ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे असं सांगितले आहे.

दापोलीचे माजी आमदार संजय कदम शिंदेसेनेच्या वाटवर आहेत. जर त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला तर उद्धवसेनेला जिल्ह्यात पहिल्यापासून सुरुवात करुन पक्षबांधणी करावी लागेल. मात्र आधीची पक्षबांधणी होताना जे निष्ठावंत, झोकून देऊन काम करणारी फळी शिवसेनेकडे होती, तशी फळी आता शिल्लक नाही. सत्तेशिवाय राहण्याची तयारी नसलेल्यांची संख्या आता अधिक आहे. त्यामुळे नव्याने पक्षबांधणी आता सोपी राहिलेली नाही.

उद्धवसेनेला मोठे धक्के

विधानसभा निवडणुकीनंतर माजी आ. राजन साळवी, माजी आ. सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक आणि पराग बने, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके, दापोली नगर पंचायतीमधील नगरसेवक या सर्वांचे पक्ष सोडणे उद्धवसेनेसाठी मोठे धक्के आहेत. 

पडझड सावरण्याचे प्रयत्नच झाले नाहीत

ज्यावेळी रत्नागिरीतील दोन आमदारांनी आणि सिंधुदुर्गातील एका आमदाराने शिंदेसेनेसोबत जाणे निश्चित केले, तेव्हाच उद्धवसेनेला आपल्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लागल्याचे लक्षात आले. पण पडझड सावरण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून झाले नाहीत. त्यामुळे पदाधिकारी निराश झाले. ज्यावेळी पक्षाचे दोन भाग झाले, तेव्हा जिल्ह्यात भास्कर जाधव आणि राजन साळवी हे दोन आमदार उद्धवसेनेतच होते. त्यांना अधिक बळ देणे, अन्य तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षासोबत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देणे, आवश्यक होते. मात्र त्या दोघांबाबतही पक्षाकडून फारशा सकारात्मक गोष्टी घडल्या नाहीत.

दरम्यान, ज्या दोन आमदारांनी पक्ष सोडला, त्या जागांसाठी पक्षाने काहीच प्रयत्न केले नाहीत. दोन वर्ष हाताशी असतानाही उद्धवसेनेने काहीच हालचाली न केल्याने एक एक शिलेदार बाजूला होत गेला. त्यामुळे उद्धवसेनेला घरघर लागली आहे. कोकण हा बालेकिल्ला असतानाही अतिदुर्लक्ष झाल्याने उद्धवसेनेची पडझड होतच राहिली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेRatnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना