शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शिंदेसेनेत जाण्याची चाहुल लागताच माजी आमदाराची उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:51 IST

जर त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला तर उद्धवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यापासून सुरुवात करुन पक्षबांधणी करावी लागेल

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेसेनेने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. या ऑपरेशन टायगरला सर्वात मोठं यश रत्नागिरी जिल्ह्यात येत असून याठिकाणी उद्धवसेनेची घरघर थांबायची चिन्हे नाहीत. याठिकाणचे माजी आमदार संजय कदम हे शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत याची चाहुल लागताच उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्या सहीचं पत्र उद्धवसेनेकडून जारी करण्यात आलं आहे. या पत्रात म्हटलंय की, रत्नागिरी(खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) याठिकाणचे जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव  ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे असं सांगितले आहे.

दापोलीचे माजी आमदार संजय कदम शिंदेसेनेच्या वाटवर आहेत. जर त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला तर उद्धवसेनेला जिल्ह्यात पहिल्यापासून सुरुवात करुन पक्षबांधणी करावी लागेल. मात्र आधीची पक्षबांधणी होताना जे निष्ठावंत, झोकून देऊन काम करणारी फळी शिवसेनेकडे होती, तशी फळी आता शिल्लक नाही. सत्तेशिवाय राहण्याची तयारी नसलेल्यांची संख्या आता अधिक आहे. त्यामुळे नव्याने पक्षबांधणी आता सोपी राहिलेली नाही.

उद्धवसेनेला मोठे धक्के

विधानसभा निवडणुकीनंतर माजी आ. राजन साळवी, माजी आ. सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक आणि पराग बने, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके, दापोली नगर पंचायतीमधील नगरसेवक या सर्वांचे पक्ष सोडणे उद्धवसेनेसाठी मोठे धक्के आहेत. 

पडझड सावरण्याचे प्रयत्नच झाले नाहीत

ज्यावेळी रत्नागिरीतील दोन आमदारांनी आणि सिंधुदुर्गातील एका आमदाराने शिंदेसेनेसोबत जाणे निश्चित केले, तेव्हाच उद्धवसेनेला आपल्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लागल्याचे लक्षात आले. पण पडझड सावरण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून झाले नाहीत. त्यामुळे पदाधिकारी निराश झाले. ज्यावेळी पक्षाचे दोन भाग झाले, तेव्हा जिल्ह्यात भास्कर जाधव आणि राजन साळवी हे दोन आमदार उद्धवसेनेतच होते. त्यांना अधिक बळ देणे, अन्य तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षासोबत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देणे, आवश्यक होते. मात्र त्या दोघांबाबतही पक्षाकडून फारशा सकारात्मक गोष्टी घडल्या नाहीत.

दरम्यान, ज्या दोन आमदारांनी पक्ष सोडला, त्या जागांसाठी पक्षाने काहीच प्रयत्न केले नाहीत. दोन वर्ष हाताशी असतानाही उद्धवसेनेने काहीच हालचाली न केल्याने एक एक शिलेदार बाजूला होत गेला. त्यामुळे उद्धवसेनेला घरघर लागली आहे. कोकण हा बालेकिल्ला असतानाही अतिदुर्लक्ष झाल्याने उद्धवसेनेची पडझड होतच राहिली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेRatnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना