शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना एकत्र यावेच लागेल, कारण..; निलंबित काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 12:42 IST

काटोलमध्ये विद्यमान आमदारांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. विविध संस्थांमध्ये आमदारांची सत्ता गेली आहे असंही देशमुख म्हणाले.

नागपूर - सध्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अपात्रतेचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांकडे आलेत. अशावेळी शिवसेना ठाकरेंची असो वा शिंदेंची नजीकच्या काळात त्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे हे दोघेही एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. 

आशिष देशमुख म्हणाले की, शिवसेनेच्या सर्व ५४ आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. निर्णय कुणाच्याही बाजूने लागला तरी आमदार अपात्र होणार आहेत. अपात्रतेची कारवाई केवळ या टर्मपुरती नसते तर पुढील ६ वर्षासाठी असते. त्यामुळे आमदारांचे राजकीय भवितव्य धोक्यात आहे. अपात्र व्यक्तीला निवडणूक लढवता येणार नाही. हा नियम राज्यसभा खासदारांसह सर्वांना लागू आहे. अशा परिस्थितीत दोन्ही शिवसेनेला एकत्र यावेच लागेल. ते एकत्र येतील आणि भाजपासोबत युती करतील त्यामुळे मविआ लवकरच फुटलेली दिसेल असा दावा त्यांनी केला. 

तसेच २०१८ मध्ये मी आमदारकीचा राजीनामा दिला होता. कारण मला अपात्र व्हायचे नव्हते. ६ वर्ष राजकारणातून बाद व्हायचे नव्हते. मला माझ्या वकिलांनी दिलेला सल्ला होता. त्याआधारे मी सांगतो, दोन्ही शिवसेनेला एकत्र आल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मविआतील एक घटक पक्ष फुटला तरी जागावाटपाला काही अर्थ उरणार नाही असंही आशिष देशमुख यांनी म्हटलं.   

दरम्यान, मी काँग्रेसमधून निलंबित असलो तरी ते तात्पुरते आहे. मी काँग्रेसमध्ये सक्रीय राहील. काटोलमध्ये विद्यमान आमदारांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. विविध संस्थांमध्ये आमदारांची सत्ता गेली आहे. मी २०१९ च्या विधानसभेत काही मतांनी पडलो. देवेंद्र फडणवीस यांना मी कडवी झुंज दिली होती. मी एका जागेवरून लढेन, जनतेचा जो कौल आहे ते पाहून मी निर्णय घेईल. काटोलमधून मी २०१४ मध्ये निवडून आलोय, त्यामुळे लोकांमध्ये माझ्या नावाची चर्चा आहे. अजून दीड वर्ष आहे पुढे पाहू काय होते असंही आशिष देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAshish Deshmukhआशीष देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना