शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

चांगल्या योजना बंद करून उद्धव ठाकरे सुडाचं राजकारण करतायत: अनिल बोंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 13:07 IST

देवेंद्र फडणवीस यांनी केलेले चांगले काम पुसून टाकण्याचा हा अट्टाहास आहे, असा आरोप सुद्धा अनिल बोंडे यांनी केला आहे.

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यानतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यंमत्री पदाची शपथ घेतली. त्यांनतर नव्या सरकारने मागच्या सरकारने घेतलेले अनेक निर्णय व योजनांना ब्रेक लावला आहे. त्यामुळे भाजप नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी याच मुद्यावरून मुख्यंमत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ठाकरे सरकारकडून जलयुक्त शिवार योजना थांबवण्यात आली आहे. तर या योजनेला स्थगिती देऊन निधी बंद करुन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश काढण्यात आले असून, ही अतिशय चिंतेची बाब आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भागातील जनतेचे मोठे नुकसान होणार असल्याचे बोंडे म्हणाले. तर चांगल्या योजना बंद करून उद्धव ठाकरे सुडाचं राजकारण करतायत असा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे.

तसेच जलयुक्त शिवार ही योजना आता रोजगार हमी योजनेत टाकल्याने पुढील 5 वर्षात होणाऱ्या कामांना 25 वर्षे लागणार आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले चांगले काम पुसून टाकण्याचा हा अट्टाहास आहे, असा आरोप सुद्धा अनिल बोंडे यांनी केला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली गेलेली जलयुक्त शिवार योजनेला या सरकारने ब्रेक लावले आहे. कारण, ३१ डिसेंबरला या योजनेची मुदत संपल्यानंतर नव्या सरकारने त्यास मुदतवाढ दिलेली नाही. तसेच यापुढे या योजनेस निधी न देण्याची भूमिका घेतली आहे. रोजगार हमी योजनाव्यतिरिक्त जलयुक्तसाठी एखाद्या अधिकाऱ्याने निधीची तरतूद केली तर तो गैरव्यवहार केला असे समजून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश सुद्धा देण्यात आले आहे.