शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Uddhav Thackeray-Devendra Fadanvis: तेव्हा फडणवीसांना फोन केला, मोदी-शाहांशी संपर्क साधला? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 18:16 IST

Uddhav Thackeray-Devendra Fadanvis: उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याच्या तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाहांशी संपर्क साधल्याच्या बातम्या ह्या अफवा आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या कुठल्याही नेत्याला फोन केलेला नाही, असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांनासोबत घेत केलेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडून अखेर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीनंतर या बंडाला सुरुवात झाली असतानाच उद्धव ठाकरे यांनी पक्ष वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्याशी संपर्क साधला होता, अशा आशयाच्या बातम्या आज समोर आल्या होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र आता स्वत: उद्धव ठाकरे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना कुठलाही फोन लेका नसल्याचे स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याच्या तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाहांशी संपर्क साधल्याच्या बातम्या ह्या अफवा आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या कुठल्याही नेत्याला फोन केलेला नाही, असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच उद्धव ठाकरे जे बोलायचं ते उघडपणे बोलतात, त्यामुळे कुठल्याही अफवा पसरवू नयेत, असं आवाहन उद्धव ठाकरे यांचे माध्यम सल्लागार हर्षल प्रधान यांनी केलं आहे.

उद्ध ठाकरेंनी शिवसेनेच्या तत्कालीन एका मंत्र्याद्वारे देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता. फोनवरुन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट एकनाथ शिंदेंना बाजुला करा आणि आमच्याशी चर्चा करा, असे आवाहन केले. एकनाथ शिदेंची बारगेनिंग पॉवर का वाढवत आहात, थेट आमच्याशी बोला. आपण भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन करू, असा प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोनकॉलद्वारे दिला होता. मात्र, आता वेळ निघून गेलेली आहे, आपण एकनाथ शिंदेंच्या विश्वासाला फसवू शकत नाही. त्यामुळे, तुम्ही थेट अमित शहांसोबत बोला, असे उत्तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिले होते, अशा आशयाचे वृ्त्त सकाळी सर्वच माध्यमांमधून प्रसारित झाले होते, त्यामुळे चर्चांना उधाण आले होते.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. एवढच नाहीतर मिलिंद नार्वेकर यांनाही सुरतमध्ये पाठवले होते. पण, एकनाथ शिंदेंनी काही ऐकलं नाही. शिंदेंनी फक्त महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीमुळे या बंडामागे भाजप असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची बातमी झळकली होती.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ