शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नही होगा "मोदी गॅरंटी"; रायगडात उद्धव ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 14:24 IST

आता पंतप्रधान सारखे दौरे करतायेत. मते हवी असताना मेरे प्यारे देशवासियो, त्यानंतर तुम्हाला चिरडून विकास करणे हे काम आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

पेण -  Uddhav Thackeray on 'Modi's guarantee ( Marathi News ) अब की बार ४०० पार असं होणार असेल तर तुम्हाला नीतीश कुमार का लागतात?, मोदी की गॅरंटी, एकाबाजूला हेमंत सोरेन यांना अटक आणि दुसरीकडे अजित पवारांना क्लीनचीट अशी बातमी वृत्तपत्रात बाजूबाजूला होती. भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नही होगा, मोदी गॅरंटी आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर केली आहे. 

पेणच्या सभेत उद्धव ठाकरेंनी ईडी, सीबीआयवरून भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, भ्रष्टाचार करा, भाजपात या, तुम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद मिळेल. आरोप करणारे हेच, पक्षात घेणारे हेच आणि क्लीनचीट देणारेही हेच. नीतीश कुमारांनी भाजपासोबत शपथ घेतली आणि दुसऱ्यादिवशी लालू यादव आणि तेजस्वी यादव यांना ईडीचे समन्स आले. ही मोदी गॅरंटी, ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे का? जे हुकुमशाहीविरोधात राहतील त्यांना तुरुंगात टाकले जातंय. भाजपा-आरएसएस कार्यकर्त्यांनी डोळे उघडावे. ही लढाई भाजपाविरोधात इतर पक्ष नाही तर ही लढाई हुकुमशाहीविरुद्ध लोकशाही अशी आहे. तुम्ही ज्यांच्या सतरंज्या घालताय, ज्यांच्यामागे उठाबशा काढतायेत, त्यांच्या हातात देश देताय याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या हुकुमशाहीच्या हातात देतायेत. पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

तसेच एखाद्याला गाडायचे तर आधी खड्डा करावा लागेल. त्या खड्ड्यात मतांची माती टाकावी लागेल. त्यासाठी आपल्याला घराघरात जावे लागेल. प्रत्येक ठिकाणी जाऊन गेल्या १० वर्षातील सरकारच्या कामांचा आढावा घ्या. जे अर्थसंकल्प मांडले ते प्रत्यक्षात किती उतरलंय? महिलांना योजनांचा लाभ मिळाला का? शेतकऱ्यांना मदत मिळाली का? तरुणांना नोकरी मिळाली का? हे प्रश्न विचारा. कोकणात २ वेळा चक्रीवादळ येऊन गेले तेव्हा केंद्राकडून एकही मदत आली नाही. संकट आल्यावर पंतप्रधान कोकणाकडे फिरकले नाहीत. तेव्हा मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मदत केली. आता पंतप्रधान सारखे दौरे करतायेत. मते हवी असताना मेरे प्यारे देशवासियो, त्यानंतर तुम्हाला चिरडून विकास करणे हे काम आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

दरम्यान, राम मंदिरासाठी शिवसेनाप्रमुखांचे मोलाचे योगदान, मला त्याचा आनंद आहे. मी नाशिकला काळाराम मंदिरात दर्शन घेतले, गोदातीरी आरती केली. काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. हा राम तुमच्या मोदींची प्रॉपर्टी नाही तर हा राम देशातील करोडो रामभक्तांचाही आहे. त्या सोहळ्यात मोदींची तुलना आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची केली. ती माणसं निर्बुद्ध आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागला तर याद राखा असं छत्रपतींनी म्हटलं होते, परंतु इथे शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही. मणिपूरमध्ये महिलांची विटंबना झाली. ते पाहावतही नाही, एवढे होऊन सुद्धा ती व्यक्ती महाराजांच्या बरोबरीची होऊ शकते? जे कोणी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करतायेत ते बिनडोक आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. 

हुकुमशाहीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही

राज्यात गद्दारांची घराणेशाही आलीय. घराणेशाहीला आम्ही तिकीट देणार नाही असं भाजपानं जाहीर करावे. लोकसभेत निवडून येऊ शकत नाही म्हणून सुनील तटकरे राज्यसभेची तयारी करतायेत. फसवण्याचे दिवस गेले. आम्ही कडवट राष्ट्रीय हिंदुत्वासाठी तुमच्यासोबत आलो होतो. या देशाला मानणारा जो कोणी जातपात कुठल्याही धर्माचा असला तरी ते आमचं हिंदुत्व, भाजपानं त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या सांगावी. प्रचंड खर्च जाहिरातबाजीवर केला जातो. पेट्रोल पंपावर जाहिराती लावल्या जातात. पण पंतप्रधानांना पेट्रोलची दरवाढ दिसत नाही. गरिब महिलांना किती उज्ज्वला योजना मिळाली एकमेकांना विचारा. आपण सगळे जाहिरातीचे बळी ठरतो. जनसंवाद माझा नाही तर जनतेने एकमेकांशी करावा. चर्चा होऊ द्या आणि खरे काय ते जनतेसमोर येऊ द्या. सत्य जनतेसमोर आणणं ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. सत्य समोर आले तर मी पेण, रायगडमध्ये सभा घेतली नाही तरी आपला खासदार निवडून येईल. याच जनतेच्या ताकदीवर हुकुमशाहाविरोधात आपण लढणार आहोत. जनतेची ताकद एकवटते तेव्हा हुकुमशाहीला मातीत गाडल्याशिवाय राहत नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.    

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना