शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नही होगा "मोदी गॅरंटी"; रायगडात उद्धव ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 14:24 IST

आता पंतप्रधान सारखे दौरे करतायेत. मते हवी असताना मेरे प्यारे देशवासियो, त्यानंतर तुम्हाला चिरडून विकास करणे हे काम आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

पेण -  Uddhav Thackeray on 'Modi's guarantee ( Marathi News ) अब की बार ४०० पार असं होणार असेल तर तुम्हाला नीतीश कुमार का लागतात?, मोदी की गॅरंटी, एकाबाजूला हेमंत सोरेन यांना अटक आणि दुसरीकडे अजित पवारांना क्लीनचीट अशी बातमी वृत्तपत्रात बाजूबाजूला होती. भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नही होगा, मोदी गॅरंटी आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर केली आहे. 

पेणच्या सभेत उद्धव ठाकरेंनी ईडी, सीबीआयवरून भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, भ्रष्टाचार करा, भाजपात या, तुम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद मिळेल. आरोप करणारे हेच, पक्षात घेणारे हेच आणि क्लीनचीट देणारेही हेच. नीतीश कुमारांनी भाजपासोबत शपथ घेतली आणि दुसऱ्यादिवशी लालू यादव आणि तेजस्वी यादव यांना ईडीचे समन्स आले. ही मोदी गॅरंटी, ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे का? जे हुकुमशाहीविरोधात राहतील त्यांना तुरुंगात टाकले जातंय. भाजपा-आरएसएस कार्यकर्त्यांनी डोळे उघडावे. ही लढाई भाजपाविरोधात इतर पक्ष नाही तर ही लढाई हुकुमशाहीविरुद्ध लोकशाही अशी आहे. तुम्ही ज्यांच्या सतरंज्या घालताय, ज्यांच्यामागे उठाबशा काढतायेत, त्यांच्या हातात देश देताय याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या हुकुमशाहीच्या हातात देतायेत. पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

तसेच एखाद्याला गाडायचे तर आधी खड्डा करावा लागेल. त्या खड्ड्यात मतांची माती टाकावी लागेल. त्यासाठी आपल्याला घराघरात जावे लागेल. प्रत्येक ठिकाणी जाऊन गेल्या १० वर्षातील सरकारच्या कामांचा आढावा घ्या. जे अर्थसंकल्प मांडले ते प्रत्यक्षात किती उतरलंय? महिलांना योजनांचा लाभ मिळाला का? शेतकऱ्यांना मदत मिळाली का? तरुणांना नोकरी मिळाली का? हे प्रश्न विचारा. कोकणात २ वेळा चक्रीवादळ येऊन गेले तेव्हा केंद्राकडून एकही मदत आली नाही. संकट आल्यावर पंतप्रधान कोकणाकडे फिरकले नाहीत. तेव्हा मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मदत केली. आता पंतप्रधान सारखे दौरे करतायेत. मते हवी असताना मेरे प्यारे देशवासियो, त्यानंतर तुम्हाला चिरडून विकास करणे हे काम आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

दरम्यान, राम मंदिरासाठी शिवसेनाप्रमुखांचे मोलाचे योगदान, मला त्याचा आनंद आहे. मी नाशिकला काळाराम मंदिरात दर्शन घेतले, गोदातीरी आरती केली. काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. हा राम तुमच्या मोदींची प्रॉपर्टी नाही तर हा राम देशातील करोडो रामभक्तांचाही आहे. त्या सोहळ्यात मोदींची तुलना आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची केली. ती माणसं निर्बुद्ध आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागला तर याद राखा असं छत्रपतींनी म्हटलं होते, परंतु इथे शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही. मणिपूरमध्ये महिलांची विटंबना झाली. ते पाहावतही नाही, एवढे होऊन सुद्धा ती व्यक्ती महाराजांच्या बरोबरीची होऊ शकते? जे कोणी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करतायेत ते बिनडोक आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. 

हुकुमशाहीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही

राज्यात गद्दारांची घराणेशाही आलीय. घराणेशाहीला आम्ही तिकीट देणार नाही असं भाजपानं जाहीर करावे. लोकसभेत निवडून येऊ शकत नाही म्हणून सुनील तटकरे राज्यसभेची तयारी करतायेत. फसवण्याचे दिवस गेले. आम्ही कडवट राष्ट्रीय हिंदुत्वासाठी तुमच्यासोबत आलो होतो. या देशाला मानणारा जो कोणी जातपात कुठल्याही धर्माचा असला तरी ते आमचं हिंदुत्व, भाजपानं त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या सांगावी. प्रचंड खर्च जाहिरातबाजीवर केला जातो. पेट्रोल पंपावर जाहिराती लावल्या जातात. पण पंतप्रधानांना पेट्रोलची दरवाढ दिसत नाही. गरिब महिलांना किती उज्ज्वला योजना मिळाली एकमेकांना विचारा. आपण सगळे जाहिरातीचे बळी ठरतो. जनसंवाद माझा नाही तर जनतेने एकमेकांशी करावा. चर्चा होऊ द्या आणि खरे काय ते जनतेसमोर येऊ द्या. सत्य जनतेसमोर आणणं ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. सत्य समोर आले तर मी पेण, रायगडमध्ये सभा घेतली नाही तरी आपला खासदार निवडून येईल. याच जनतेच्या ताकदीवर हुकुमशाहाविरोधात आपण लढणार आहोत. जनतेची ताकद एकवटते तेव्हा हुकुमशाहीला मातीत गाडल्याशिवाय राहत नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.    

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना