शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनुमतीशिवाय निर्णयच घेऊ शकत नाही: मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 16:04 IST

दिलेले आश्वासन त्यांनी पाळावे व शेतकऱ्यांना 25 हजारांची तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी सुद्धा यावेळी मुनगंटीवार यांनी केली.

मुंबई: नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या आज चौथ्या दिवशी सुद्धा विरोधकांनी शेतकऱ्यांच्या 25 हजाराच्या मदतीच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात राज्यासाठी कोणतीही ठोस आश्वासने नसल्याचे आरोप करत भाजप आमदारांनी सभात्याग करत सभागृहाच्या बाहेर पडणे पसंद केले. त्यांनतर माजी मंत्री व भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, अभिभाषणावर जे मुद्दे उपस्थित करण्यात येतात त्याचे उत्तर मिळणे अपेक्षित असते. मात्र आज राज्यपालांच्या अभिभाषणावर आम्हाला मुख्यमंत्र्यांचे डमी भाषण आयकायला मिळाले. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनुमतीशिवाय एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही. तसेच त्यांना परवानगी घेतल्या शिवाय निर्णय सुद्धा घेता येत नाही.

तर उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्यासाठी काँग्रेस प्रमुख सोनिया गांधींची परवानगी घ्यावी लागते. तसेच शरद पवारांची सुद्धा अनुमती घ्यावी लागते. उद्धव ठाकरे यांनी एक डमी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक झुंझार मुख्यमंत्री म्हणून काम करायले पाहिजे. तसेच त्यांच्याकडून आज जे उत्तर अपेक्षित होते, ते आम्हाला मिळाले नसल्याचे सुद्धा मुनगंटीवार म्हणाले.

तर शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भूमातीच्या साक्षीने व शेतकऱ्यांच्या उपस्थित 25 हजार मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे दिलेले आश्वासन त्यांनी पाळावे व शेतकऱ्यांना 25 हजारांची तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी सुद्धा यावेळी मुनगंटीवार यांनी केली.