शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाच वर्षे नव्हे, पाच पिढ्या महाविकास आघाडीचे सरकार राहील, उद्धव ठाकरेंना विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 17:51 IST

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारबाबत मोठे भाष्य केले आहे.

नागपूर - महाविकास आघाडीमधील आम्ही घटकपक्ष एकदिलाने एकत्र आलो आहोत. त्यामुळे  पुढची पाच वर्षेच नाही तर पुढील पाच पिढ्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत राहील, असा विश्वास मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपूरमध्ये आले आहेत. दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या सत्कारानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सरकारच्या दीर्घकाळ चालण्याबाबत विश्वास व्यक्त केला.  

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. या अधिवेशनासाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि त्यांचे मंत्रिमंडळ नागपूरमध्ये दाखल झाले आहे. आज नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीकडून सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले, ते म्हणाले की,  महाविकास आघाडीमधील आम्ही घटकपक्ष एकदिलाने एकत्र आलो आहोत. त्यामुळे  पुढची पाच वर्षेच नाही तर पुढील पाच पिढ्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत राहील. आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हाला काहीही चिंता करण्याची गरज नाही. 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी  देशाला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे सरकार आणि शासन महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार देईल, असे आश्वासनही दिले. 

 दरम्यान, अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीचं सरकार हे स्थगिती सरकार आहे. अद्याप या सरकारने खातेवाटपही केलं नाही, त्यामुळे नेमके कुणाला प्रश्न विचारायचे असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच, शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार, सरसकट कर्जमाफी कधी होणार याचा किमान कार्यक्रम तरी जाहीर करावा, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  निवडणूक काळात या राजकीय पक्षांकडून जी सर्व आश्वासनेच होती, तीच आठवण आम्ही करून देत आहोत. सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये, हे सरकार स्थगिती सरकार असून महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाल्याचं दिसत आहे. सरकारच्या भूमिकेमुळे राज्यात असंतोष असून स्थगिती अशीच राहणार का? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीShiv SenaशिवसेनाGovernmentसरकार