शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

पाच वर्षे नव्हे, पाच पिढ्या महाविकास आघाडीचे सरकार राहील, उद्धव ठाकरेंना विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 17:51 IST

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारबाबत मोठे भाष्य केले आहे.

नागपूर - महाविकास आघाडीमधील आम्ही घटकपक्ष एकदिलाने एकत्र आलो आहोत. त्यामुळे  पुढची पाच वर्षेच नाही तर पुढील पाच पिढ्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत राहील, असा विश्वास मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपूरमध्ये आले आहेत. दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या सत्कारानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सरकारच्या दीर्घकाळ चालण्याबाबत विश्वास व्यक्त केला.  

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. या अधिवेशनासाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि त्यांचे मंत्रिमंडळ नागपूरमध्ये दाखल झाले आहे. आज नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीकडून सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले, ते म्हणाले की,  महाविकास आघाडीमधील आम्ही घटकपक्ष एकदिलाने एकत्र आलो आहोत. त्यामुळे  पुढची पाच वर्षेच नाही तर पुढील पाच पिढ्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत राहील. आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हाला काहीही चिंता करण्याची गरज नाही. 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी  देशाला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे सरकार आणि शासन महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार देईल, असे आश्वासनही दिले. 

 दरम्यान, अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीचं सरकार हे स्थगिती सरकार आहे. अद्याप या सरकारने खातेवाटपही केलं नाही, त्यामुळे नेमके कुणाला प्रश्न विचारायचे असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच, शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार, सरसकट कर्जमाफी कधी होणार याचा किमान कार्यक्रम तरी जाहीर करावा, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  निवडणूक काळात या राजकीय पक्षांकडून जी सर्व आश्वासनेच होती, तीच आठवण आम्ही करून देत आहोत. सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये, हे सरकार स्थगिती सरकार असून महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाल्याचं दिसत आहे. सरकारच्या भूमिकेमुळे राज्यात असंतोष असून स्थगिती अशीच राहणार का? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीShiv SenaशिवसेनाGovernmentसरकार