शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंचा उल्लेख टाळला

By balkrishna.parab | Updated: October 1, 2017 08:11 IST

विजयादशमीच्या मुहुर्तावर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका करणाऱ्या नारायण राणे यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण भाषणात टाळला. 

मुंबई -  विजयादशमीच्या मुहुर्तावर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका करणाऱ्या नारायण राणे यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण भाषणात टाळला. काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराज होत पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर टीका केली होती. तसेच आपल्या भाजपा प्रवेशात आडकाठी ठरलेल्या उद्धव ठाकरेंवरही राणेंनी टीकास्र सोडले होते. बाळासाहेबांना उद्धव ठाकरेंएवढा त्रास कुणीही दिला नसेल, अशी बोचरी टीका नारायण राणेंनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीत बोलताना केली होती. त्यामुळे राणेंच्या टीकेला उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून प्रत्युत्तर देतील, अशी अपेक्षा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात राणेंचा अनुल्लेख करणेच योग्य समजले. दरम्यान, दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मोदींवर जोरदार टीका केली.  शिवसेनेचे सगळे काही खणखणीत अन् ठणठणीत असते. आम्ही सरकारला साथही देऊ आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रसंगी लाथा मारू, असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना केंद्र व राज्य सरकारमध्ये कायम राहणार असल्याचे शनिवारी स्पष्ट केले.दसरा मेळाव्यात ते म्हणाले की, देशभर कारभाराचा चिखल झाला आहे. मळच मळ दिसतो, कमळ कुठे दिसत नाही. स्वत: अच्छे दिनचे स्वप्न पाहणारे सरकार सामान्यांची झोप उडवत आहे. उद्धव यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. सहनशीलतेचा अंत पाहू नका. वाटेल त्या क्षणी निर्णय घेऊ, एवढाच काय तो इशारा ठाकरे यांनी दिला.मेळाव्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण गर्दीचा आकडा ओसरल्याचे दिसत होते. सत्तेतून बाहेर पडण्याची भूमिका उद्धव जाहीर करतील, या अपेक्षेने आलेल्या शिवसैनिकांची निराशा झाल्याचे जाणवत होते.आम्ही सत्तेत का आहोत असा सवाल करणाºयांना काश्मीर, बिहारमध्ये तत्वांशी तडजोड करून उपमुख्यमंत्रीपद घेतलेले कसे चालते?, असा सवाल करून,ठाकरे यांनी २५ वर्षांपासूनच्या मित्राला भाजपा संपवायला निघाल्याचा आरोप केला. संपवण्याचा प्रयत्न केल्यास देशच उसळेल असा इशारा त्यांनी दिला. सत्तेत राहून हिंदुत्व, महागाई, महिलारक्षण, शेतकºयांची कर्जमुक्ती यावर आमचे आंदोलन सुरूच राहील आणि ते चिघळेल, असे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान वा कुणाविषयी आचकट विचकट घोषणा देऊ नका, ती आपली संस्कृती नाही. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे BJPभाजपा