शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प होणार नाही, मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 21:50 IST

 गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये कळीच्या ठरलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली.

मुंबई -  गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये कळीच्या ठरलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी नाणार ग्रामस्थांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये नाणार ग्रामस्थांचाही समावेश होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी  ७६ टक्के प्रकल्पग्रस्तांची असंमत्तीपत्रे मुख्यमंत्र्यांना सादर केली. त्यानंतर ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये नाणार प्रकल्पाबाबतच्या एमओयूवर स्वाक्षऱ्या होणार नाहीत, अशी माहिती दिली.  रिफायनरी प्रकल्प नको असल्याबाबतची असंमत्तीपत्रे भरून मुख्यमंत्र्यांना देण्यात येतील, हे शिवसेनेने आधीच जाहीर केले होते. त्यानुसार आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत, आमदार वैभव नाईक तसेच स्थानिक समितीचे भाई सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.आपण ७६ टक्के प्रकल्पग्रस्तांची असंमत्तीपत्रे सोबत आणली असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. ही असंमत्तीपत्रे मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली. त्याची पडताळणी केली जाईल आणि जर स्थानिकांना हा प्रकल्प नको असेल तर तो रद्द केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.नाणार, सागवे परिसरातील १४ गावांमधून प्रकल्पाबाबतची नाराजी वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातूनही या प्रकल्पाबाबतचा विरोध वाढत आहे. आम्हाला प्रकल्प नकोच, अशी भूमिका दोन्ही जिल्ह्यातील स्थानिकांनी घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेनेही रिफायनरीला तीव्र विरोधाची भूमिका घेतली आहे.

उत्सुकता वाढलीगेल्या पाच ते सहा महिन्यातच रिफायनरी प्रकल्पाचा विरोध तीव्र झाला आहे. शिवसेनेने गेल्या तीन महिन्यात लोकांना पाठिंबा देत आपलाही विरोध असल्याचे जाहीर केले आहे. आता या प्रकल्पाचे नेमके काय होणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

रद्द होईल, असा विश्वास आहेस्थानिकांची असंमत्तीपत्रे पाहता हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असा आपल्याला विश्वास वाटत असल्याचे ही बैठक संपल्यानंतर आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा दरम्यान, नाणार प्रकल्पाबाबत चर्चा करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या चर्चेचा तपशील समोर आलेला नाही. मात्र राज्यातील राजकारण आणि आगामी निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.  

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे