शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ग्रामस्थांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प होणार नाही, मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 21:50 IST

 गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये कळीच्या ठरलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली.

मुंबई -  गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये कळीच्या ठरलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी नाणार ग्रामस्थांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये नाणार ग्रामस्थांचाही समावेश होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी  ७६ टक्के प्रकल्पग्रस्तांची असंमत्तीपत्रे मुख्यमंत्र्यांना सादर केली. त्यानंतर ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये नाणार प्रकल्पाबाबतच्या एमओयूवर स्वाक्षऱ्या होणार नाहीत, अशी माहिती दिली.  रिफायनरी प्रकल्प नको असल्याबाबतची असंमत्तीपत्रे भरून मुख्यमंत्र्यांना देण्यात येतील, हे शिवसेनेने आधीच जाहीर केले होते. त्यानुसार आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत, आमदार वैभव नाईक तसेच स्थानिक समितीचे भाई सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.आपण ७६ टक्के प्रकल्पग्रस्तांची असंमत्तीपत्रे सोबत आणली असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. ही असंमत्तीपत्रे मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली. त्याची पडताळणी केली जाईल आणि जर स्थानिकांना हा प्रकल्प नको असेल तर तो रद्द केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.नाणार, सागवे परिसरातील १४ गावांमधून प्रकल्पाबाबतची नाराजी वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातूनही या प्रकल्पाबाबतचा विरोध वाढत आहे. आम्हाला प्रकल्प नकोच, अशी भूमिका दोन्ही जिल्ह्यातील स्थानिकांनी घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेनेही रिफायनरीला तीव्र विरोधाची भूमिका घेतली आहे.

उत्सुकता वाढलीगेल्या पाच ते सहा महिन्यातच रिफायनरी प्रकल्पाचा विरोध तीव्र झाला आहे. शिवसेनेने गेल्या तीन महिन्यात लोकांना पाठिंबा देत आपलाही विरोध असल्याचे जाहीर केले आहे. आता या प्रकल्पाचे नेमके काय होणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

रद्द होईल, असा विश्वास आहेस्थानिकांची असंमत्तीपत्रे पाहता हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असा आपल्याला विश्वास वाटत असल्याचे ही बैठक संपल्यानंतर आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा दरम्यान, नाणार प्रकल्पाबाबत चर्चा करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या चर्चेचा तपशील समोर आलेला नाही. मात्र राज्यातील राजकारण आणि आगामी निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.  

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे