शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

उद्धव-राज महाराष्ट्र काय चालविणार?

By admin | Updated: July 16, 2014 03:33 IST

ज्यांना महापालिका नीट चालवता आली नाही, ते उद्धव-राज ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व काय करणार, अशी खिल्ली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात उडवली

कोल्हापूर : ज्यांना महापालिका नीट चालवता आली नाही, ते उद्धव-राज ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व काय करणार, अशी खिल्ली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात उडवली. विधानसभेच्या १४४ जागा घेऊन जास्तीत जास्त जागा निवडून आणत अजित पवार यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. येथील शाहू सांस्कृतिक मंदिरात हा मेळावा झाला. मनसेच्या उमेदवारांची लोकसभा निवडणुकीत अनामत रक्कम जप्त झाली. त्यांच्या ताब्यात असलेल्या नाशिक महापालिकेची अवस्था वाईट आहे. लोक निवडून देतात त्या संधीचे सोने केले पाहिजे, परंतु त्यांच्याच पक्षाचे आमदार आपण पुन्हा निवडून येणार नसल्याची भाषा करत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी तरी काय केले? त्यांच्याकडेही मुंबई महापालिकेची सत्ता आहे. तिथे त्यांनी कोणती चांगली कामे केली हे त्यांनी सांगावे. साखर कारखाना, दूध संस्था, बँक यांतील कोणती संस्था त्यांनी काढली हे सांगावे. काही न करताच ते ‘मातोश्री’वर बसून माझ्या केसाला धक्का लागल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, अशी भाषा करतो. अरे बाबा, त्यासाठी तू बाहेर तरी पड. त्याशिवाय तुझ्या केसाला धक्का कसा लागणार, असा टोला पवार यांनी लगावला.महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करत ‘नंबर वन’चा पक्ष करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले व विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. मेळाव्यात पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी भाजपा-शिवसेना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढविला. जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण, माजी खासदार निवेदिता माने, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)