शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

'शिवसेना संपायला उद्धव आणि आदित्य ठाकरेच जबाबदार,आता शिवसेना कदापि उभी राहणार नाही', नारायण राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 09:13 IST

Narayan Rane Criticize Uddhav Thackeray: शिवसेना संपायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असून,मुख्यमंत्री असताना त्याना सरकार वाचवता आले नाही.यांच्या सारखे दुर्देव ते काय आता शिवसेना कदापी उभी राहणार नाही, अशी जोरदार टीका केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी केली

सावंतवाडी - शिवसेना संपायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असून, मुख्यमंत्री असताना त्याना सरकार वाचवता आले नाही.यांच्या सारखे दुर्देव ते काय आता शिवसेना कदापी उभी राहणार नाही, अशी जोरदार टीका केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी केली. तसेच सतत सरकार पडणे हे महाराष्ट्राच्या हिताचे नसल्याचे सांगत शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ माणसाने पाडायची भाषा न करता अभिनंदन करावे, असे ही राणे म्हणाले.

केंद्रिय मंत्री राणे हे गोव्यावरून कणकवली कडे जात असताना सावंतवाडीत थांबले असता पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,संजू परब,अजय गोंदावले, लखम सावंत भोसले,बड्या कोरगावकर, मनोज नाईक, आनंद नेवगी,दिपाली भालेकर,उत्कर्षा सासोलकर,बंटी पुरोहित आदि उपस्थित होते.

राणे म्हणाले,मुख्यमंत्री असतना आमदार खासदार यांना न भेटणे मंत्र्यांना तासनतास ताटकळत उभे करून ठेवणे यामुळेच ठाकरे यांच्या बाबतचा रोष निर्माण झाला असून,त्यामुळेच हे आमदार फुटले आहेत संजय राऊत यांनी शिवसेनेला मागे न्याचे काम केले आहे.ठाकरे यांना मातोश्री दिसायचे आणि राणे यांना टार्गेट करणे हाच त्याचा एकमेव उद्देश होता.असे ही राणे म्हणाले पण मी सांगितल्या प्रमाणे हे सरकार कोसळले असल्याचे त्यांनी सांगितले.आता महाराष्ट्र विकासाकडे वाटचाल करीत असून नवनवीन प्रकल्प राज्यात येतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हेच चांगले कम करतील असा आपणास विश्वास असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी हे सरकार सहा महिन्यात कोसळेल असे म्हटले होते त्यावर भाष्य करतना राणे यांनी महाराष्ट्र सतत सरकार कोसळत राहिले तर विकास कसा होणार राज्याच्या हिताचे नाही.त्यामुळे पवार यांनी कधी तरी चांगले बोलावे असा टोला लगावला.

राणे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर बोलणे टाळत केसरकर यांच्या प्रश्नावर नो कॉमेंट्स असे उत्तर दिले तर विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या कौतुकावर बोलणे टाळत खरीच आमची आदरयुक्त भिती होती दहशतवाद करत बसलो नव्हता.किंवा मी मुख्यमंत्री आहे हे सांगावे लागत नव्हते असा टोला ही उध्दव ठाकरे यांना लगावला.

शिंदे फडणवीस आजच दिल्लीला गेलेतआमदार नितेश राणे हे मंत्री होणार का?या प्रश्नावर त्यांनी बोलण्याचे टाळत पक्ष काय तो निर्णय घेईल असे सांगितले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजच दिल्लीला गेले असून, अद्याप यादी तयार झाली नसल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार