शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“नागरिकांना त्रास होऊ नये, गणेशोत्सवात ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन कितपत योग्य?”: उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 18:03 IST

Uday Samant Reaction Over ST Strike: गणेश भक्तांचा विचार करावा, भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी संप मागे घ्यावा, असे आवाहन उदय सामंत यांनी केले.

Uday Samant Reaction Over ST Strike: मुख्यमंत्र्यांकडेच परिवहन विभाग आहे. त्यांच्या सूचनेनुसारच एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. एक गोष्ट समजत नाही. गणपती उत्सव हा इतका मोठ्या ताकदीचा उत्सव साजरा केला असतो. असे असताना अशा प्रकारचे आंदोलन होणे हे कितपत योग्य आहे, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. गणेशोत्सवात कोणत्याही नागरिकाला जाण्या-येण्यास त्रास होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी बैठकीत काय चर्चा झाली, याबाबत सविस्तर माहिती दिली. चार वर्षापूर्वीच्या संपात माझ्या सारख्याच कार्यकर्त्याने मध्यस्थीची भूमिका घेतली होती. तशी भूमिका घेण्याचा मी प्रयत्न केला.  मी त्यांना विनंती केली की, सरकारमधील मुख्यमंत्री तुमच्यासोबत बैठक घेण्याबाबत पत्र देतात, त्यामध्ये खरेपणा आहे. उद्या मुख्यमंत्री तुमच्यासोबत बैठक घेतील तेव्हा चर्चा करा. तुमच्या प्रश्नांवर नक्की सकारात्मक निर्णय होईल, अशाप्रकारची भूमिका मी त्यांच्यापुढे मांडली. आमचे सहकारी आमदार सदाभाऊ खोत किंवा आमदार गोपीचंद पडळकर असतील, त्यांच्यासोबतही मी चर्चा करणार आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

एसटी कर्मचारी आनंदात असला पाहिजे ही एकनाथ शिंदेंची भूमिका

एसटी कर्मचारी कायम स्वरुपी आनंदात असला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी करतो असे सांगितले होते. जनतेचा विशेषत: गणेश भक्तांचा विचार करावा, ही माझी विनंती आहे. सरकार आपल्या निर्णाबाबत सकारात्मक आहे. आपणही गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही, यासाठी संप मागे घ्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार नक्की सकारात्मक होते, आहे आणि भविष्यातही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये हीच भूमिका सरकारची राहिलेली आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, एसटी महामंडळाबाबत काही निर्णय घेतले गेले. महिलांसाठी अर्धतिकीट असेल, ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना मोफत प्रवास, यामुळे जो डिफरन्स आहे, तो शासनाने द्यायला सुरुवात केली. गेले कित्येक वर्ष एसटी महामंडळ जे मागे वाटत होते, त्याचे नुकसान भरण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो. सगळेच एसटी महामंडळ नफ्यामध्ये आले आहे, असा दावा नाही. पण या योजनांमुळे एसटी महामंडळाला बऱ्यापैकी शासनाकडून निधी उपलब्ध होत आहे, हे सगळ्या संघटनांना सांगितले. नवीन गाड्यांच्या बाबतीतही संघटनांशी चर्चा झाली. याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्या सात वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीचे पत्र देण्याचा प्रयत्न आंदोलक कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे डेपोतील जे कर्मचारी असतात, त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय देतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी देत बैठक संपली, असे उदय सामंत यांनी सांगितले. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपUday Samantउदय सामंत