शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:30 IST

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव यांनी व्यक्त केलेल्या नारजीबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होते, मी तेव्हा बोललो. मी आजही बोलेन. उद्याही बोलेन. मला मंत्रिपद का मिळायला नको, हे मला कोणी सांगायला हवे. कार्यकर्ते कमी होत आहे, म्हणून निवृत्ती घ्यायचे काहीच कारण नाही. ३९ जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे. शेवटी आठ-आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असे वाटते की, आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळे कारण नाही, असे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले होते. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्याच एका नेत्याने भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद होईल, असे म्हटले आहे.

भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्याने निवृत्तीचा विचार करणे योग्य नाही, अशी माझी भावना आहे. माझे हे वक्तव्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा टोमणा नाही. ही माझी खरी भावना आहे. भास्कर जाधव यांनी अनेकदा माझ्यावर टीका केली आहे. माझ्याबद्दल बोलताना मातोश्रीवरचा राग काढला आहे. मी जवळचा माणूस असल्यामुळे त्यांचे ऐकून घेतो. म्हणूनच माझ्यावर राग काढतात. मात्र, ते जे काही बोलले त्या मातोश्रीच्या भावना होत्या. भास्कर जाधव हे मातोश्रीवर प्रचंड नाराज असल्याचे माध्यमातूनच समजले. मी ही त्यावर खुल्या मनाने सांगतो की, भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले तर आम्हाला आनंद होईल, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

एकनाथ शिंदे सुरतला गेले, होते तेव्हा भास्कर जाधव आले होते

एकनाथ शिंदे सुरतला गेले, होते तेव्हा भास्कर जाधव हे पण सुरतपर्यंत आले होते, ते सुरतच्या बॉर्डरपर्यंत जाऊन आले. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, तुम्ही येऊ नका, असा दावा करतानाच भास्कर जाधव नौटंकी करत आहेत. उद्धव ठाकरेंकडे येऊन चूक केली असे ते म्हणतात. गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना संन्यास देणार आहे, ते फक्त १२०० मतांनी निवडून आलेले आहेत, या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला.

दरम्यान, भास्कर जाधव जे बोलले तेवढा तो मोठा माणूस नाही. १९९५ आणि २००० मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितले होते. नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कोणी पकडू शकणार नाही. भास्कर जाधव हे खोटारडे आहेत.  एखाद्या व्यक्तीला बदनाम कसे करायचे हे भास्कर जाधव यांच्याकडू शिकावे, अशी टीका रामदास कदम यांनी केली. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतBhaskar Jadhavभास्कर जाधव