शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

उदय सामंत बंधुंनी पुन्हा एकदा कच खाल्ली! नारायण राणेंच्या कट्टर विरोधकाने तेव्हा आग्रह केलेला, पण...

By हेमंत बावकर | Updated: April 18, 2024 16:06 IST

Kiran Samant vs Narayan Rane: एवढे दिवस ताणून ठेवणाऱ्या राज्याचे मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत या बंधुंनी आज या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे स्पष्ट केले. यामुळे भाजपाने नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली.

- हेमंत बावकर

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या उमेदवारीवरून एवढे दिवस ताणून ठेवणाऱ्या राज्याचे मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत या बंधुंनी आज या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे स्पष्ट केले. यामुळे भाजपाने नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली. हे पहिल्यांदाच नाही तर दुसऱ्यांदा घडले आहे. तेव्हाही सामंत बंधुंनी कच खाल्ली होती आणि खासदारकीची जागा नारायण राणेंचे थोरले पूत्र निलेश राणेंना सोडली होती. 

गोष्ट २००९ ची. तेव्हा कोकणात नाही म्हणायला बऱ्यापैकी राष्ट्रवादीची ताकद होती. या मतदारसंघात दोन राष्ट्रवादीचे आमदार होते. कणकवलीत राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी प्रस्थ होते. देवगडातही होते. नारायण राणे तेव्हा काँग्रेसमध्ये होते. तर सामंत बंधू राष्ट्रवादीत. तेव्हा रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघ कोण लढविणार यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत नारायण राणेंचे कट्टर विरोधक संदेश पारकर यांनी उदय सामंत यांना दावेदारी सांगा, ही सीट आपल्याला लागेल असे सांगितले होते. अनेकदा आग्रह करूनही उदय सामंत यांनी तेव्हा माघार घेतली होती. व ही सीट निलेश राणेंना सोडली होती. पुढे निलेश राणे या मतदारसंघातून खासदार झाले. तेव्हा कच खाल्ली नसती तर कदाचित सामंत बंधुंपैकी एक खासदार झाले असते. 

यानंतर दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलले. संदेश पारकर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र असल्याने नारायण राणेंसोबत आले. वैभव नाईक शिवसेनेत गेले. किरण सामंत व उदय सामंत शिवसेनेत आले. तशीच संधी आता किरण सामंतांना चालून आली होती. पार बांद्यापर्यंत किरण सामंत यांचे बॅनर गेल्या काही वर्षांपासून लागलेले दिसत होते. ही जागा शिवसेनेची होती. शिंदेंनी शिवसेना पक्ष ताब्यात घेतला आणि सामंतांना तेच दावेदार असल्याचे वाटू लागले होते. 

मुंबई-गोवा हायवे असो की अन्य गावा गावात किरण सामंतांचे बॅनर दिसत होते. किरण सामंत हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे यामुळे त्यांचे तिकडे येणे जाणे वाढले होते. रत्नागिरीत व्यवसाय आणि पसारा असल्याने त्यांच्यासाठी वातावरण अनुकुल ठरले होते. यामुळेच दोघेही बंधू यावेळी उमेदवारीसाठी आग्रही होते. २०१४, २०१९ मध्ये निलेश राणेंचा पराभव झाल्याने व ही जागा मुळची शिवसेनेचीच असल्याने सामंतांनी आग्रह करण्यास सुरुवात केली होती. परंतु, अचानक आज त्यांनी दावा सोडल्याचे जाहीर केले. यामागे किरण सामंतांना विधानसभेवर पाठविण्याचा शब्द भाजपाकडून मिळाल्याची चर्चा आहे. कदाचित राजापूर मतदारसंघातून किरण सामंतांना विधानसभेचे तिकीट मिळण्याचे व तिथे राणेंचे समर्थन मिळण्याचा शब्द मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतNarayan Raneनारायण राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४