शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

उदय सामंत बंधुंनी पुन्हा एकदा कच खाल्ली! नारायण राणेंच्या कट्टर विरोधकाने तेव्हा आग्रह केलेला, पण...

By हेमंत बावकर | Updated: April 18, 2024 16:06 IST

Kiran Samant vs Narayan Rane: एवढे दिवस ताणून ठेवणाऱ्या राज्याचे मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत या बंधुंनी आज या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे स्पष्ट केले. यामुळे भाजपाने नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली.

- हेमंत बावकर

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या उमेदवारीवरून एवढे दिवस ताणून ठेवणाऱ्या राज्याचे मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत या बंधुंनी आज या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे स्पष्ट केले. यामुळे भाजपाने नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली. हे पहिल्यांदाच नाही तर दुसऱ्यांदा घडले आहे. तेव्हाही सामंत बंधुंनी कच खाल्ली होती आणि खासदारकीची जागा नारायण राणेंचे थोरले पूत्र निलेश राणेंना सोडली होती. 

गोष्ट २००९ ची. तेव्हा कोकणात नाही म्हणायला बऱ्यापैकी राष्ट्रवादीची ताकद होती. या मतदारसंघात दोन राष्ट्रवादीचे आमदार होते. कणकवलीत राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी प्रस्थ होते. देवगडातही होते. नारायण राणे तेव्हा काँग्रेसमध्ये होते. तर सामंत बंधू राष्ट्रवादीत. तेव्हा रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघ कोण लढविणार यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत नारायण राणेंचे कट्टर विरोधक संदेश पारकर यांनी उदय सामंत यांना दावेदारी सांगा, ही सीट आपल्याला लागेल असे सांगितले होते. अनेकदा आग्रह करूनही उदय सामंत यांनी तेव्हा माघार घेतली होती. व ही सीट निलेश राणेंना सोडली होती. पुढे निलेश राणे या मतदारसंघातून खासदार झाले. तेव्हा कच खाल्ली नसती तर कदाचित सामंत बंधुंपैकी एक खासदार झाले असते. 

यानंतर दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलले. संदेश पारकर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र असल्याने नारायण राणेंसोबत आले. वैभव नाईक शिवसेनेत गेले. किरण सामंत व उदय सामंत शिवसेनेत आले. तशीच संधी आता किरण सामंतांना चालून आली होती. पार बांद्यापर्यंत किरण सामंत यांचे बॅनर गेल्या काही वर्षांपासून लागलेले दिसत होते. ही जागा शिवसेनेची होती. शिंदेंनी शिवसेना पक्ष ताब्यात घेतला आणि सामंतांना तेच दावेदार असल्याचे वाटू लागले होते. 

मुंबई-गोवा हायवे असो की अन्य गावा गावात किरण सामंतांचे बॅनर दिसत होते. किरण सामंत हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे यामुळे त्यांचे तिकडे येणे जाणे वाढले होते. रत्नागिरीत व्यवसाय आणि पसारा असल्याने त्यांच्यासाठी वातावरण अनुकुल ठरले होते. यामुळेच दोघेही बंधू यावेळी उमेदवारीसाठी आग्रही होते. २०१४, २०१९ मध्ये निलेश राणेंचा पराभव झाल्याने व ही जागा मुळची शिवसेनेचीच असल्याने सामंतांनी आग्रह करण्यास सुरुवात केली होती. परंतु, अचानक आज त्यांनी दावा सोडल्याचे जाहीर केले. यामागे किरण सामंतांना विधानसभेवर पाठविण्याचा शब्द भाजपाकडून मिळाल्याची चर्चा आहे. कदाचित राजापूर मतदारसंघातून किरण सामंतांना विधानसभेचे तिकीट मिळण्याचे व तिथे राणेंचे समर्थन मिळण्याचा शब्द मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतNarayan Raneनारायण राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४