शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

उदय सामंत बंधुंनी पुन्हा एकदा कच खाल्ली! नारायण राणेंच्या कट्टर विरोधकाने तेव्हा आग्रह केलेला, पण...

By हेमंत बावकर | Updated: April 18, 2024 16:06 IST

Kiran Samant vs Narayan Rane: एवढे दिवस ताणून ठेवणाऱ्या राज्याचे मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत या बंधुंनी आज या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे स्पष्ट केले. यामुळे भाजपाने नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली.

- हेमंत बावकर

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या उमेदवारीवरून एवढे दिवस ताणून ठेवणाऱ्या राज्याचे मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत या बंधुंनी आज या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे स्पष्ट केले. यामुळे भाजपाने नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली. हे पहिल्यांदाच नाही तर दुसऱ्यांदा घडले आहे. तेव्हाही सामंत बंधुंनी कच खाल्ली होती आणि खासदारकीची जागा नारायण राणेंचे थोरले पूत्र निलेश राणेंना सोडली होती. 

गोष्ट २००९ ची. तेव्हा कोकणात नाही म्हणायला बऱ्यापैकी राष्ट्रवादीची ताकद होती. या मतदारसंघात दोन राष्ट्रवादीचे आमदार होते. कणकवलीत राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी प्रस्थ होते. देवगडातही होते. नारायण राणे तेव्हा काँग्रेसमध्ये होते. तर सामंत बंधू राष्ट्रवादीत. तेव्हा रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघ कोण लढविणार यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत नारायण राणेंचे कट्टर विरोधक संदेश पारकर यांनी उदय सामंत यांना दावेदारी सांगा, ही सीट आपल्याला लागेल असे सांगितले होते. अनेकदा आग्रह करूनही उदय सामंत यांनी तेव्हा माघार घेतली होती. व ही सीट निलेश राणेंना सोडली होती. पुढे निलेश राणे या मतदारसंघातून खासदार झाले. तेव्हा कच खाल्ली नसती तर कदाचित सामंत बंधुंपैकी एक खासदार झाले असते. 

यानंतर दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलले. संदेश पारकर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र असल्याने नारायण राणेंसोबत आले. वैभव नाईक शिवसेनेत गेले. किरण सामंत व उदय सामंत शिवसेनेत आले. तशीच संधी आता किरण सामंतांना चालून आली होती. पार बांद्यापर्यंत किरण सामंत यांचे बॅनर गेल्या काही वर्षांपासून लागलेले दिसत होते. ही जागा शिवसेनेची होती. शिंदेंनी शिवसेना पक्ष ताब्यात घेतला आणि सामंतांना तेच दावेदार असल्याचे वाटू लागले होते. 

मुंबई-गोवा हायवे असो की अन्य गावा गावात किरण सामंतांचे बॅनर दिसत होते. किरण सामंत हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे यामुळे त्यांचे तिकडे येणे जाणे वाढले होते. रत्नागिरीत व्यवसाय आणि पसारा असल्याने त्यांच्यासाठी वातावरण अनुकुल ठरले होते. यामुळेच दोघेही बंधू यावेळी उमेदवारीसाठी आग्रही होते. २०१४, २०१९ मध्ये निलेश राणेंचा पराभव झाल्याने व ही जागा मुळची शिवसेनेचीच असल्याने सामंतांनी आग्रह करण्यास सुरुवात केली होती. परंतु, अचानक आज त्यांनी दावा सोडल्याचे जाहीर केले. यामागे किरण सामंतांना विधानसभेवर पाठविण्याचा शब्द भाजपाकडून मिळाल्याची चर्चा आहे. कदाचित राजापूर मतदारसंघातून किरण सामंतांना विधानसभेचे तिकीट मिळण्याचे व तिथे राणेंचे समर्थन मिळण्याचा शब्द मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतNarayan Raneनारायण राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४