दो साल बुरा हाल.. सोलापूरमध्ये काँग्रेसचे बोंबाबोंब आंदोलन

By Admin | Updated: May 30, 2016 16:13 IST2016-05-30T16:11:51+5:302016-05-30T16:13:25+5:30

सरकारला २ वर्षे पूर्ण झाली पण अच्छे दिनाची पूर्तता अद्याप झाली नाही असे सांगत शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाने सोमवारी सोलापूरमध्ये बोंबाबोंब आंदोलन केले़.

Two years of bad news .. Congress's Bongaabomb movement in Solapur | दो साल बुरा हाल.. सोलापूरमध्ये काँग्रेसचे बोंबाबोंब आंदोलन

दो साल बुरा हाल.. सोलापूरमध्ये काँग्रेसचे बोंबाबोंब आंदोलन

>अच्छे दिनची दुसरी पुण्यतिथी साजरी
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ३० -  मोदी सरकार अच्छे दिनच्या नावाखाली संपूर्ण देशातील जनतेला फसविण्याचे काम केले आहे़. केंद्र सरकारला २ वर्षे पूर्ण झाली परंतू अच्छे दिनाची पूर्तता अद्याप झालेली नाही़, दो साल बुरा हाल अशीच सरकारची अवस्था झाल्याने शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले़ याचवेळी अच्छे दिनची दुसरी पुण्यतिथी साजरी करण्यात आली़
या आंदोलनात शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, निर्मलाताई ठोकळ, प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, महापौर सुशिलाताई आबुटे, सरचिटणीस अलका राठोड, माजी महापौर नलिनीताई चंदेले, सोमपा पक्षनेते संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, नगरसेवक आरीफ शेख, चेतन नरोटे, शिवा बाटलीवाला, अनिल पल्ली, सुनिल खटके, सरचिटणीस राहुल गायकवाड, आझम सैपन, अमोल शिंदे, बाबा करगुळे, गणेश डोंगरे, अशोक कलशेट्टी, पैगंबर शेख, दत्तू बंदपट्टे, नगरसेविका अश्विनी जाधव, सुजाता आकेन, मंदाकिनी तोडकरी, फिरदोस पटेल, तिरूपती परकीपंडला, सातलिंग शटगार, प्रा़ सिद्राम सलवदे, अर्जुन पाटील, भिमाशंकर जमादार, जावेद शिकलगार, अरूण इंगळे, हणमंत सायबोळू, युवराज पंतूवाले, दिनेश धोडके, सचिन शिंदे, सुभाष वाघमारे, पार्वती काळे, हारूण शेख, अनिल मस्के, सोपान थोरात, सुमन जाधव आदी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला २६ मे रोजी दोन वर्षे पूर्ण झाली़ लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नाही़ सत्तेत आल्यास काळा पैसा परत आणू, शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणार, महागाई कमी करणार, जीवनाश्यक वस्तुच्या किंमती कमी करणार, स्वस्त धान्य देण्याकरिता सरकारकडून दिले जाणारे अशंदान बंद करण्यात आले़ इंदिरा आवास योजना बंद करण्यात आली़ शासकीय योजना या धुळफेक अशा विविध घोषणा अद्याप तशाच आहेत़ त्या पूर्णत्वास आल्या नाहीत़ आश्वासनाची खैरात करणारे भाजप सरकार खोटारडे आहे़ असा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे़
कोण काय म्हणाले :
दुष्काळाने देश होरपळत असताना भाजप सरकार कोणतीच मदत करीत नाही : धर्मा भोसले
महात्मा गांधीजीची हत्या आरएसएसने केली : माजी महापौर निर्मलाताई ठोकळ
आयत्या पिठावर रेघोट्या मारणाºया भाजप सरकारला लाज वाटली पाहिजे : महापौर सुशिला आबुटे 
मोदी सरकारचे जाहिरात युग सुरू आहे : माजी आमदार दिलीप माने

Web Title: Two years of bad news .. Congress's Bongaabomb movement in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.