शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार शेतकऱ्यांच्या नावे उचलले होते २० कोटींचे कर्ज

By admin | Updated: August 17, 2016 21:23 IST

लोकमंगल अ‍ॅग्रो या कंपनीच्या वतीने लोहारा शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर साखर कारखाना सुरू केला आहे.

ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. 17 - राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अ‍ॅग्रो या कंपनीच्या वतीने लोहारा शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर साखर कारखाना सुरू केला आहे. या कारखान्यासाठी शेतकऱ्यांना कसल्याही स्वरूपाची माहिती न देता कंपनीने लोहाऱ्यासह परिसरातील सुमारे दोन हजार शेतकऱ्यांच्या नावे थोडेथोडके नव्हे, तर २० कोटी रूपयांचे कर्ज ‘इको’ या बँकेकडून उचलले होते. काही शेतकऱ्यांना बँकेकडून नोटिसा आल्यानंंतर या प्रकाराचा भांडाफोड झाला. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ‘लोकमंगल’ने या रकमेची परतफेड केली आहे. ‘लोकमंगल’ समुहाचा सोलापूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातही विविध क्षेत्रात मोठा दबदबा आहे. राज्याचे सहकामंत्री असलेले सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अ‍ॅग्रो या कंपनीने साखर कारखाना उभारण्यासाठी तब्बल ४ हजार ७५१ गुंतवणूकदारांकडून ७४.८२ कोटी रूपये ‘सेबी’च्या नियमांकडे कानाडोळा करून जमविल्याचा ठपका ठेवत सदरील रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह परत करण्याबाबतचे आदेश काढले आहेत. ‘लोकमंगल’कडून ही रक्कम २००९ ते २०१५ या कालावधीत वसूल करण्यात आली होती. ‘लोकमंगल’च्या या कारभाराचे चटके लोहाऱ्यासह परिसरातील एक -दोन नव्हे, तर हजारो शेतकऱ्यांना सोसावे लागले आहेत. लोहारा तालुक्यातील खेड येथे लोकमंगल अ‍ॅग्रो या कंपनीच्या वतीने ‘लोकमंगल माऊली शुगर इंडस्ट्रीज’ या नावाने कारखाना सुरू करण्यात आला आहे. सदरील कारखाना उभारणीसाठी सुमारे दोन हजार शेतकऱ्यांच्या नावे ‘इको’ बँकेकडून कर्ज घेण्यात आले. विशेष म्हणजे सदरील कर्जप्रकरणे करताना शेतकऱ्यांना साधी कल्पनाही दिली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या डोक्यावर कर्ज आहे, याची पुसटशीही कल्पना नव्हती. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दोन हजार शेतकऱ्यांपैकी काहीजणांना ‘इको’ बँकेकडून कर्जाचा भरणा करण्यासंदर्भात नोटीसा पाठविण्यात आल्या. त्यामुळे कसलेही कर्ज न घेता थेट वसुलीच्या नोटीसाच हातात पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे धास्तावलेल्या काही शेतकऱ्यांनी थेट ‘इको’ बँक गाठून संबंधित अधिकाऱ्यांकडे या कर्जाबाबत विचारणा केली. त्यानंतर हा सर्व गोंधळ समोर आला. त्यावर शेतकऱ्यांनी याबाबत ‘लोकमंगल’कडे तक्रारी केल्या. तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर ‘लोकमंगल’कडून उपरोक्त कर्ज रकमेची परतफेड करण्यात आल्याचे बँकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रकमेची परफेड झाली असली तरी संबंधित शेतकऱ्यांना मागील पाच ते सहा महिने प्रचंड मानसिक आणि अर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले.