शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीमध्ये वीज कोसळून 2 जणांचा मृत्यू, 5 जखमी

By admin | Updated: June 6, 2017 08:05 IST

मराठवाड्यामध्ये पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा कहर सुरू आहे. शहर आणि परिसरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे.

ऑनलाइन लोकमत

हिंगोली, दि. 6 - मराठवाड्यामध्ये पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा कहर सुरू आहे. शहर आणि परिसरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे अनेक भागातील वीज गायब झाली आहे. 
 
तर सेनगावातील जामरुन आंधमध्ये वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल आहे तर दोन जण जखमी झाले आहेत.  दुसरीकडे, भोसीमध्ये वीज पडून तिन जण जखमी झाले आहेत. 
 
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भमध्ये गेल्या काही दिवसांत पावसानं हजेरी लावली असली तरी राज्यातील काही भागांमध्ये म्हणावं त्याप्रमाणे पावसाला सुरुवात झालेली नाही. यामुळे उकाड्यानं सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे.
 
(महाराष्ट्रात ७ जूननंतर मान्सूनधारा!)
 
केरळात नेहमीपेक्षा एक दिवस अगोदरच (३० मे) आलेला मान्सून पश्चिमेकडील शुष्क वाऱ्याच्या दबावामुळे तिथेच थबकला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अजून ३ ते ४ दिवस तरी मान्सून राज्यात येण्याची शक्यता नाही, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
 
मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर तो पुढील वाटचाल वेगाने करेल, अशी शक्यता हवामान विभागाने यापूर्वी व्यक्त केली होती़ त्याच दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात मोरा चक्रीवादळ निर्माण झाले़ यामुळे सर्व बाष्प इशान्यकडे खेचले गेल्याने, मान्सूनच्या पश्चिम शाखेची पुढील वाटचाल रोखली गेली आहे़
 
ईशान्य शाखेने बांगला देश, म्यानमार व ईशान्यकडील राज्यात धडक मारली होती़ मात्र, २ जूननंतर तेथील वाटचालदेखील थांबलेली आहे़
 
सर्वसाधारणपणे मान्सून ५ जूनपर्यंत कर्नाटकाची किनारपट्टी, कारवार, गदग, हैदराबाद, विशाखापट्टम, पश्चिम बंगालचा उपसागर, बांगला देशातील ढाक्कापर्यंत मजल मारत असतो़, पण यंदा लवकर येऊनही त्याची प्रगती केरळच्या काही भागापर्यंतच झालेली आहे़
 
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले, तरी त्याच्या पुढील प्रगतीसाठी आवश्यक असे हवामानात बदल घडून आले नाहीत़ सौदी अरेबिया व त्या परिसरातील वाळवंटी भागातून येणाऱ्या शुष्क वाऱ्यांचा दबाव जास्त आहे़ संपूर्ण उत्तर भारत अशा वाऱ्यांनी व्यापला आहे़ आकाशात ढग आहेत, पण या वाऱ्यांमुळे त्यात वाढ होऊन पाऊस पडू शकत नाही़
 
यामुळे दक्षिणेतील अनेक राज्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे़ पश्चिम भागात चक्राकार गती निर्माण झाली असली, तरी वाळवंटी प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर जास्त असल्याने पावसाचे प्रमाण कमी आहे़
 
पाऊस उशिरा सुरू होत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत़ पक्षी-प्राणीही गरमीने त्रस्त झाले आहेत़
 
पावसाचा दिलासा
 
गेल्या चार दिवसांत राज्यात पूर्वमोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे़ कोकणात ३६ टक्के, मध्य महाराष्ट्रात २२, विदर्भात ९ आणि मराठवाड्यात ४४ टक्के जादा पाऊस झाला आहे़
 
>मान्सूनची प्रगती थांबल्याचा सर्वाधिक परिणाम तामिळनाडूवर झाला असून, गेल्या १ ते ४ जून दरम्यान तामिळनाडूत सरासरीपेक्षा ५४ टक्के पाऊस कमी झाला आहे़ दक्षिण कर्नाटकात ५६ टक्के कमी पाऊस झाला असून, रायलसीमा ४१ टक्के आणि कर्नाटक अंतर्गत भागात ३३ टक्के कमी पाऊस झाला आहे़ कर्नाटकच्या किनारपट्टीवर सरासरी एवढा पाऊस झाला आहे़
 
१ ते ४ जून दरम्यान राज्यातील पाऊस (मिमी)
 
विभाग           सरासरी पाऊस  प्रत्यक्षात पडलेलाटक्केवारी
 
कोकण    २९.५४०३६
 
मध्य महाराष्ट्र   ९.७११.८२२
 
मराठवाडा         ९.५१३.६४४
 
विदर्भ   ६.२६.८