शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीमध्ये वीज कोसळून 2 जणांचा मृत्यू, 5 जखमी

By admin | Updated: June 6, 2017 08:05 IST

मराठवाड्यामध्ये पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा कहर सुरू आहे. शहर आणि परिसरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे.

ऑनलाइन लोकमत

हिंगोली, दि. 6 - मराठवाड्यामध्ये पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा कहर सुरू आहे. शहर आणि परिसरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे अनेक भागातील वीज गायब झाली आहे. 
 
तर सेनगावातील जामरुन आंधमध्ये वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल आहे तर दोन जण जखमी झाले आहेत.  दुसरीकडे, भोसीमध्ये वीज पडून तिन जण जखमी झाले आहेत. 
 
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भमध्ये गेल्या काही दिवसांत पावसानं हजेरी लावली असली तरी राज्यातील काही भागांमध्ये म्हणावं त्याप्रमाणे पावसाला सुरुवात झालेली नाही. यामुळे उकाड्यानं सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे.
 
(महाराष्ट्रात ७ जूननंतर मान्सूनधारा!)
 
केरळात नेहमीपेक्षा एक दिवस अगोदरच (३० मे) आलेला मान्सून पश्चिमेकडील शुष्क वाऱ्याच्या दबावामुळे तिथेच थबकला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अजून ३ ते ४ दिवस तरी मान्सून राज्यात येण्याची शक्यता नाही, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
 
मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर तो पुढील वाटचाल वेगाने करेल, अशी शक्यता हवामान विभागाने यापूर्वी व्यक्त केली होती़ त्याच दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात मोरा चक्रीवादळ निर्माण झाले़ यामुळे सर्व बाष्प इशान्यकडे खेचले गेल्याने, मान्सूनच्या पश्चिम शाखेची पुढील वाटचाल रोखली गेली आहे़
 
ईशान्य शाखेने बांगला देश, म्यानमार व ईशान्यकडील राज्यात धडक मारली होती़ मात्र, २ जूननंतर तेथील वाटचालदेखील थांबलेली आहे़
 
सर्वसाधारणपणे मान्सून ५ जूनपर्यंत कर्नाटकाची किनारपट्टी, कारवार, गदग, हैदराबाद, विशाखापट्टम, पश्चिम बंगालचा उपसागर, बांगला देशातील ढाक्कापर्यंत मजल मारत असतो़, पण यंदा लवकर येऊनही त्याची प्रगती केरळच्या काही भागापर्यंतच झालेली आहे़
 
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले, तरी त्याच्या पुढील प्रगतीसाठी आवश्यक असे हवामानात बदल घडून आले नाहीत़ सौदी अरेबिया व त्या परिसरातील वाळवंटी भागातून येणाऱ्या शुष्क वाऱ्यांचा दबाव जास्त आहे़ संपूर्ण उत्तर भारत अशा वाऱ्यांनी व्यापला आहे़ आकाशात ढग आहेत, पण या वाऱ्यांमुळे त्यात वाढ होऊन पाऊस पडू शकत नाही़
 
यामुळे दक्षिणेतील अनेक राज्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे़ पश्चिम भागात चक्राकार गती निर्माण झाली असली, तरी वाळवंटी प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर जास्त असल्याने पावसाचे प्रमाण कमी आहे़
 
पाऊस उशिरा सुरू होत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत़ पक्षी-प्राणीही गरमीने त्रस्त झाले आहेत़
 
पावसाचा दिलासा
 
गेल्या चार दिवसांत राज्यात पूर्वमोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे़ कोकणात ३६ टक्के, मध्य महाराष्ट्रात २२, विदर्भात ९ आणि मराठवाड्यात ४४ टक्के जादा पाऊस झाला आहे़
 
>मान्सूनची प्रगती थांबल्याचा सर्वाधिक परिणाम तामिळनाडूवर झाला असून, गेल्या १ ते ४ जून दरम्यान तामिळनाडूत सरासरीपेक्षा ५४ टक्के पाऊस कमी झाला आहे़ दक्षिण कर्नाटकात ५६ टक्के कमी पाऊस झाला असून, रायलसीमा ४१ टक्के आणि कर्नाटक अंतर्गत भागात ३३ टक्के कमी पाऊस झाला आहे़ कर्नाटकच्या किनारपट्टीवर सरासरी एवढा पाऊस झाला आहे़
 
१ ते ४ जून दरम्यान राज्यातील पाऊस (मिमी)
 
विभाग           सरासरी पाऊस  प्रत्यक्षात पडलेलाटक्केवारी
 
कोकण    २९.५४०३६
 
मध्य महाराष्ट्र   ९.७११.८२२
 
मराठवाडा         ९.५१३.६४४
 
विदर्भ   ६.२६.८