शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

दोन मच्छीमार नौका बुडाल्या

By admin | Updated: August 23, 2016 03:06 IST

दोन मच्छिमार बोटी एकमेकांवर आदळल्याने त्यांना समुद्रात जलसमाधी मिळाल्याची घटना २१ आॅगस्ट रोजी रविवारच्या मध्यरात्री घडली.

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- तलासरी तालुक्यातील झाई गावच्या दोन मच्छिमार बोटी एकमेकांवर आदळल्याने त्यांना समुद्रात जलसमाधी मिळाल्याची घटना २१ आॅगस्ट रोजी रविवारच्या मध्यरात्री घडली. अपघातग्रस्त दोन्ही बोटीतील एकूण पंधरा खलाशांनी सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधला. मात्र मदत न मिळाल्याने अखेर शर्थीचे प्रयत्न करून त्यांनी किनारा गाठला. दरम्यान सुरक्षा यंत्रणे विरूद्ध मच्छिमारांनी तीव्र संपता व्यक्त केला आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातील झाई गावातील हस्तसागर बोट २१ आॅगस्ट रोजी दुपारी चार वाजता मासेमारीसाठी समुद्रात निघाली होती. मात्र किनाऱ्यापासून पाच किमी अंतरावर ती खडकावर आदळून अपघातग्रस्त झाली. या वेळी बोटीत नऊ खलाशांनी सायंकाळी सातच्या सुमारास मोबाईल फोनच्या साह्याने तटरक्षक दलाच्या १०९३ हेल्पलाईनवर अपघाताची माहिती देवून मदत मागितली. तसेच बंदरावरील स्थानिक मच्छिमारांनाही याबाबत कळविले. कृष्णसागर कृपा ही बोट मदतीला आली. मात्र अपघातग्रस्त बोटीला किनाऱ्याकडे घेऊन जात असतांना जोराचा वारा व लाटांच्या तडाख्यात सापडून दगडावर आपटल्याने कृष्णसागर बोटीत पाणी भरले. आपत्कालीन परिस्थितीत मदत यंत्रणेकडे धोक्याचा संकेत पाठविणारे बोटीवरील डॅट यंत्रही कुचकामी ठरले. रात्री नऊच्या सुमारास घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी अपघातग्रस्त बोटीवरील सूरज माच्छी या खलाशाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेऊन मदत पाठवीत असल्याचे सांगितले. मदत न आल्याने मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन्ही बोटी बुडत असल्याने जीव वाचविण्यासाठी सर्व खलाशी हे पाण्यात उड्या टाकत असल्याचे सूरजने शेलार यांना कळविले. त्यानंतर बांबू व बोयाचा तराफा बनवून जीव वाचविण्यासाठी खलाशांचा प्रयत्न सुरू झाला. डहाणू तसेच मुंबईतील तटरक्षक दलाची मदत मिळविण्यात पोलिसांना अपयश आले. उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, प्रांत अधिकारी, डहाणू व तलासरीचे तहसीलदार यांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने समुद्राची माहिती घेऊन शोध मोहीम आखली. या करीता उंबरगाव किनाऱ्यावरून तीन बोटी रवाना करण्यात आल्या. पालघर पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांनी भारतीय नौदलाकडे मदत मागितली असता पहाटे तीन वाजता हेलिकॉप्टरने शोध कार्य हाती घेतले. दरम्यान स्वबळावर समुद्रात शर्थीचे प्रयत्न करून सोमवारी पहाटे साडेतीन वाजता सूरजसह सर्व खलाशी उंबरगाव किनाऱ्यापर्यत पोहचले. महाराष्ट्र आणि गुजरात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खलाशांना उंबरगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांना तपासणीनंतर घरी पाठवण्यात आले. खलाशी सूरज माच्छीने अन्य चौदा खलाशांचे प्राण वाचविल्याने त्याचे विशेष कौतुक होत आहे. मच्छिमारांवरील अरिष्ट टळल्याने झाई गावात पूजेचे आयोजन करण्यात आले. >नौका बुडू लागली. मदतीची आशाही संपली. अखेर बोटीतील साहित्यांचा तरफा बनवून सहकाऱ्यांसह पाण्यात उड्या घेतल्या, नशीब बलवत्तर असल्याने सर्वांचे प्राण वाचले.- सूरज राजेश माच्छी, अपघातग्रस्त नौकेवरील खलाशीघटनास्थळी जाऊन आढावा घेतला. मच्छिमारांना मदत नाकारणाऱ्या सुरक्षा यंत्रणा व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.- पास्कल धनारे, आमदार, डहाणू विधानसभा मतदार संघ