शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

‘अवनी’च्या जीवावर उठलेला दोन पायांचा प्राणीच धोकादायक- प्रकाश आमटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 07:00 IST

अवनी वाघिणीच्या जीवावर लोक उठले. मात्र, कोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच (मनुष्य) सर्वात धोकादायक असल्याचे समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे म्हणाले.

औरंगाबाद : भामरागडसारख्या भागात काम करताना आदिवासी लोकांना समाजाच्या प्रवाहात आणताना वन्य प्राण्यांसाठीही काम केले. अनेक वर्षांत वन्यप्राणी स्वत:हून मानवावर हल्ला करतो, असे कधीच दिसले नाही; परंतु आज वन्यप्राणी हिंसक होत असल्याचे सांगत त्यांना मारले जात आहे. अवनी वाघिणीच्या जीवावर लोक उठले. मात्र, कोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच (मनुष्य) सर्वात धोकादायक असल्याचे समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे म्हणाले. औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे गुरुवारी देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट स्टडीजच्या सभागृहात आयोजित ‘रेअर शेअर’ कार्यक्रमात ते बोलत होते.डॉ. आमटे यांनी आपल्या व्याख्यानाच्या शेवटी अवनीच्या मृत्यूसंदर्भात आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी राज्य सरकार किंवा वन विभागाचे नाव घेतले नाही. मात्र, अप्रत्यक्षपणे अवनी वाघिणीला ठार केल्याच्या घटनेचा विरोध केला. आपल्या कार्याविषयी बोलताना ते म्हणाले की, आदिवासी लोकांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांचा, त्यासाठी आलेल्या अनेक अडचणींचा संपूर्ण जीवन प्रवास मांडला. एका कुष्ठरोग्याला पाहून बाबांनी (बाबा आमटे) यांनी संपूर्ण जीवन त्यांच्या सेवेसाठी दिले. लहानपणी कुष्ठरोगी आमचे सोबती होते. बाबांचे काम समाजाने स्वीकारले. तेव्हा त्यांच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भामरागडच्या जंगलातील आदिवासी लोकांच्या उन्नतीसाठी काम करण्याचे ठरवले. मंदाकिनीसोबत आनंदवनमध्ये विवाह झाला आणि दुसऱ्याच दिवशी भामरागड येथे गेलो. समाजकार्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मंदाकिनी कामात साथ देण्यावर ठाम राहिली.आदिवासी आजारपणात मांत्रिकाकडे जात. अशक्य गोष्टी मांत्रिक देवावर सोडून देत असे. अशांना बरे केल्यानंतर लोकांचा विश्वास झाला. प्रसूती, मोडलेल्या हाडांचे उपचार, डोळ्यांवर उपचार, मुलांसाठी शाळा, शेतीविषयी मार्गदर्शन केले. आज तेथील अनेक मुले वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्चपदावर पोहोचले. निरपेक्ष सेवेचा आनंद घेतला. लोकांनी उंचीवर नेले; परंतु जमिनीवर पाय घट्ट रोवलेले आहेत, असेही डॉ. प्रकाश आमटे म्हणाले.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणTigerवाघDeathमृत्यू