शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

‘अवनी’च्या जीवावर उठलेला दोन पायांचा प्राणीच धोकादायक- प्रकाश आमटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 07:00 IST

अवनी वाघिणीच्या जीवावर लोक उठले. मात्र, कोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच (मनुष्य) सर्वात धोकादायक असल्याचे समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे म्हणाले.

औरंगाबाद : भामरागडसारख्या भागात काम करताना आदिवासी लोकांना समाजाच्या प्रवाहात आणताना वन्य प्राण्यांसाठीही काम केले. अनेक वर्षांत वन्यप्राणी स्वत:हून मानवावर हल्ला करतो, असे कधीच दिसले नाही; परंतु आज वन्यप्राणी हिंसक होत असल्याचे सांगत त्यांना मारले जात आहे. अवनी वाघिणीच्या जीवावर लोक उठले. मात्र, कोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच (मनुष्य) सर्वात धोकादायक असल्याचे समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे म्हणाले. औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे गुरुवारी देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट स्टडीजच्या सभागृहात आयोजित ‘रेअर शेअर’ कार्यक्रमात ते बोलत होते.डॉ. आमटे यांनी आपल्या व्याख्यानाच्या शेवटी अवनीच्या मृत्यूसंदर्भात आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी राज्य सरकार किंवा वन विभागाचे नाव घेतले नाही. मात्र, अप्रत्यक्षपणे अवनी वाघिणीला ठार केल्याच्या घटनेचा विरोध केला. आपल्या कार्याविषयी बोलताना ते म्हणाले की, आदिवासी लोकांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांचा, त्यासाठी आलेल्या अनेक अडचणींचा संपूर्ण जीवन प्रवास मांडला. एका कुष्ठरोग्याला पाहून बाबांनी (बाबा आमटे) यांनी संपूर्ण जीवन त्यांच्या सेवेसाठी दिले. लहानपणी कुष्ठरोगी आमचे सोबती होते. बाबांचे काम समाजाने स्वीकारले. तेव्हा त्यांच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भामरागडच्या जंगलातील आदिवासी लोकांच्या उन्नतीसाठी काम करण्याचे ठरवले. मंदाकिनीसोबत आनंदवनमध्ये विवाह झाला आणि दुसऱ्याच दिवशी भामरागड येथे गेलो. समाजकार्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मंदाकिनी कामात साथ देण्यावर ठाम राहिली.आदिवासी आजारपणात मांत्रिकाकडे जात. अशक्य गोष्टी मांत्रिक देवावर सोडून देत असे. अशांना बरे केल्यानंतर लोकांचा विश्वास झाला. प्रसूती, मोडलेल्या हाडांचे उपचार, डोळ्यांवर उपचार, मुलांसाठी शाळा, शेतीविषयी मार्गदर्शन केले. आज तेथील अनेक मुले वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्चपदावर पोहोचले. निरपेक्ष सेवेचा आनंद घेतला. लोकांनी उंचीवर नेले; परंतु जमिनीवर पाय घट्ट रोवलेले आहेत, असेही डॉ. प्रकाश आमटे म्हणाले.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणTigerवाघDeathमृत्यू