कल्याणमध्ये दोन कोटी ७० लाखांची फसवणूक
By Admin | Updated: May 30, 2016 04:19 IST2016-05-30T04:19:58+5:302016-05-30T04:19:58+5:30
७० लाखांची रक्कम घेऊन ती दुसऱ्याच व्यक्तीला विकणाऱ्या जमीन मालकासह पाच जणांविरु द्ध राबोडी पोलीस ठाण्यात दीड वर्षापूर्वीच गुन्हा दाखल झाला

कल्याणमध्ये दोन कोटी ७० लाखांची फसवणूक
ठाणे : कल्याणजवळील वाव्होली गावातील २३ एकर जमीन एनए करून विकसित करण्याचे आमिष दाखवून दोन कोटी ७० लाखांची रक्कम घेऊन ती दुसऱ्याच व्यक्तीला विकणाऱ्या जमीन मालकासह पाच जणांविरु द्ध राबोडी पोलीस ठाण्यात दीड वर्षापूर्वीच गुन्हा दाखल झाला. त्यातील तक्रारदारांचा वकील राजकुमार उन्हाळेला दीड वर्षानंतर राबोडी पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबईतील पोलीस निरीक्षक अशोक सपकाळे यांनीही या प्रकरणात २० लाखांची रक्कम घेतल्याचा आरोप आहे. उर्वरित चारही आरोपी अद्यापही पोलिसांना गुंगारा देत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. वकील उन्हाळे, रा. हिरानंदानी इस्टेट घोडबंदर रोड, ठाणे, पोलीस निरीक्षक सपकाळे रा. कोपरी, ठाणे, त्याची पत्नी वैशाली, जमीनमालक रमाकांत म्हात्रे, मु.पो. गुंदवली, ता. भिवंडी, जि. ठाणे आणि दलाल जितेश मोरे, रा. खोपट, ठाणे या पाच जणांनी संगनमताने ही कोट्यवधींची फसवणूक केल्याची तक्रार कळव्यातील चुन्नीलाल फारिया यांनी १५ नोव्हेंबर २०१४ रोजी केली होती. जून २०१० ते १५ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत हा व्यवहार झाला. त्यापोटी उन्हाळे यांच्या कार्यालयात एक कोटी ३५ लाख रु पये रोख, तर एक कोटी ३५ लाख रु पये धनादेशाद्वारे असे दोन कोटी ७०लाख रु पये घेण्यात आले. यातील धनादेश हे म्हात्रे यांच्या नावाने देण्यात आले. पण म्हात्रे आणि सपकाळे यांना सामील झाले. राबोडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. १३ एप्रिल २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला. (प्रतिनिधी)