शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Supriya Sule Eknath Shinde: कहानी में ट्विस्ट! सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटाच्या आमदाराचं तोंडभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 17:13 IST

काही दिवसांपूर्वी शिंदे गटावर सुप्रिया सुळे समर्थक तुटून पडले होते

Supriya Sule Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केली आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाले. महाविकास सरकारमध्ये घुसमट होत असल्याचे कारण देत एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या साथीने वेगळी वाट धरली. त्यांना शिवसेनेतील आमदार, खासदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला. त्यामुळे शिंदे गटाने भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तास्थापना केली. त्यानंतर वारंवार शिंदे गटातील आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीचे नेते शिवसेना संपवायला निघालेत असेही आरोप शिंदे गटाकडून करण्यात आले. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरला. त्यामुळे बराच वादंग निर्माण झाला आणि शिंदे गटावर सुळे समर्थक तटून पडले होते. पण आता 'कहानी में ट्वि्स्ट' पाहायला मिळत असून सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाच्या आमदाराचे तोंडभरून कौतुक केले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. कोश्यारी यांच्यासोबतच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही महाराजांवर केलेल्या वक्तव्याचा विरोधकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. राज्यपालांच्या या विधानावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी इशारा दिला. 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान होत असेल तर हे चांगलं नाही. अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे दोघानांही परिणाम भोगावे लागतील,' असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला. त्यावरूनच सुप्रिया सुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अवमानकारक विधानाबाबत आमदार संजयजी गायकवाड यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करुच शकत नाही', असे ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे शिंदे गटातील आमदाराचे अभिनंदन आणि कौतुक केले.

काय म्हणाले होते भगतसिंह कोश्यारी?

'आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण ? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. बाबासाहेब आंबडेकर ते डॉ. नितीन गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,' असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले होते.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSanjay Gaikwadसंजय गायकवाडEknath Shindeएकनाथ शिंदेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज