शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

बारा हजार पालक ‘दत्तक’ मुलांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 19, 2015 22:56 IST

प्रक्रिया आॅनलाईन : समाजाचा वाढता प्रतिसाद; देशभरातील संस्थांमध्ये सुमारे सहा हजार बालके

विश्वास पाटील - कोल्हापूर -मुले दत्तक देण्याच्या प्रक्रियेतील गैरव्यवहार रोखून ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी केंद्र सरकारने ही प्रक्रिया आता आॅनलाईन केली आहे. सद्य:स्थितीत दत्तक देता येण्याजोगी देशभरातील संस्थांमध्ये सुमारे सहा हजार बालके असताना मूल दत्तक हव्या असलेल्या बारा हजारांहून जास्त पालकांची प्रतीक्षा यादी आहे. त्यामुळे ‘कुणी बाळ देता, का बाळ’ अशीच काहीशी पालकांची अवस्था बनली आहे. आतापर्यंत ही सर्व प्रक्रिया कागदोपत्री होती. त्यामुळे मुले दत्तक देण्यास विलंब होत होताच शिवाय त्यावर नियंत्रण ठेवणेही अवघड होते. आता दत्तक देण्यासाठी किती मुले उपलब्ध आहेत, त्यांची छायाचित्रे व त्यांच्याबद्दलची सगळी इत्थंभूत माहिती पालकांना आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. जे पालक बाळ दत्तक घेऊ इच्छितात त्यांचीही माहिती यामुळे सर्व संस्थांना मिळणार आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटी (कारा) ही संस्था ही प्रक्रिया नियंत्रित करते. या प्रक्रियेमुळे देशभरातील सर्व दत्तक देण्यात येणाऱ्या मुलांची आमि इच्छुक पालकांचीही माहिती ‘कारा’कडे उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्रात देशाबाहेर मुले दत्तक देण्याची परवानगी असलेल्या (रिपा संस्था) २१ आणि देशातच दत्तक देणाऱ्या ४५ संस्था आहेत. आताच्या पद्धतीनुसार दत्तक देण्यासाठीचे मूल त्या संस्थेत कधी आले व ते कधी दत्तक दिले गेले, हा ट्रॅक तपासणे शक्य होत नव्हते. आता मूल बाल न्याय समितीकडून अ‍ॅडॉप्शनसाठी मुक्त होताच दोन महिन्यांच्या आत ते दत्तक देणे बंधनकारक असेल. आतापर्यंत दोन पालकांचा नकार आल्यावर त्या मुलास परदेशात दत्तक दिले जात होते. अशा व्यवहारात काही संस्थांकडून पैशांची लूटमार होत असे. हे शासनाच्या लक्षात आल्याने ८० टक्के मुले ही भारतातच दत्तक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांना मूल दत्तक घ्यायचे आहे, त्यांच्याकडे पॅनकार्ड आणि स्वत:चा मेल आयडीही हवा. पालकांनी मूल पसंत केल्यानंतर महिन्याच्या आत गृहभेट करणे बंधनकारक केले आहे. केंद्र सरकारने हे काम सोपे व्हावे यासाठी प्रत्येक राज्यांसाठी स्वतंत्र समन्वयक अधिकारी नियुक्त केला आहे. पूर्वी या कोणत्याच प्रक्रियेचा कालावधी निश्चित नव्हता. त्यामुळे सगळी प्रक्रियाच वेळखाऊ होती. नव्या पद्धतीमुळे त्यात सुलभता आली असून दत्तक चळवळीला त्यामुळे अधिक गती येऊ शकेल, असे या क्षेत्रांतील जाणकारांचे म्हणणे आहे.मुला-मुलींना दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला चळवळीचे स्वरूप आले असून ती प्रवाही होत आहे. समाजातील चांगल्या बदलाचे हे लक्षण आहे. त्या संदर्भातील कायद्यातील बदल हेही या मुला-मुलींचे भवितव्य योग्यरितीने घडावे यादृष्टीने करण्यात आले आहेत.- डॉ. प्रमिला जरगपदसिद्ध अध्यक्ष,अनाथालये व इतर धर्मादायगृहे अधिनियमांतर्गत स्थापन नियंत्रण मंडळम्राज्यात हजारावर दत्तकविधानमहाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे १५०० मुले उपलब्ध असतात. त्यातील ११०० ते १२०० मुले दत्तक दिली जातात. मुलांची मागणी अडीच हजाराच्या आसपास असते. या नोंदी ठेवणारा स्वतंत्र कक्ष पुण्यात आहे.