शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

प्रश्न विचारणारेच देशप्रेमी, उत्तरे न देणारे देशद्रोही! - तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 16:48 IST

मार्क्स, गांधी, आंबेडकर यांच्या तत्वज्ञानावर व्याख्याने देऊन आता काही साध्य होणार नाही तर सरकारला आव्हान देण्यासाठी लढा उभारावा लागेल, असे तुषार गांधी म्हणाले.

ठळक मुद्दे तीसरे मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलननाशिक - मुंबई अशी पायपीट करत सत्ताधा-यांच्या द्वारावर मोर्चाने धडकला, हा पुरावा पुरेसा आंबेडकर व गांधी यांनी एकमेकांना कधीही आपले शत्रू मानले नाही.

नाशिक : देशाला आज पुन्हा क्रांतीची गरज वाटत आहे. राष्ट्रउभारणीसाठी आवश्यक असलेल्या विचारांचा संगम आज पूर्णत: भ्रष्ट झालेला दिसून येतो. असे होणे अत्यंत गंभीर व राष्टहिताच्यादृष्टीने चिंतेची बाब आहे. राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना देशाची काळजी असते, त्यामुळे ते देशप्रेमीच आहे; मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरे न देणारे लोक देशद्रोही वाटतात, असे परखड मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.विचार जागर मंच व कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तीसरे मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गांधी संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व साहित्यीक उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, श्रीपाद जोशी, डॉ. गोपाळ गुरू उपस्थित होते. यावेळी गांधी यांनी मूलतत्ववादी विचारधारेवर जोरदारी टीका करत आंबेडकर-महात्मा गांधी यांच्याविषयी गैरसमज पसरविणा-यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्येही वैचारिक मतभेद असतील मात्र त्यांनी कधीही एकमेकांचा द्वेष केला नाही. गांधीजींच्या खूनाच्या खटल्याप्रसंगी आंबेकर कायदेमंत्रीपदावर असतानाही ते सुनावणीच्या वेळी जातीने उपस्थित राहत होते. त्यामुळे आंबेडकर व गांधी यांनी एकमेकांना कधीही आपले शत्रू मानले नाही. या दोघांना मानणा-या वर्गापैकी काही भक्तांनी आपली तर्कबुध्दी गहाण ठेवून गांधी-आंबेडकरांमध्ये शत्रुत्व निर्माण करुन त्यांच्यावर अन्याय केला. पुणे करारावर बाबासाहेबांनी गांधीजींच्या हट्पोटी स्वाक्षरी केली असे म्हणणे चुकीचे आहे. कारण त्यांनी स्वाक्षरीराष्ट्रप्रेम व देशभक्तीमधून केली होती. त्यावेळी इंग्रज राजकिय विभागणी करण्याचा डाव आखत होते, याची जाणीव बाबासाहेबांना होती, असे तुषार गांधी यांनी यावेळी सांगितले.

‘चंपारण्य-खेडा’नंतरही शेतक-यांच्या समस्या ज्वलंतचंपारण्य  व खेडा सत्याग्रह १९१८साली बापूंनी केला मात्र त्यानंतरही शेतक-यांचे प्रश्न आजही तितकेच ज्वलंत वाटत आहे. न्याय मागण्यांसाठी शेतकरी नाशिक - मुंबई अशी पायपीट करत सत्ताधा-यांच्या द्वारावर मोर्चाने धडकला, हा पुरावा पुरेसा आहे शेतक-यांच्या व्यथा सांगण्यासाठी. आजही या सरकारच्या काळात मजूर, कष्टकरी कामगार, शेतकरी, दलीत असे सर्वच घटक असुरक्षित झाले आहे. मार्क्स, गांधी, आंबेडकर यांच्या तत्वज्ञानावर व्याख्याने देऊन आता काही साध्य होणार नाही तर सरकारला आव्हान देण्यासाठी लढा उभारावा लागेल, असे तुषार गांधी म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकMahatma Gandhiमहात्मा गांधीDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती