शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात तुषार बारनवाल पहिला; सीबीएसईचा निकाल जाहीर

By admin | Updated: May 22, 2016 01:05 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला.

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. या परीक्षेत आर्मी पब्लिक स्कूल सदन कमांडच्या तुषार बारनवाल याने ९८.२ टक्के गुण मिळवत पुण्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर याच स्कूलच्या संकल्प सांगळे याने ९८ टक्के गुण मिळवत दुसरा येण्याचा मान मिळविला.देशातील १० लाख ४१ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी सीबीएसईची इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. मंडळाकडून अद्याप गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नसली तरी पुण्यातील मंडळाच्या शाळांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुषारने पुण्यातून बाजी मारल्याचे दिसून येते. तुषार व संकल्प हे दोघेही आर्मी पब्लिक स्कूल सदन कमांडच्या विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहेत. याच शाळेच्या अरुनिमा अगरवाल हिने मानवशास्त्र विषयात ९४ टक्के गुण मिळवले आहेत तर वाणिज्य शाखेत संस्कृती सिंगने शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. औंध येथील डीएव्ही स्कूलच्या एब्रो बहुनिया हा ९७.४ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला. तर वाणिज्य शाखेत प्रियल जैन हिने ९५.६ टक्के गुण मिळवून पहिला येण्याचा मान मिळविला. वानवडी येथील दिल्ली पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेचे सर्व १०७ विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत प्रणव अगरवालने ९६.२ टक्के, मानवशास्त्र विषयात विद्या रवींद्रनाथने ९६ टक्के व वाणिज्य शाखेत आदिती निषित हिने ९६ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक मिळविला. केंद्रीय विद्यालय एअर फोर्स स्टेशन येथील शाळेचा वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के तर विज्ञान शाखेचा ९९ टक्के लागला आहे. अमतिमा रॉय ही ९५ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली.खडकी येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये प्रणव डॉली व मुस्कान नागपाल यांनी ९५.४ टक्के गुणांसह विज्ञान शाखेत संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत नयन महाजन हिला ९४.२ टक्के तर मानवशास्त्र विषयात मुस्कान चहल हिला ८९ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळाला. गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालयातील सागर बारापत्रे ९२.८ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत तर वाय. श्रेया ही ९४.६ टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम आली. विखे पाटील शाळेतील ऋचा साठे ही विद्यार्थिनी ९६ टक्के गुणांसह पहिली आली. पुण्यात प्रथम आल्याचे समजत आहे. त्यामुळे खुप आनंदी आहे. मला ९५ टक्के गुण मिळतील अशी अपेक्षा होती. तशी तयारीही केली होती. सर्व विषयांच्या संकल्पना स्पष्ट असल्याने नियोजनबध्द अभ्यास केला. त्यामुळे अभ्यास करताना फारशा अडचणी आल्या नाहीत. या यशात आई-वडिलांचा वाटा महत्वाचा आहे. आता आयआयटीमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहेत.- तुषार बारनवाल