शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

शेतीतून वर्षाला तब्बल अडीच कोटींची उलाढाल; दौंड तालुक्यातील 'तरुण बळीराजा'ची जबरदस्त कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 16:33 IST

मानव जात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शेतीला पर्याय नाही...   

दीपक कुलकर्णी -

पुणे : पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकरीला झिडकारत कुणी गावी जाऊन शेती करण्याचा विचार केला तर त्याला नक्कीच वेडे ठरवले जाण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्यात परंपरागत शेती करणारे कुटुंब असेल तर मग नक्कीच अशा माणसाला गावी येण्यास सहज सहमती मिळणार नाही. पण त्याने ठाम निश्चय केला. अनेकांचा विरोध पत्करून तो गावी परतला. त्याने आपल्या अडीच एकराच्या शेतीत अंजिराचे पीक घेण्याचे ठरवले. या अंजिराच्या पिकाने त्याचे असे काही नशीब पालटवले की त्याची उलाढाल बघता बघता अडीच कोटीपर्यंत पोहचली आहे.

दौंड तालुक्यातील खोर येथील डोंबेवाडीच्या त्या अवलिया शेतकऱ्याचे नाव समीर डोंबे असे आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने चार चारचौघांसारखा नोकरीचा रस्ता धरत मन मर्जी आणि सुखचैनी आयुष्य जगण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. आठ वर्षांपूर्वी तब्बल ४० हजार महिना मिळवत सुरुवात देखील जबरदस्त केली. बाहेरून कुणालाही सारे काही सुरळीत सुरु आहे असाच समज झाला असता. पण समीरच्या आतमध्ये वेगळीच घालमेल सुरु होती. त्याचं मन नोकरीत वा शहरातील लाइफ स्टाईलमध्ये समाधानी नव्हते. त्याला गावाकडील काळीमाती खुणावत होती. आणि मग त्याने कुटुंब मित्र यांचा विरोध स्वीकारत त्याने २०१३ साली नोकरीचा राजीनामा देत थेट दौंड गाठले. गावी गेल्यावर अंजिराचे पीक घेण्याचे ठरवले. स्वतःच्या कल्पनेतून नवनवीन अभिनव प्रयोगांमार्फत त्याने ही अंजिराची शेती फुलवली. पिकाचे उत्पादन करूनच न थांबता वितरण आणि विक्रीत देखील आमूलाग्र परिवर्तन घडवत व्यवसायाची नवी पद्धत अवलंबली. बाजारपेठाऐवजी थेट विक्रीला प्राधान्य दिले. 

आपल्या प्रेरणादायी वाटचालीबद्दल समीर म्हणाला,मी पुण्यातील नोकरी सोडून जेव्हा आमचे गाव गाठले तेव्हा माझ्या आई वडिलांसह सर्वानीच कपाळावर हात मारत काय खूळ डोक्यात घेऊन बसला आहे, शेतीतुन कुणाचं भलं झाले आहे का ? तुझं अजून लग्नवगैरे सगळ्या गोष्टी राहिल्या आहेत. शेती करणाऱ्या मुलाला एकतर कुणी मुलगी देत नाही. अशा अवस्थेत नोकरी सोडून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे यांसारख्या विविध गोष्टी ऐकवल्या गेल्या. पण या सर्वांना उत्तर थेट कामातून दयायचे असे ठरवून धडपड सुरु केली. 

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्याने व काही काळ पुण्यात राहिल्याने शेतीत नवनवीन बदल करण्याचे ठरवले. आमच्या शेतीत आजोबांपासून अंजिराचे पीक घेतले जात होते. पण ते बाजारपेठांमध्ये तुटपुंज्या किमतीत विकून मोकळे होत असत. मी हा दृष्टिकोन बदलत अडीच एकराच्या संपूर्ण शेतीत अंजिराचे पीक घेत आणि आपल्या मालाची विक्री आपल्या पद्धतीने करायची योजना आखली. नंतर स्वतःचा 'पवित्रक' नावाचा एक ब्रँड रजिस्टर करून घेतला. तसेच आकर्षक पॅकिंगसह ते बाजारात विक्रीला आणले.रिलायन्स,बिगबाजार, मोर, स्टार बाजार अशा सुपर मॉलमध्ये प्रॉडक्ट विक्रीस उपलब्ध आहे. तसेच मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर अशा ठिकाणी देखील अंजीर व त्याचे बाय प्रॉडक्ट पाठवणे देखील सुरु केले. यातूनच आम्ही माझी अडीच एकराची शेती पाच एकरावर नेली. तसेच मागच्या वर्षी दीड कोटींपर्यंत असलेली उलाढाल यावर्षी अडीच कोटींच्या घरात आहे. 

आगामी काळात वाईन व जामचा प्लांट टाकण्याचे नियोजन...    आगामी काळात  वाईन व जामचा प्लांट टाकण्याचे नियोजन सुरु आहे. आता आमच्या डोंबेवाडीत जवळपास ३५ ते चाळीस शेतकऱ्यांची मिळून २०० ते २५० एकर शेती मध्ये अंजिराचे उत्पादन घेतले जाते. त्यांच्या मालाची पारदर्शीपणे खरेदी करून कष्ट, नुकसान देखील वाचवतो.माझ्यासोबतच इतरही शेतकरी कुटुंबाला सोबत घेत त्यांचीही प्रगती साधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

.. तर शेतीत पण मोठी उलाढाल पण अशक्य नाही..शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला कधीच असे वाटत नाही की आपल्या मुलाने पुढे जाऊन शेतकरी व्हावे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक कुटुंबाप्रमाणे  कुठलेही क्रांतिकारी बदल आपल्या शेती व्यवसायात न स्वीकारता पारंपरिक पद्धतीने उत्पादन व विक्रीचाच कित्ता गिरवण्यात धन्यता मानतो. त्यामुळे शेती व्यवसाय बऱ्याच प्रमाणात आहे त्याच ठिकाणी राहिला. याला नक्कीच अपवाद आहे. पण अनेक कुटुंबातील शेतकऱ्याचे मुले आपला शेती व्यवसाय सोडून पुणे, मुंबई शहर गाठतात. पण तरुण पिढीने नकारात्मकता बाजूला सारून स्वतःच्या शिक्षणाचा, अनुभवाचा उपयोग जर आपल्या परंपरागत कृषी व्यवसायासाठी केला तर नक्कीच परिवर्तन पाहायला मिळेल.  

अँग्रीकल्चरची पदवीधर मुले स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्यूहात....आजमितीला अनेक तरुण तरुणी आपल्या अँग्रीकल्चर, इंजिनिअरिंग यासारख्या पदव्या घेऊन पुढे एमपीएससी आणि युपीएससीच्या चक्रव्यूहात अडकलेले दिसतात. वर्षानुवर्षे त्या परीक्षांच्या तयारीसाठी खर्ची करतात. यातून काही जणांना यश देखील मिळते. पण त्यापैकी मोठ्या संख्येचा तरुण वर्ग हा उमेदीचा काळ गमावून बसतो. पण हेच जर कष्ट व शिक्षणाचा वापर त्याने शेतीत केला तर नक्कीच यश दूर नसेल.

मानव जात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शेती व्यवसायाला भीती नाही..माणूस म्हटलं की अन्न ही मूलभूत गरज आली. माणसाला जीवन जगताना बळीराजाशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. त्यामुळे जोपर्यंत मानव जात जिवंत आहे तोपर्यंत शेती व्यवसायाला भीती नाही असे माझे ठाम मत आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीbusinessव्यवसाय