शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

महिषासुराच्या मर्दनाचा तुळजापुरी उत्सव,  देशभरातून भाविकांची दर्शनासाठी रीघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 21:13 IST

९ दिवस त्याच्याशी युद्ध करुन दहाव्या दिवशी शरण येण्यास भाग पाडणा-या देवीचा हा उत्सव नवरात्री अन् विजयादशमीच्या नावाने साजरा केला जातो़ या उत्सवात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते़

गोविंद खुरुद

तुळजापूर, दि. 19  : भगवान शंकराचा वरदान लाभलेल्या महिषासुराने त्रिलोकात उच्छाद मांडून देव, ऋषी व मणुष्यप्राण्यास सळो की पळो करुन सोडले होते़.  ९ दिवस त्याच्याशी युद्ध करुन दहाव्या दिवशी शरण येण्यास भाग पाडणा-या देवीचा हा उत्सव नवरात्री अन् विजयादशमीच्या नावाने साजरा केला जातो़ या उत्सवात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते़देशभरात नवरात्र महोत्सव २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत साजरा होत असला तरी श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव १३ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत होत आहे़ नवरात्रापूर्वी तुळजाभवानी माता ८ दिवस मंचकी निद्रा घेते़ या घोर निद्रेनंतर मुख्य नवरात्रास सुरुवात होते़ पहिल्या दिवशी सिंहासनावर प्रतिष्ठापना करुन पंचामृत अभिषेकाद्वारे नवरात्रास प्रारंभ केला जातो़ धार्मिक विधी पार पडल्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सिंहगाभाºयात मंदिर संस्थानच्या अध्यक्षांच्या हस्ते घटस्थापना केली जाते़ यानंतर दररोज नित्योपचार, पंचामृत अभिषेक, चरण तीर्थ, नैवेद्य, धुप आरती, अंगारा व अलंकार पूजा होते़ सायंकाळच्या अभिषेकानंतर प्रक्षाळ व छबिना हे विधी पार पडतात़ नऊ दिवस चालणारा छबिना सिंह, वाघ, मोर, गरुड व हत्ती या देवीच्या वाहनांच्या प्रतिकृतींवरुन काढला जातो़ यावेळी संबळ या पारंपारिक वाद्याच्या तालावर कवड्या धारण करीत व हाती पोत प्रज्वलित केलेले आराधी, सेवेकरी व पुजारी देवीचा जयघोष करीत मंदिराला प्रदक्षिणा घालतात़ दहाव्या दिवशी नित्योपचार पूजेनंतर अजाबळीस सवाद्य मंदिरात आणले जाते़ त्याची यथोचित पूजा झाल्यानंतर होमावर बळी दिला जातो़ अजाबळीनंतर देवीसमोरीज घटांची उत्थोपना केली जाते़ मानाच्या आरत्या व पारंपारिक नैवेद्य दाखवून यावेळी नवरात्राची सांगता केली जाते़ या कालावधीत व विजयादशमी दिवशी देशाच्या कानाकोपºयातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते़ विशेषत: महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविक या कालावधीत अनवाणी चालत येऊन देवीचे दर्शन घेतात़देवीची घोर व श्रम निद्रा़़़अन्यत्र नऊ दिवसांचा उत्सव साजरा केला जात असला तरी तुळजापुरात अतिरिक्त १३ दिवस हा उत्सव साजरा होतो़ नवरात्रापूर्वी देवी आठ दिवस मंचकी निद्रा घेते़ त्यास घोर निद्रा म्हणून संबोधले जाते़ तर नवरात्रानंतर पाच दिवस देवी पुन्हा निद्रा घेते़ या निद्रेला श्रम निद्रा म्हणतात़ याचाही उत्सव साजरा होत असल्याने या महोत्सवाचा कालावधी मोठा आहे़अशी सांगितली जाते अख्यायिका़़़महिषासुराने त्रिलोकात उच्छाद मांडला होता़ त्याने इंद्रदेवाचाही पराभव करुन राजासन बळकाविले असते़ तेव्हा ब्रम्हा, विष्णु, महेश हे देवीला जागे करुन तिला महिषासुरापासून वाचविण्याची याचना करतात व आपली सर्व शक्ती देवीला प्रदान करतात़ यानंतर देवीचे महिषासुराशी नऊ दिवस युद्ध चालते़ या काळात अनेकवेळा महिषासुर मारला जातो; परंतु रक्तबीजापासून पुन्हा-पुन्हा त्याची उत्पत्ती होते़ यामुळे सर्व देव-देवता त्यांची शक्ती देवीला प्रदान करतात़ त्यानंतर तिचे रौद्र रुप पाहून दहाव्या दिवशी महिषासूर देवीला शरण जातो़ त्यांच्यात झालेला नऊ दिवसांचा युद्धकाळ नवरात्र तर शरण आलेला दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, अशी अख्यायिका तुळजाभवानी महात्म्यमध्ये सांगितलेली असल्याचे ज्येष्ठ पुजारी युवराज साठे म्हणाले़

टॅग्स :Navratriनवरात्री