शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महिषासुराच्या मर्दनाचा तुळजापुरी उत्सव,  देशभरातून भाविकांची दर्शनासाठी रीघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 21:13 IST

९ दिवस त्याच्याशी युद्ध करुन दहाव्या दिवशी शरण येण्यास भाग पाडणा-या देवीचा हा उत्सव नवरात्री अन् विजयादशमीच्या नावाने साजरा केला जातो़ या उत्सवात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते़

गोविंद खुरुद

तुळजापूर, दि. 19  : भगवान शंकराचा वरदान लाभलेल्या महिषासुराने त्रिलोकात उच्छाद मांडून देव, ऋषी व मणुष्यप्राण्यास सळो की पळो करुन सोडले होते़.  ९ दिवस त्याच्याशी युद्ध करुन दहाव्या दिवशी शरण येण्यास भाग पाडणा-या देवीचा हा उत्सव नवरात्री अन् विजयादशमीच्या नावाने साजरा केला जातो़ या उत्सवात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते़देशभरात नवरात्र महोत्सव २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत साजरा होत असला तरी श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव १३ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत होत आहे़ नवरात्रापूर्वी तुळजाभवानी माता ८ दिवस मंचकी निद्रा घेते़ या घोर निद्रेनंतर मुख्य नवरात्रास सुरुवात होते़ पहिल्या दिवशी सिंहासनावर प्रतिष्ठापना करुन पंचामृत अभिषेकाद्वारे नवरात्रास प्रारंभ केला जातो़ धार्मिक विधी पार पडल्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सिंहगाभाºयात मंदिर संस्थानच्या अध्यक्षांच्या हस्ते घटस्थापना केली जाते़ यानंतर दररोज नित्योपचार, पंचामृत अभिषेक, चरण तीर्थ, नैवेद्य, धुप आरती, अंगारा व अलंकार पूजा होते़ सायंकाळच्या अभिषेकानंतर प्रक्षाळ व छबिना हे विधी पार पडतात़ नऊ दिवस चालणारा छबिना सिंह, वाघ, मोर, गरुड व हत्ती या देवीच्या वाहनांच्या प्रतिकृतींवरुन काढला जातो़ यावेळी संबळ या पारंपारिक वाद्याच्या तालावर कवड्या धारण करीत व हाती पोत प्रज्वलित केलेले आराधी, सेवेकरी व पुजारी देवीचा जयघोष करीत मंदिराला प्रदक्षिणा घालतात़ दहाव्या दिवशी नित्योपचार पूजेनंतर अजाबळीस सवाद्य मंदिरात आणले जाते़ त्याची यथोचित पूजा झाल्यानंतर होमावर बळी दिला जातो़ अजाबळीनंतर देवीसमोरीज घटांची उत्थोपना केली जाते़ मानाच्या आरत्या व पारंपारिक नैवेद्य दाखवून यावेळी नवरात्राची सांगता केली जाते़ या कालावधीत व विजयादशमी दिवशी देशाच्या कानाकोपºयातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते़ विशेषत: महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविक या कालावधीत अनवाणी चालत येऊन देवीचे दर्शन घेतात़देवीची घोर व श्रम निद्रा़़़अन्यत्र नऊ दिवसांचा उत्सव साजरा केला जात असला तरी तुळजापुरात अतिरिक्त १३ दिवस हा उत्सव साजरा होतो़ नवरात्रापूर्वी देवी आठ दिवस मंचकी निद्रा घेते़ त्यास घोर निद्रा म्हणून संबोधले जाते़ तर नवरात्रानंतर पाच दिवस देवी पुन्हा निद्रा घेते़ या निद्रेला श्रम निद्रा म्हणतात़ याचाही उत्सव साजरा होत असल्याने या महोत्सवाचा कालावधी मोठा आहे़अशी सांगितली जाते अख्यायिका़़़महिषासुराने त्रिलोकात उच्छाद मांडला होता़ त्याने इंद्रदेवाचाही पराभव करुन राजासन बळकाविले असते़ तेव्हा ब्रम्हा, विष्णु, महेश हे देवीला जागे करुन तिला महिषासुरापासून वाचविण्याची याचना करतात व आपली सर्व शक्ती देवीला प्रदान करतात़ यानंतर देवीचे महिषासुराशी नऊ दिवस युद्ध चालते़ या काळात अनेकवेळा महिषासुर मारला जातो; परंतु रक्तबीजापासून पुन्हा-पुन्हा त्याची उत्पत्ती होते़ यामुळे सर्व देव-देवता त्यांची शक्ती देवीला प्रदान करतात़ त्यानंतर तिचे रौद्र रुप पाहून दहाव्या दिवशी महिषासूर देवीला शरण जातो़ त्यांच्यात झालेला नऊ दिवसांचा युद्धकाळ नवरात्र तर शरण आलेला दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, अशी अख्यायिका तुळजाभवानी महात्म्यमध्ये सांगितलेली असल्याचे ज्येष्ठ पुजारी युवराज साठे म्हणाले़

टॅग्स :Navratriनवरात्री