शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
5
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
6
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
7
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
8
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
9
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
10
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
11
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
12
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
13
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
14
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
15
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
16
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
18
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
19
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
20
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक

महिषासुराच्या मर्दनाचा तुळजापुरी उत्सव,  देशभरातून भाविकांची दर्शनासाठी रीघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 21:13 IST

९ दिवस त्याच्याशी युद्ध करुन दहाव्या दिवशी शरण येण्यास भाग पाडणा-या देवीचा हा उत्सव नवरात्री अन् विजयादशमीच्या नावाने साजरा केला जातो़ या उत्सवात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते़

गोविंद खुरुद

तुळजापूर, दि. 19  : भगवान शंकराचा वरदान लाभलेल्या महिषासुराने त्रिलोकात उच्छाद मांडून देव, ऋषी व मणुष्यप्राण्यास सळो की पळो करुन सोडले होते़.  ९ दिवस त्याच्याशी युद्ध करुन दहाव्या दिवशी शरण येण्यास भाग पाडणा-या देवीचा हा उत्सव नवरात्री अन् विजयादशमीच्या नावाने साजरा केला जातो़ या उत्सवात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते़देशभरात नवरात्र महोत्सव २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत साजरा होत असला तरी श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव १३ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत होत आहे़ नवरात्रापूर्वी तुळजाभवानी माता ८ दिवस मंचकी निद्रा घेते़ या घोर निद्रेनंतर मुख्य नवरात्रास सुरुवात होते़ पहिल्या दिवशी सिंहासनावर प्रतिष्ठापना करुन पंचामृत अभिषेकाद्वारे नवरात्रास प्रारंभ केला जातो़ धार्मिक विधी पार पडल्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सिंहगाभाºयात मंदिर संस्थानच्या अध्यक्षांच्या हस्ते घटस्थापना केली जाते़ यानंतर दररोज नित्योपचार, पंचामृत अभिषेक, चरण तीर्थ, नैवेद्य, धुप आरती, अंगारा व अलंकार पूजा होते़ सायंकाळच्या अभिषेकानंतर प्रक्षाळ व छबिना हे विधी पार पडतात़ नऊ दिवस चालणारा छबिना सिंह, वाघ, मोर, गरुड व हत्ती या देवीच्या वाहनांच्या प्रतिकृतींवरुन काढला जातो़ यावेळी संबळ या पारंपारिक वाद्याच्या तालावर कवड्या धारण करीत व हाती पोत प्रज्वलित केलेले आराधी, सेवेकरी व पुजारी देवीचा जयघोष करीत मंदिराला प्रदक्षिणा घालतात़ दहाव्या दिवशी नित्योपचार पूजेनंतर अजाबळीस सवाद्य मंदिरात आणले जाते़ त्याची यथोचित पूजा झाल्यानंतर होमावर बळी दिला जातो़ अजाबळीनंतर देवीसमोरीज घटांची उत्थोपना केली जाते़ मानाच्या आरत्या व पारंपारिक नैवेद्य दाखवून यावेळी नवरात्राची सांगता केली जाते़ या कालावधीत व विजयादशमी दिवशी देशाच्या कानाकोपºयातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते़ विशेषत: महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविक या कालावधीत अनवाणी चालत येऊन देवीचे दर्शन घेतात़देवीची घोर व श्रम निद्रा़़़अन्यत्र नऊ दिवसांचा उत्सव साजरा केला जात असला तरी तुळजापुरात अतिरिक्त १३ दिवस हा उत्सव साजरा होतो़ नवरात्रापूर्वी देवी आठ दिवस मंचकी निद्रा घेते़ त्यास घोर निद्रा म्हणून संबोधले जाते़ तर नवरात्रानंतर पाच दिवस देवी पुन्हा निद्रा घेते़ या निद्रेला श्रम निद्रा म्हणतात़ याचाही उत्सव साजरा होत असल्याने या महोत्सवाचा कालावधी मोठा आहे़अशी सांगितली जाते अख्यायिका़़़महिषासुराने त्रिलोकात उच्छाद मांडला होता़ त्याने इंद्रदेवाचाही पराभव करुन राजासन बळकाविले असते़ तेव्हा ब्रम्हा, विष्णु, महेश हे देवीला जागे करुन तिला महिषासुरापासून वाचविण्याची याचना करतात व आपली सर्व शक्ती देवीला प्रदान करतात़ यानंतर देवीचे महिषासुराशी नऊ दिवस युद्ध चालते़ या काळात अनेकवेळा महिषासुर मारला जातो; परंतु रक्तबीजापासून पुन्हा-पुन्हा त्याची उत्पत्ती होते़ यामुळे सर्व देव-देवता त्यांची शक्ती देवीला प्रदान करतात़ त्यानंतर तिचे रौद्र रुप पाहून दहाव्या दिवशी महिषासूर देवीला शरण जातो़ त्यांच्यात झालेला नऊ दिवसांचा युद्धकाळ नवरात्र तर शरण आलेला दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, अशी अख्यायिका तुळजाभवानी महात्म्यमध्ये सांगितलेली असल्याचे ज्येष्ठ पुजारी युवराज साठे म्हणाले़

टॅग्स :Navratriनवरात्री