शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील रुग्णालयांना टेली रेडिओलॉजीचे पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करावे, रेडिओलॉजिस्टच्या जागतिक परिषदेत राज्यपालांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 22:51 IST

तंत्रज्ञानामुळे तुम्ही तुमचे मेडिकल रिपोर्ट काही सेकंदातच रेडिओलॉजिस्टला दाखवू शकता त्याला भौगोलिक मर्यादा राहिलेली नाही. माहिती तंत्रज्ञानाची जोड  देऊन राज्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयांना टेली रेडिओलॉजीसाठी सहकार्य करावे.

मुंबई - तंत्रज्ञानामुळे तुम्ही तुमचे मेडिकल रिपोर्ट काही सेकंदातच रेडिओलॉजिस्टला दाखवू शकता त्याला भौगोलिक मर्यादा राहिलेली नाही. माहिती तंत्रज्ञानाची जोड  देऊन राज्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयांना टेली रेडिओलॉजीसाठी सहकार्य करावे. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविणे शक्य होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.17 वी आशियायी रेडिओलॉजी परिषद आणि इंडियन रेडिओलॉजीची 71 वी वार्षिक परिषद हॉटेल रेनिसन्समध्ये आयोजित करण्यात आली होती. तिचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नसीम खान, इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भुपेंद्र आहुजा, सचिव शैलेंद्र सिंग, जिग्नेश ठक्कर आदींसह विविध देशातील तसेच राज्यातील डॉक्टर्स उपस्थित होते.भारतात अशी जागतिक परिषद 25 वर्षांनंतर होतेय आणि तिच्या आयोजनाचा मान रेडिओलॉजी असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेला मिळाला त्याबद्दल राज्यपालांनी अभिनंदन केले. राज्यपाल म्हणाले की, रोगाचे वेळीच निदान आणि तो रोखण्यासाठी रेडिओलॉजिस्ट महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आज एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के नागरिक ग्रामीण भागात राहत आहेत. आरोग्यसेवा ग्रामीण भागात अधिक सक्षम होण्यासाठी आणि रोगांचे वेळीच निदान होण्यासाठी टेली रेडिओलॉजीचा वापर होणे गरजेचे आहे. आरोग्यक्षेत्रात अचूक निदानासाठी सीटी स्कॅन, एमआरआय, आणि पेट स्कॅन उपयुक्त ठरत आहेत. येत्या  काळात या क्षेत्रात क्रांतिकारक बदल नक्कीच घडतील, असा मला विश्वास आहे.राज्यपाल म्हणाले की, रोगनिदानासाठी रेडिओलॉजी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रेडिओलॉजीत आधुनिक संशोधन झाल्याने लाखो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. शिवाय वेळेवर आजाराचे अचूक निदान करण्यात यश आल्यामुळे या तंत्रज्ञानामुळे लाखो लोकांचे आयुष्य सुसह्य केले आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाने आघाडी घेतलेली असताना रेडिओलॉजी क्षेत्रातील तंत्रज्ञानाने मोठी झेप घेत त्याचा मानवजातील फायदा करून दिला आहे. हृदयविकार, मूत्रपिंड, आतडे आणि अन्य अवयवांना होणाऱ्या आजरांचे वेळीच निदान आणि उपचार करणे रेडिओलॉजीमुळे शक्य झाले आहे.जागतिक स्तरावर भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचा देश आहे. रेडिओलॉजीसाठी वापरली जाणारी साधने, यंत्रसामुग्री महागडी आहेत आणि त्याची निर्मिती परदेशात होते. अशावेळेस ह्या यंत्रसामुग्रीची निर्मिती भारतातच झाली तर त्याच्या किमती नक्कीच कमी होतील. परिणामी इमेजिंगचे दर कमी होण्यास मदत होईल. जनतेला माफक दरात सेवा पुरविण्यासाठी रेडिओलॉजी संघटनेने पुढाकार घ्यावा, असे सांगून देशात मुलींचा जन्मदर कमी होत आहे. अनेक राज्यामध्ये 1000 मुलांमागे मुलींचे प्रमाण 900 ते 950 च्या आसपास आहे. गर्भलिंग निदान चाचणी होऊ नये यासाठी रेडिओलॉजिस्टनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही राज्यपालांनी केले. दीपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

टॅग्स :Mumbaiमुंबई