शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

मीरा भाईंदरकरांचा भरोसा जिंकण्यास पोलिसांचा 'भरोसा सेल' सोमवारपासून पुन्हा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 12:59 IST

आता मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वर्षपूर्ती निमित्त भाईंदर येथे पुन्हा भरोसा सेल तयार केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - ठाणे ग्रामीण पोलीस असताना भाईंदर येथे सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलने कौटुंबिक वाद विवाद सोडवण्यात महत्वाची भूमिका पार पाडत नागरिकांचा विश्वास संपादन केला होता. पण नंतर तो बंद पडला. आता मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वर्षपूर्ती निमित्त भाईंदर येथे पुन्हा भरोसा सेल तयार केला असून सोमवार पासून लोकांचा भरोसा पुन्हा जिंकण्यासाठी पोलिसांचा भरोसा सेल सज्ज झाला आहे. 

ठाणे ग्रामीण पोलीस कार्यकाळात मीरा भाईंदर साठी पोलिसांनी भरोसा सेल हा भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याच्या गच्चीवर सुरू केला होता. त्यावेळी सहायक पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी भरोसा सेल राबवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले व नागरिकां मध्ये सुद्धा भरोसा निर्माण झाला. कौटुंबिक वादाची सुमारे ६०० प्रकरणे सेल कडे आली होती.  त्यातील ८०% प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. पोलिसांना त्यावेळी चांगले वकील, समुपदेशक, मानसोपचार तज्ञ, महिला संस्था आदींची चांगली साथ मिळाली होती. परंतु कुलकर्णी यांची बदली झाल्यावर भरोसा सेल दुर्लक्षित होऊन बंद पडला होता. 

गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयचा शुभारंभ करण्यात आला होता. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली मनुष्यबळ, जागा आदींची कमतरता असून देखील अवघ्या वर्षभरात आयुक्तालयाची घडी बऱ्यापैकी बसली आहे. नवनवीन विभाग व उपक्रम पोलीस राबवत असून गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण वाढले आहे. 

भरोसा सेल सुरू करणे प्रस्तावित होते. शहराची वाढती लोकसंख्या व महिला हिंसाचार , कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या तक्रारीना प्राधान्य देणे , त्यांना समुपदेशन करून मानसिक आधार देणे व त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे याकरीता पोलीस आयुक्तालय वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्त दाते यांचे हस्ते भाईंदर येथील भरोसा सेलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. महेश पाटील, भरोसा सेलच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे, कार्यालयासाठी पालिका निधी उपलब्ध करून देणाऱ्या नगरसेविका रिटा शाह आदी उपस्थित होते. 

पोलिस आयुक्त दाते म्हणाले की,  मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय सुरु होऊन एक वर्ष झाले. या वर्षभरात अनेक उपक्रम पोलिसांनी सुरू केले. पण भरोसा सेल सुरू करणे बाकी होते. ते आज सुरू करत आहोत याचा विशेष आनंद आहे. पोलीस ठाण्यात महिला, वृद्ध तसेच मुलांच्या कौटुंबिक तक्रारी येत असतात. पण त्यावर कायदेशीर कारवाई करण्या ऐवजी त्या तक्रारी समुपदेशना द्वारे , तज्ञ, वकिलां च्या मार्गदर्शनाने सोडवाव्यात अशी तक्रारदारांची अपेक्षा असते. त्या अनुषंगाने मीरा भाईंदर साठी भरोसा सेल सोमवार पासून सुरू होईल. लवकरच वसई व विरार साठी परिमंडळ २ व ३ मध्ये सुद्धा भरोसा सेल सुरू करणार आहोत. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस