शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरकरांचा भरोसा जिंकण्यास पोलिसांचा 'भरोसा सेल' सोमवारपासून पुन्हा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 12:59 IST

आता मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वर्षपूर्ती निमित्त भाईंदर येथे पुन्हा भरोसा सेल तयार केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - ठाणे ग्रामीण पोलीस असताना भाईंदर येथे सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलने कौटुंबिक वाद विवाद सोडवण्यात महत्वाची भूमिका पार पाडत नागरिकांचा विश्वास संपादन केला होता. पण नंतर तो बंद पडला. आता मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वर्षपूर्ती निमित्त भाईंदर येथे पुन्हा भरोसा सेल तयार केला असून सोमवार पासून लोकांचा भरोसा पुन्हा जिंकण्यासाठी पोलिसांचा भरोसा सेल सज्ज झाला आहे. 

ठाणे ग्रामीण पोलीस कार्यकाळात मीरा भाईंदर साठी पोलिसांनी भरोसा सेल हा भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याच्या गच्चीवर सुरू केला होता. त्यावेळी सहायक पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी भरोसा सेल राबवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले व नागरिकां मध्ये सुद्धा भरोसा निर्माण झाला. कौटुंबिक वादाची सुमारे ६०० प्रकरणे सेल कडे आली होती.  त्यातील ८०% प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. पोलिसांना त्यावेळी चांगले वकील, समुपदेशक, मानसोपचार तज्ञ, महिला संस्था आदींची चांगली साथ मिळाली होती. परंतु कुलकर्णी यांची बदली झाल्यावर भरोसा सेल दुर्लक्षित होऊन बंद पडला होता. 

गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयचा शुभारंभ करण्यात आला होता. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली मनुष्यबळ, जागा आदींची कमतरता असून देखील अवघ्या वर्षभरात आयुक्तालयाची घडी बऱ्यापैकी बसली आहे. नवनवीन विभाग व उपक्रम पोलीस राबवत असून गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण वाढले आहे. 

भरोसा सेल सुरू करणे प्रस्तावित होते. शहराची वाढती लोकसंख्या व महिला हिंसाचार , कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या तक्रारीना प्राधान्य देणे , त्यांना समुपदेशन करून मानसिक आधार देणे व त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे याकरीता पोलीस आयुक्तालय वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्त दाते यांचे हस्ते भाईंदर येथील भरोसा सेलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. महेश पाटील, भरोसा सेलच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे, कार्यालयासाठी पालिका निधी उपलब्ध करून देणाऱ्या नगरसेविका रिटा शाह आदी उपस्थित होते. 

पोलिस आयुक्त दाते म्हणाले की,  मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय सुरु होऊन एक वर्ष झाले. या वर्षभरात अनेक उपक्रम पोलिसांनी सुरू केले. पण भरोसा सेल सुरू करणे बाकी होते. ते आज सुरू करत आहोत याचा विशेष आनंद आहे. पोलीस ठाण्यात महिला, वृद्ध तसेच मुलांच्या कौटुंबिक तक्रारी येत असतात. पण त्यावर कायदेशीर कारवाई करण्या ऐवजी त्या तक्रारी समुपदेशना द्वारे , तज्ञ, वकिलां च्या मार्गदर्शनाने सोडवाव्यात अशी तक्रारदारांची अपेक्षा असते. त्या अनुषंगाने मीरा भाईंदर साठी भरोसा सेल सोमवार पासून सुरू होईल. लवकरच वसई व विरार साठी परिमंडळ २ व ३ मध्ये सुद्धा भरोसा सेल सुरू करणार आहोत. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस