शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

ट्रकने १२ वाहने उडविली, तीन ठार

By admin | Updated: July 21, 2016 05:21 IST

अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले.

चांदूरबाजार (अमरावती) : अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले. ही घटना चांदूरबाजार ते खरवाडी मार्गावर बुधवारी सायंकाळी घडलीकिशोर इंगळे (४०), त्यांची पत्नी शिल्पा (३८) आणि मुलगा शौर्य (६) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी खारवाडी येथे ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला. तर, पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. राज्य राखीव दलाची तुकडी देखील घटनास्थळी दाखल झाली. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. व त्यांनी खारवाडी गावात डेरा टाकला. यात ट्रकचालक व दोन क्लिनरही जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांना ट्रकच्या कॅबिनमध्येच बसवून ठेवले होते.हा ट्रक मोर्शी मार्गावरून अमरावतीकडे जनावरे घेऊन जात होता. जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याने ट्रक आडमार्गाने जात होता. बेदरकारपणे ट्रक चालविणाऱ्या चालकाला रोखण्याचा प्रयत्न चांदूरबाजार येथे काही नागरिकांनी केला. पण तेथून निसटताना चालकाचे नियंत्रण सुटले. पहिल्यांदा त्याने एका कारला जोरदार धडक दिली. त्यात कारचा चेंदामेंदा झाला. त्यानंतर समोरून येणाऱ्या एसटीलाही धडक दिली. पुढे हा ट्रक तब्बल नऊ दुचाकींना धडक देत खारवाडीच्या दिशेने गेला. हे सर्व घडेपर्यंत चांदूरबाजारमधील शेकडो नागरिकांनी दुचाकीने ट्रकचा पाठलाग केला. भ्रमणध्वनीवरून खारवाडी गावाकऱ्यांना हा ट्रक अडविण्यास सांगण्यात आले. तत्पूर्वी हा ट्रक खेड, उदखेड, कोळविहिर या गावांमध्ये देखील अडविण्याचा प्रयत्न झाला. अखेर खारवाडीत नागरिकांनी ट्रक रोखला. ट्रकमध्ये असलेल्या गायींपैकी काही गायी मृत पावल्या होत्या. जिवंत गायींना नागरिकांनी चारा-पाण्याच्या सोईसाठी सुरक्षित स्थळी हलविले.संताप अनावर झाल्याने ट्रक पेटविण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. घ्पोलिसांनी बळाचा वापर केला. (प्रतिनिधी)